शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

तलावातील पाण्याचा उपसा

By admin | Updated: October 31, 2015 00:07 IST

नेचर क्लबचे सर्वेक्षण : हरणांची पाण्यासाठी वणवण; वनविभागाचे मात्र दुर्लक्ष

नाशिक : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांची संख्या असल्याने या हरणांच्या संवर्धनासाठी उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात या उपायोजना केवळ फसव्या असून, यामुळे हरणांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हरणांसाठी असलेल्या तलावाच्या पाण्याचा बेकायदेशीररीत्या उपसा होत असतल्याची बाब नेचर क्लॅब या संस्थेने केलेल्या पाहणीत उघड झाली आहे. येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, नगरसूल, भारम, कोळम या भागात जेथे हरीण, काळवीट यांचे अस्तित्व आहे. या ठिकाणी असलेल्या पाणवठ्यावर जनावरे येत असतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील पाण्याचा अनधिकृत उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणी गढूळ होत असून, पाण्याची पातळीदेखील कमी होत असल्याचा आक्षेप संस्थने नोंदविला आहे. या प्रकाराकडे मात्र वनविभाग आणि पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. नगरसूलपासून हाकेच्या अंतराव कोळगावजवळ कानिफनाथ बंधारा आहे. या बंधाऱ्यामध्ये हरणे, काळवीट पाणी पिण्यासाठी जात असतात. पण अलीकडे येथील पाणी कमी होत असल्याने जनावरे पाणवठ्यावर येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हरणांना पाणी मिळावे यासाठी वनविभागाने वनतळे तयार केले आहे, परंतु वनतळे केवळ कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात या तळ्यामध्ये पाणी टाकण्याकडे दुर्लक्ष केले जाते. नेचर क्लबने केलेल्या सर्र्वेक्षणानंतर त्यांनी काही मागण्या केल्या आहेत त्यानुसार विहिरींना कुंपण घालणे, राखीव क्षेत्रातलाही जाळ्यांचे कुंपण लावावे, पाण्याचे नियोजन करावे, गस्ती पथकाची नेमणूक करावी, हरणांसाठी कृत्रिम तलावात पाणी टाकणे, रस्त्यावर हरणांना होणारे अपघात टाळण्यासाठीच्या उपायोजना करावी, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

संरक्षित क्षेत्र नावालाच

काही महिन्यांपूर्वी हरणांच्या संवर्धनासाठी येथील क्षेत्र ममदापूर हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, परंतु ही तरतूद केवळ कागदावरच असून, प्रत्यक्षात अद्याप काहीच काम झालेले नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. परिसराला कुंपण घालणे, पाण्याचे हौद भरणे, गावामध्ये जनजागृती करणे, विहिरींना कठणे बांधणे, संवर्धन क्षेत्राचा विकास करणे ही कामे होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले नाही. केवळ कागदी कामकाज करण्यात आले असून, काळवीट, हरीण संवर्धनासाठी मात्र मनापासून प्रयत्न होताना दिसत नाही.