शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

पाणीपट्टीत १३ कोटींची घट

By admin | Updated: March 30, 2017 23:06 IST

नाशिक : महापालिकेने मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली असली तरी यंदा ठरविलेले उद्दिष्ट गाठणे अवघड आहे.

 नाशिक : महापालिकेने मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली असली तरी यंदा ठरविलेले उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. पाणीपट्टीच्या वसुलीत यंदा गतवर्षाच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल १३ कोटींची घट आहे. घरपट्टी वसुली मात्र ८१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. महापालिकेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ११५ कोटी रुपये तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ४२.२५ कोटी रुपये समोर ठेवले आहे. त्यात महापालिकेने आतापर्यंत घरपट्टी ८१ कोटी ४५ लाख रुपये वसूल केली आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेने १ एप्रिल १६ ते २७ मार्च १७ या काळात ८१ कोटी ५१ लाख ८ हजार ६४७ रुपये घरपट्टी वसूल केली होती. गतवर्षाच्या तुलनेत ५ लाख रुपयांची घट आहे. महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदार मिळकतधारकांच्या घरांसमोर ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली आहे. त्याचे दृश्य परिणामही दिसून येत असून, थकबाकीदारांकडून भरणा करण्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यंदा मार्चअखेरपर्यंत ९० ते ९५ कोटी रुपयांपर्यंत घरपट्टी वसूल होईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. चालू आर्थिक वर्षात आधी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, त्यानंतर महापालिका निवडणुकीची मतदार यादी तपासणी यामुळे घरपट्टी वसुलीचा कर्मचारी वर्ग जिल्हा प्रशासनाकडे अडकला होता. त्याचाही फटका वसुलीवर बसल्याचे सांगितले जाते. घरपट्टीत मागच्या वर्षाच्या तुलनेत वसुलीत काही फरक नसला तरी पाणीपट्टीत मात्र यंदा सुमारे १३ कोटींची घट आहे. महापालिकेने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४० कोटी २६ लाख ३४ हजार ३२ रुपये पाणीपट्टी वसूल केली होती. यंदा मात्र २७ मार्च अखेरपर्यंत २६ कोटी २८ लाख ३८ हजार ३८५ रुपयेच वसुली होऊ शकली आहे.

जिल्हा बॅँक अडचणीतजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, मार्चच्या मध्यापर्यंत केवळ १०० कोटींचीच पीककर्ज वसुली झाल्याने जिल्हा बॅँकेची आर्थिक स्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जिल्हा बॅँकेने वेळेत पीक कर्जाची थकबाकी न भरणाऱ्या सभासदांची नावे वृत्तपत्रात देण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी फोटो लावण्याचा इशारा दिल्याने शेतकरीवर्गात संताप व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

उद्दिष्टानुसार वसुली नाहीच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ६ कोटी ८ लाख ८९ हजार इतके ठेवले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ अखेरपर्यंत ४ कोटी १५ लाख २५ हजार म्हणजेच सरासरी ७० टक्के घरपट्टी वसुली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १४ कोटी ३४ लाख ६६ हजार इतके ठेवले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ अखेर ८ कोटी ९१ लाख ९७ हजार इतकी पाणीपट्टी वसुली झाली आहे.