शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील पाण्याचा उपसा

By admin | Updated: October 31, 2015 00:07 IST

नेचर क्लबचे सर्वेक्षण : हरणांची पाण्यासाठी वणवण; वनविभागाचे मात्र दुर्लक्ष

नाशिक : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांची संख्या असल्याने या हरणांच्या संवर्धनासाठी उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात या उपायोजना केवळ फसव्या असून, यामुळे हरणांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हरणांसाठी असलेल्या तलावाच्या पाण्याचा बेकायदेशीररीत्या उपसा होत असतल्याची बाब नेचर क्लॅब या संस्थेने केलेल्या पाहणीत उघड झाली आहे. येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, नगरसूल, भारम, कोळम या भागात जेथे हरीण, काळवीट यांचे अस्तित्व आहे. या ठिकाणी असलेल्या पाणवठ्यावर जनावरे येत असतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील पाण्याचा अनधिकृत उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणी गढूळ होत असून, पाण्याची पातळीदेखील कमी होत असल्याचा आक्षेप संस्थने नोंदविला आहे. या प्रकाराकडे मात्र वनविभाग आणि पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. नगरसूलपासून हाकेच्या अंतराव कोळगावजवळ कानिफनाथ बंधारा आहे. या बंधाऱ्यामध्ये हरणे, काळवीट पाणी पिण्यासाठी जात असतात. पण अलीकडे येथील पाणी कमी होत असल्याने जनावरे पाणवठ्यावर येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हरणांना पाणी मिळावे यासाठी वनविभागाने वनतळे तयार केले आहे, परंतु वनतळे केवळ कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात या तळ्यामध्ये पाणी टाकण्याकडे दुर्लक्ष केले जाते. नेचर क्लबने केलेल्या सर्र्वेक्षणानंतर त्यांनी काही मागण्या केल्या आहेत त्यानुसार विहिरींना कुंपण घालणे, राखीव क्षेत्रातलाही जाळ्यांचे कुंपण लावावे, पाण्याचे नियोजन करावे, गस्ती पथकाची नेमणूक करावी, हरणांसाठी कृत्रिम तलावात पाणी टाकणे, रस्त्यावर हरणांना होणारे अपघात टाळण्यासाठीच्या उपायोजना करावी, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

संरक्षित क्षेत्र नावालाच

काही महिन्यांपूर्वी हरणांच्या संवर्धनासाठी येथील क्षेत्र ममदापूर हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, परंतु ही तरतूद केवळ कागदावरच असून, प्रत्यक्षात अद्याप काहीच काम झालेले नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. परिसराला कुंपण घालणे, पाण्याचे हौद भरणे, गावामध्ये जनजागृती करणे, विहिरींना कठणे बांधणे, संवर्धन क्षेत्राचा विकास करणे ही कामे होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले नाही. केवळ कागदी कामकाज करण्यात आले असून, काळवीट, हरीण संवर्धनासाठी मात्र मनापासून प्रयत्न होताना दिसत नाही.