शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

‘जलशुध्दीकरण केंद्र’ बनले ‘अशुध्द पाणीपुरवठा केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

सिन्नर (शैलेश कर्पे) : तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त गावांसाठी वरदान ठरलेल्या वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र ...

सिन्नर (शैलेश कर्पे) : तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त गावांसाठी वरदान ठरलेल्या वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र ‘अशुध्द पाणीपुरवठा केंद्र’ बनल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेकडून जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्तीसाठी सुमारे २६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. नुकतीच जलशुध्दीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात आली असून, त्यानंतरही योजनेतील गावांना अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याने २६ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सुमारे १० वर्षांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी वावीसह ११ गाव पाणीपुरवठा राबविली होती. वावी, कहांडळवाडी, दुसंगवाडी, सायाळे, मिठसागरे, शहा, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मलढोण, मीरगाव या गावांचा यात समावेश करण्यात आला होता. १० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्राची दुरवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराकडून या जलशुध्दीकरणाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अद्याप या योजनेतून अशुध्द व गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याला वास येत असून, नागरिकांना सदर पाणी केवळ वापरण्यासाठी उपयोग करण्याची वेळ आली आहे. पाणी गढूळ असल्याने नागरिकांना ‘जार’चे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेला सुमारे २६ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेला की काय, अशी चर्चा सुरू आहे.

--------------------

वावी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेला गढूळ आणि अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वावी ग्रामपंचायतीने गावातील जलकुंभ स्वच्छ केले. मात्र, त्यानंतरही गढूळ पाणी येत असल्याने वावीचे सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे यांच्यासह सचिन वेलजाळी, संदीप भोसले, भाऊसाहेब नरोडे, संपत चिने यांच्यासह ग्रामस्थांनी कोळगावमाळ येथील योजनेचा तलाव आणि जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. त्यावेळी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी शुध्द होत नसल्याची बाब उघड झाली.

-------------------------

बाटली तिच लेबल बदलले...

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेला गढूळ व अशुध्द पाणी येत असल्याने २६ लाख रुपयांच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पाण्यात काही सुधारणा झाली नाही. पाणी पूर्वीप्रमाणेच गढूळ येत आहे. जलशुध्दीकरण केंद्राला केवळ रंगरंगोटी करून चकाचक करण्यात आले. मात्र, पाण्यात कोणताही बदल झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बाटली तीच फक्त लेबल बदलले, अशी अवस्था जलशुध्दीकरण केंद्राची झाली आहे.

-------------------

अशुध्द पाणी बाहेर जाण्याची व्यवस्थाच नाही

जलशुध्दीकरण केंद्रात पाणी शुध्द केल्यानंतर अशुध्द पाणी बाहेर टाकण्यासाठी आऊटलेट नसल्याचे दिसून आले. केवळ वॉश आऊट केल्यानंतर नावापुरते अशुध्द पाणी एका जवळच्या विहिरीत सोडले जाते. त्यातही सातत्य नाही. पाणी शुध्द करण्यासाठी आलम व अन्य औषधांचा वापर केल्यानंतर शुध्द होणारे पाणी व अशुध्द पाणी पुन्हा एकत्र होऊन तेच पाणी योजनेतील गावांना सोडले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.

--------------

मध्यंतरीच्या काळात या योजनेकडे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य लक्ष दिले नाही. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्राची दुरवस्था होण्यासह गळती वाढली. जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामाच्यावेळी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

-विजय काटे, माजी अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना

--------------------------

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करतांना वावीचे सरपंच कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, भाऊसाहेब नरोडे, संदीप भोसले, सचिन वेलजाळी, संपत चिने आदी. (०३ सिन्नर २)

===Photopath===

030621\03nsk_4_03062021_13.jpg

===Caption===

०३ सिन्नर २