शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सप्तशृंगगडावर पाण्याची समस्या गंभीर

By admin | Updated: February 18, 2015 23:57 IST

सप्तशृंगगडावर पाण्याची समस्या गंभीर

कळवण : उत्तर महाराष्ट्रातील आराध्यदैवत सप्तशृंगीगडावर दरवर्षाप्रमाणे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. चैत्रोत्सव काळात नेहमीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा भीषण सामना गडावरील स्थानिक तसेच भाविकांना करावा लागणार आहे.स्थानिक व्यावसायिकांना नांदुरी किंवा इतर ठिकाणांहून विकतचे पाणी आणून भाविकांची तहान भागवावी लागते. उत्तम नियोजन करून यंदा चैत्रोत्सव काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, असे सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सांगितले. सप्तशृंगी गडापासून पाच किलोमीटर असलेल्या भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या भवानी पाझर तलावाचे पाणी आटत असून, परिसर पूर्णपणे मोकळा दिसत आहे. भवानी पाझर तलावाचे काम जिल्हा परिषदेमार्फत झाले असून, निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. त्यामुळे पाणीगळती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पाणी जास्त काळ साचून राहत नाही. सप्तशृंग ट्रस्टने भवानी तलावाची उंची एक मीटरने वाढवून साठवण क्षमता वाढविण्यासाठी ५० लाखांचा खर्च केला. पाणी गळती थांबविण्यासाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर करण्यात आला, मात्र त्याचा विशेष फायदा झाला नाही. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रात्री वेळी-अवेळी पाण्यासाठी जावे लागत आहे. महिला वर्गाची पहाटेपासूनच हातपंपावर नंबर लावण्यासाठी झुंबड उडते. गडावर अवघ्या काही दिवसांत चैत्रोत्सवाला सुरु वात होत आहे. त्यासाठी राज्यातून व परराज्यातून २० ते २५ लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडावरील पाणीटंचाईचा विचार करता भाविकांना विकतचे पाणी प्यावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने तळ गाठल्याने आत्ताच पाण्याची समस्या उभी ठाकली असून, आता केवळ फेब्रुवारी महिना आहे. पुढील मार्च ते मे महिन्यात काय होईल ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने जर कामांना गती देऊन नियोजनपूर्वक कामे केली तर निश्चितच पाणीटंचाईची समस्या कमी होईल. (वार्ताहर)