शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

जलस्रोत कोरडेठाक : पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्याची मागणी येवला तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देराजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाहीजनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे. राजापूर हे तालुक्यातील मोठे खेडे आहे. या परिसरात ममदापूर संवर्ध राखीवदेखील आहे. परंतु राजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाही. गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. परंतु परिसरातील वाड्या वस्तीवरील पाण्याचे काही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा व गावातील टॅँकरच्या खेपा वाढवाव्या. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी, वाघ वस्ती या मोठ्या वस्ती असूनही या वस्त्यांमध्ये जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शंकर अलगट, सागर अलगट, गोकूळ वाघ, संतोष चव्हाण, बबनराव वाघ, नितीन अलगट, सुभाष अलगट, आनंदा वाघ यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी केली आहे.जलस्रोत कोरडेठाकयेवला तालुक्यातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट तीव्र होत चालले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला असून, हंडाभर पाण्यासाठी महिलावर्ग व नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. माणसाबरोबरच मुक्या प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालखेड कालवा विभागाने तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे व लाभक्षेत्रातील गावातील सर्व पाझर तलाव पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी होत आहे. पाणी प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील चाळीस गावांना आज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे व पाणी मागणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. तालुक्यातील हे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी पालखेड कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे व पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील गावांमधील पाझर तलाव पाण्याने भरून दिल्यास काही अंशी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. जलसंपदा विभागाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी रतन बोरनारे यांनी केली आहे.