शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

दारणा धरणातील पाणी उपसा बंद

By admin | Updated: June 2, 2016 00:14 IST

अत्यल्प पाणीसाठा : आता सारी भिस्त गंगापूर धरणावर; मे महिना पार झाल्याने सुटकेचा नि:श्वास

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा या दोन धरणांपैकी दारणात अवघा ३९ दलघफू पाणीसाठा उरल्याने महापालिकेने पाणी उपसा पूर्णपणे थांबविला असून, आता सारी भिस्त गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. दारणातील उचल थांबल्याने नाशिकरोड भागालाही गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अडचणीचा ठरणारा संपूर्ण मे महिना पार झाल्याने महापालिकेने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. महापालिकेलाही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, दुर्दैवाने पाऊस लांबल्यास पाणीकपातीचे फेरनियोजन करावे लागणार आहे. महापालिकेसाठी गंगापूर धरण समूह आणि दारणा या दोन्ही धरणांतील पाणी आरक्षित आहे. शासनाने यंदा गंगापूर धरणातील ३००० दलघफू तर दारणातील ५०० दलघफू पाणी महापालिकेसाठी पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित ठेवले आहे. मात्र, दारणातील केवळ ३०० दलघफू पाणीच तांत्रिकदृष्ट्या उचलणे शक्य असल्याने दोन्ही धरणांमिळून ३३०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१५ ते २९ मे २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून २४५४ दलघफू पाण्याची उचल केली, तर दारणातून १६६ दलघफू पाणीच फक्त उचलता आले. आता गंगापूर धरणातील ५४६ दलघफू, तर दारणातील १३४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात १२४९ दलघफू (२२.६२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरण तर पूर्णपणे कोरडेठाक पडले असून, गौतमी धरणातही अवघे ४ दलघफू पाणी शिल्लक आहे. ७१४९ दलघफू पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या दारणा धरणात आता केवळ ३९ दलघफू म्हणजे ०.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.