शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘जलशुध्दीकरण केंद्र’ बनले ‘अशुध्द पाणीपुरवठा केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

सिन्नर (शैलेश कर्पे) : तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त गावांसाठी वरदान ठरलेल्या वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र ...

सिन्नर (शैलेश कर्पे) : तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त गावांसाठी वरदान ठरलेल्या वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र ‘अशुध्द पाणीपुरवठा केंद्र’ बनल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेकडून जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्तीसाठी सुमारे २६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. नुकतीच जलशुध्दीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात आली असून, त्यानंतरही योजनेतील गावांना अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याने २६ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सुमारे १० वर्षांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी वावीसह ११ गाव पाणीपुरवठा राबविली होती. वावी, कहांडळवाडी, दुसंगवाडी, सायाळे, मिठसागरे, शहा, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मलढोण, मीरगाव या गावांचा यात समावेश करण्यात आला होता. १० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्राची दुरवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराकडून या जलशुध्दीकरणाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अद्याप या योजनेतून अशुध्द व गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याला वास येत असून, नागरिकांना सदर पाणी केवळ वापरण्यासाठी उपयोग करण्याची वेळ आली आहे. पाणी गढूळ असल्याने नागरिकांना ‘जार’चे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेला सुमारे २६ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेला की काय, अशी चर्चा सुरू आहे.

--------------------

वावी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेला गढूळ आणि अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वावी ग्रामपंचायतीने गावातील जलकुंभ स्वच्छ केले. मात्र, त्यानंतरही गढूळ पाणी येत असल्याने वावीचे सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे यांच्यासह सचिन वेलजाळी, संदीप भोसले, भाऊसाहेब नरोडे, संपत चिने यांच्यासह ग्रामस्थांनी कोळगावमाळ येथील योजनेचा तलाव आणि जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. त्यावेळी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी शुध्द होत नसल्याची बाब उघड झाली.

-------------------------

बाटली तिच लेबल बदलले...

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेला गढूळ व अशुध्द पाणी येत असल्याने २६ लाख रुपयांच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पाण्यात काही सुधारणा झाली नाही. पाणी पूर्वीप्रमाणेच गढूळ येत आहे. जलशुध्दीकरण केंद्राला केवळ रंगरंगोटी करून चकाचक करण्यात आले. मात्र, पाण्यात कोणताही बदल झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बाटली तीच फक्त लेबल बदलले, अशी अवस्था जलशुध्दीकरण केंद्राची झाली आहे.

-------------------

अशुध्द पाणी बाहेर जाण्याची व्यवस्थाच नाही

जलशुध्दीकरण केंद्रात पाणी शुध्द केल्यानंतर अशुध्द पाणी बाहेर टाकण्यासाठी आऊटलेट नसल्याचे दिसून आले. केवळ वॉश आऊट केल्यानंतर नावापुरते अशुध्द पाणी एका जवळच्या विहिरीत सोडले जाते. त्यातही सातत्य नाही. पाणी शुध्द करण्यासाठी आलम व अन्य औषधांचा वापर केल्यानंतर शुध्द होणारे पाणी व अशुध्द पाणी पुन्हा एकत्र होऊन तेच पाणी योजनेतील गावांना सोडले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.

--------------

मध्यंतरीच्या काळात या योजनेकडे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य लक्ष दिले नाही. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्राची दुरवस्था होण्यासह गळती वाढली. जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामाच्यावेळी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

-विजय काटे, माजी अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना

--------------------------

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करतांना वावीचे सरपंच कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, भाऊसाहेब नरोडे, संदीप भोसले, सचिन वेलजाळी, संपत चिने आदी. (०३ सिन्नर २)

===Photopath===

030621\03nsk_4_03062021_13.jpg

===Caption===

०३ सिन्नर २