शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीचोरी

By admin | Updated: March 6, 2015 00:22 IST

सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीचोरी

  नाशिक : मऱ्हळ खुर्द व मऱ्हळ बुद्रुक गावाला पाणीच येत नसल्याच्या तक्रारीवरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या विशेष पथकाद्वारे केलेल्या तपासणीत कणकोेरी चार गावे पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाइपलाइनमधून परस्पर पाण्याची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला याप्रकरणी एका कारखान्यासह ३० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची बैठक काल झाली. या बैठकीत उपाध्यक्ष प्रकाश वडजे व कृषी सभापती केदा अहेर यांनी नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली. त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांनी ५० पैसे आणेवारी झालेल्या गावांच्या नुकसानीचे पंचनामे करता येणार नाही, असे सांगताच ही आणेवारी खरिपाची असून, अजून रब्बीची आणेवारी होणे बाकी आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करा, असे आदेश उपाध्यक्ष प्रकाश वडजे व कृषी सभापती केदा अहेर यांनी मधुकर पन्हाळे यांना दिले आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा योजना पूर्ण असतानाही वीजजोडणी झालेली नाही, अशा योजनांचा आढावा घेऊन यापुढे जर योजना पूर्ण असतील आणि पाणीपुरवठा योजनांना वीजजोडणी नसेल तर त्याला उपअभियंता व शाखा अभियंता यांनाच जबाबदार धरले जाईल, असे आदेश उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांना याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश दिले.