शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

जलकुंभाचा स्लॅब कोसळला

By admin | Updated: June 3, 2016 23:23 IST

सटाणा येथे दूषित पाणीपुरवठा : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सटाणा : शहरातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या नववसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या नामपूर रोडच्या जलकुंभाचा स्लॅब कोसळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उघड्यावरील या जलकुंभात पक्ष्यांची विष्ठा आणि पालापाचोळा पडत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सन्मित्र हौसिंग, मित्रनगर, शांतीनगर, श्रमिकनगर, अभिमन्यूनगर, श्रीकृष्णनगर, पारिजातनगर, तलाठी कॉलनी, ताहाराबाद रोड, कचेरी रोड या भागातील नागरी वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी १९८८-८९ मध्ये पालिका प्रशासनाने पाच लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला होता. मात्र पालिका प्रशासनाने वेळोवेळी देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे अचानक या जलकुंभाचा स्लॅबच टाकीत कोसळला आहे. हा स्लॅबचा ढिगारा पूर्णपणे टाकीतच साचला असून, रोजचा पालापाचोळा, पक्ष्यांची विष्ठा या टाकीत पडत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिकेला सर्वाधिक महसूल गोळा करून देणाऱ्या नागरी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)