शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जलस्रोत कोरडेठाक : पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्याची मागणी येवला तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देराजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाहीजनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे. राजापूर हे तालुक्यातील मोठे खेडे आहे. या परिसरात ममदापूर संवर्ध राखीवदेखील आहे. परंतु राजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाही. गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. परंतु परिसरातील वाड्या वस्तीवरील पाण्याचे काही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा व गावातील टॅँकरच्या खेपा वाढवाव्या. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी, वाघ वस्ती या मोठ्या वस्ती असूनही या वस्त्यांमध्ये जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शंकर अलगट, सागर अलगट, गोकूळ वाघ, संतोष चव्हाण, बबनराव वाघ, नितीन अलगट, सुभाष अलगट, आनंदा वाघ यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी केली आहे.जलस्रोत कोरडेठाकयेवला तालुक्यातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट तीव्र होत चालले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला असून, हंडाभर पाण्यासाठी महिलावर्ग व नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. माणसाबरोबरच मुक्या प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालखेड कालवा विभागाने तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे व लाभक्षेत्रातील गावातील सर्व पाझर तलाव पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी होत आहे. पाणी प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील चाळीस गावांना आज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे व पाणी मागणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. तालुक्यातील हे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी पालखेड कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे व पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील गावांमधील पाझर तलाव पाण्याने भरून दिल्यास काही अंशी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. जलसंपदा विभागाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी रतन बोरनारे यांनी केली आहे.