शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यामुळे डोळ्यांत पाणी !

By admin | Updated: August 23, 2015 23:45 IST

कांद्यामुळे डोळ्यांत पाणी !

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांद्याचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यांत पाणी तरळले आहे. या भाववाढीचा शहरातील हॉटेल्सना रोज प्रत्येकी दोन ते अडीच हजार रुपयांचा फटका बसत आहे. अनेक हॉटेलांत जेवणासोबत कांद्याऐवजी काकडी दिली जात आहे, तर गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने भाव वाढले आहेत. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात २,७०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भावाने मिळणारा कांदा आता तब्बल पाच हजार ते पाच हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांदा ५० ते ७० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. साधारण एका मध्यम हॉटेलमध्ये दररोज ७० ते ८० किलो कांदा लागतो. विशेषत: शाकाहारी हॉटेल्समध्ये भाज्यांचा रस्सा हा कांद्यापासूनच तयार केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा लागतो. शिवाय पावभाजी, उत्तप्पा, डोसा, मिसळ यांसारख्या अनेक खाद्यपदार्थांसाठीही कांदा भरपूर लागतो. नाष्टा, जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना खाण्यासाठी कच्चा कांदाही द्यावा लागतो; मात्र दर भडकल्याने एका हॉटेलला कांद्यासाठी रोज सुमारे दोन ते अडीच हजार रुपये अधिक खर्च करावे लागत आहेत. काहींनी कच्चा कांदा देण्याऐवजी काकडी देणे सुरू केले आहे; मात्र पदार्थांचे दर वाढवलेले नाहीत. सदर वाढ काही दिवसांपुरतीच असून, तेवढ्यासाठी मेन्यूकार्ड बदलणे शक्य नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. हॉटेल व्यावसायिकांसह नागरिकांचे बजेटही कोलमडले आहे. साधारणत: चार जणांच्या एका कुटुंबात आठवड्याला दोन ते अडीच किलो कांदा लागतो. सध्या एका कुटुंबाला आठवड्याला ७० ते ८० रुपयांचा फटका या भाववाढीमुळे सहन करावा लागत असून, त्यामुळे गृहिणी मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे. दरम्यान, नव्या कांद्याबाबतही अनिश्चितता आहे. एरवी शेतकरी नागपंचमीला कांद्याचे उळे टाकतात; मात्र यंदा पाऊसही लांबल्याने येणाऱ्या कांद्याला उशीर होणार आहे. दरवर्षी दिवाळीत येणारा कांदा दाखल होण्यासाठी डिसेंबर, जानेवारी उजाडणार असल्याने कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता कमीच आहे. कांद्याचे भाव वाढले असले, तरी लहान शेतकऱ्यांकडे मालच शिल्लक नसल्याने त्याचा त्यांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र दैनंदिन स्वयंपाकात कांदा वापरणे मुश्कील झाले आहे. (प्रतिनिधी)