शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

घोटीत भुयारी मार्गात पाणी

By admin | Updated: July 17, 2016 01:07 IST

घोटीत भुयारी मार्गात पाणी

 घोटी : मुंबई-आग्रा महामार्गाचे पाच वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाल्यानंतर हा रस्ता छेदून जाणाऱ्या शहरी भागाला जोडण्यासाठी तयार केलेल्या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचा विसर्ग होत नसल्याने या भुयारी मार्गाचा तलावाचे स्वरूप आले आहे. घोटी शहराजवळ असणाऱ्या दोन्ही भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने लगतच्या नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे.मुंबई - आग्रा महामार्गाचे गोंदे ते वडपे असे ९० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे पाच वर्षांपूर्वी चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतर शहरी भागातून जाणाऱ्या रस्त्याला भुयारी मार्ग ठेवण्यात आले आहेत. यात इगतपुरी तालुक्यात बोरटेंभे, घोटी शहरात दोन, खंबाळे, माणिकखांब व पाडळी आदि ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती महामार्ग प्राधिकरणाने केली होती. मात्र हे काम करताना वाहतुकीचा अथवा रहदारीचा विचार न करता हे मार्ग तयार करण्यात आल्याने दर पावसाळ्यात या सर्व भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याने या भुयारी मार्गाला तलावाचे स्वरूप आले आहे.या साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना या पाण्यातून अथवा महामार्ग ओलांडून जीवघेणे मार्गक्रमण करावे लागत आहे. (वार्ताहर)