शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दारणा धरणातील पाणी उपसा बंद

By admin | Updated: June 2, 2016 00:14 IST

अत्यल्प पाणीसाठा : आता सारी भिस्त गंगापूर धरणावर; मे महिना पार झाल्याने सुटकेचा नि:श्वास

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा या दोन धरणांपैकी दारणात अवघा ३९ दलघफू पाणीसाठा उरल्याने महापालिकेने पाणी उपसा पूर्णपणे थांबविला असून, आता सारी भिस्त गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. दारणातील उचल थांबल्याने नाशिकरोड भागालाही गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अडचणीचा ठरणारा संपूर्ण मे महिना पार झाल्याने महापालिकेने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. महापालिकेलाही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, दुर्दैवाने पाऊस लांबल्यास पाणीकपातीचे फेरनियोजन करावे लागणार आहे. महापालिकेसाठी गंगापूर धरण समूह आणि दारणा या दोन्ही धरणांतील पाणी आरक्षित आहे. शासनाने यंदा गंगापूर धरणातील ३००० दलघफू तर दारणातील ५०० दलघफू पाणी महापालिकेसाठी पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित ठेवले आहे. मात्र, दारणातील केवळ ३०० दलघफू पाणीच तांत्रिकदृष्ट्या उचलणे शक्य असल्याने दोन्ही धरणांमिळून ३३०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१५ ते २९ मे २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून २४५४ दलघफू पाण्याची उचल केली, तर दारणातून १६६ दलघफू पाणीच फक्त उचलता आले. आता गंगापूर धरणातील ५४६ दलघफू, तर दारणातील १३४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात १२४९ दलघफू (२२.६२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरण तर पूर्णपणे कोरडेठाक पडले असून, गौतमी धरणातही अवघे ४ दलघफू पाणी शिल्लक आहे. ७१४९ दलघफू पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या दारणा धरणात आता केवळ ३९ दलघफू म्हणजे ०.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.