शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

दारणा धरणातील पाणी उपसा बंद

By admin | Updated: June 2, 2016 00:14 IST

अत्यल्प पाणीसाठा : आता सारी भिस्त गंगापूर धरणावर; मे महिना पार झाल्याने सुटकेचा नि:श्वास

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा या दोन धरणांपैकी दारणात अवघा ३९ दलघफू पाणीसाठा उरल्याने महापालिकेने पाणी उपसा पूर्णपणे थांबविला असून, आता सारी भिस्त गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. दारणातील उचल थांबल्याने नाशिकरोड भागालाही गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अडचणीचा ठरणारा संपूर्ण मे महिना पार झाल्याने महापालिकेने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. महापालिकेलाही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, दुर्दैवाने पाऊस लांबल्यास पाणीकपातीचे फेरनियोजन करावे लागणार आहे. महापालिकेसाठी गंगापूर धरण समूह आणि दारणा या दोन्ही धरणांतील पाणी आरक्षित आहे. शासनाने यंदा गंगापूर धरणातील ३००० दलघफू तर दारणातील ५०० दलघफू पाणी महापालिकेसाठी पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित ठेवले आहे. मात्र, दारणातील केवळ ३०० दलघफू पाणीच तांत्रिकदृष्ट्या उचलणे शक्य असल्याने दोन्ही धरणांमिळून ३३०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१५ ते २९ मे २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून २४५४ दलघफू पाण्याची उचल केली, तर दारणातून १६६ दलघफू पाणीच फक्त उचलता आले. आता गंगापूर धरणातील ५४६ दलघफू, तर दारणातील १३४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात १२४९ दलघफू (२२.६२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरण तर पूर्णपणे कोरडेठाक पडले असून, गौतमी धरणातही अवघे ४ दलघफू पाणी शिल्लक आहे. ७१४९ दलघफू पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या दारणा धरणात आता केवळ ३९ दलघफू म्हणजे ०.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.