शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

सप्तशृंगगडावर पाण्याची समस्या गंभीर

By admin | Updated: February 18, 2015 23:57 IST

सप्तशृंगगडावर पाण्याची समस्या गंभीर

कळवण : उत्तर महाराष्ट्रातील आराध्यदैवत सप्तशृंगीगडावर दरवर्षाप्रमाणे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. चैत्रोत्सव काळात नेहमीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा भीषण सामना गडावरील स्थानिक तसेच भाविकांना करावा लागणार आहे.स्थानिक व्यावसायिकांना नांदुरी किंवा इतर ठिकाणांहून विकतचे पाणी आणून भाविकांची तहान भागवावी लागते. उत्तम नियोजन करून यंदा चैत्रोत्सव काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, असे सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सांगितले. सप्तशृंगी गडापासून पाच किलोमीटर असलेल्या भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या भवानी पाझर तलावाचे पाणी आटत असून, परिसर पूर्णपणे मोकळा दिसत आहे. भवानी पाझर तलावाचे काम जिल्हा परिषदेमार्फत झाले असून, निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. त्यामुळे पाणीगळती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पाणी जास्त काळ साचून राहत नाही. सप्तशृंग ट्रस्टने भवानी तलावाची उंची एक मीटरने वाढवून साठवण क्षमता वाढविण्यासाठी ५० लाखांचा खर्च केला. पाणी गळती थांबविण्यासाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर करण्यात आला, मात्र त्याचा विशेष फायदा झाला नाही. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रात्री वेळी-अवेळी पाण्यासाठी जावे लागत आहे. महिला वर्गाची पहाटेपासूनच हातपंपावर नंबर लावण्यासाठी झुंबड उडते. गडावर अवघ्या काही दिवसांत चैत्रोत्सवाला सुरु वात होत आहे. त्यासाठी राज्यातून व परराज्यातून २० ते २५ लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडावरील पाणीटंचाईचा विचार करता भाविकांना विकतचे पाणी प्यावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने तळ गाठल्याने आत्ताच पाण्याची समस्या उभी ठाकली असून, आता केवळ फेब्रुवारी महिना आहे. पुढील मार्च ते मे महिन्यात काय होईल ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने जर कामांना गती देऊन नियोजनपूर्वक कामे केली तर निश्चितच पाणीटंचाईची समस्या कमी होईल. (वार्ताहर)