शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

जलस्रोत कोरडेठाक : पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्याची मागणी येवला तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देराजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाहीजनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे. राजापूर हे तालुक्यातील मोठे खेडे आहे. या परिसरात ममदापूर संवर्ध राखीवदेखील आहे. परंतु राजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाही. गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. परंतु परिसरातील वाड्या वस्तीवरील पाण्याचे काही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा व गावातील टॅँकरच्या खेपा वाढवाव्या. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी, वाघ वस्ती या मोठ्या वस्ती असूनही या वस्त्यांमध्ये जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शंकर अलगट, सागर अलगट, गोकूळ वाघ, संतोष चव्हाण, बबनराव वाघ, नितीन अलगट, सुभाष अलगट, आनंदा वाघ यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी केली आहे.जलस्रोत कोरडेठाकयेवला तालुक्यातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट तीव्र होत चालले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला असून, हंडाभर पाण्यासाठी महिलावर्ग व नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. माणसाबरोबरच मुक्या प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालखेड कालवा विभागाने तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे व लाभक्षेत्रातील गावातील सर्व पाझर तलाव पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी होत आहे. पाणी प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील चाळीस गावांना आज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे व पाणी मागणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. तालुक्यातील हे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी पालखेड कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे व पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील गावांमधील पाझर तलाव पाण्याने भरून दिल्यास काही अंशी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. जलसंपदा विभागाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी रतन बोरनारे यांनी केली आहे.