शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पाण्याचे नियोजन करण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी संभाव्य टंचाईविषयीची चिंता व्यक्त करतानाच ...

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी संभाव्य टंचाईविषयीची चिंता व्यक्त करतानाच पुढील महिन्याची वाट न पाहाता लागलीच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकला ऑगस्टपर्यंत पुरेल इतका धरणात पाणीसाठा असल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी यापूर्वी सांगितले होते.

यंदा दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी सध्याची परिस्थिती पाहाता वेळीच सावध हेाण्याची आवश्यकता आहे. पाऊस नसल्याने अडचणीची परिस्थिती निर्माण झाली असून, पाणी जपून वापरावेे लागणार आहे. अशीच परिस्थिती राहिली तर धरणातील पाणीसाठा कमी कमी हाेत जाणार असल्याने सर्वांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. आपण वेळीच पाण्याचे नियोजन केले नाही तर लातुरसारखी परिस्थिती उद‌्भवली तरी धावपळ करण्याची वेळ येईल. त्यावेळी लातुरला रेल्वेने पाणी मागविण्याची वेळ आली होती. त्यामुळे टंचाईचा प्रसंग निर्माण होण्यापूर्वीच नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या.

जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. धरणातील पाणीसाठादेखील कमी होत असल्याने अगोदर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा लांबली तर बिकट वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध होण्याची आवश्यकता असल्याने सांभाळून पाऊले उचलावी लागतील, असे भुजबळ यांनी सांगितले.

---इन्फो--

धरणातील साठा तळाला

जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पांमध्ये अवघा २७ टक्के इतकाच जलसाठा आहे. तर नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात ३५ टक्के इतका साठा शिल्लक आहे. मागीलवर्षी या कालावधीत गंगापूर धरणातील साठा ५० टक्के इतका होता. गंगापूर, काश्यपी, गौतमी आणि आळंदी या धरण समूहात तर २५ टक्के इतकाच साठा शिल्लक असून, मागीलवर्षी या कालावधीत २५ टक्के इतके पाणी समूहात होते.