शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पाणीपट्टीत १३ कोटींची घट

By admin | Updated: March 30, 2017 23:06 IST

नाशिक : महापालिकेने मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली असली तरी यंदा ठरविलेले उद्दिष्ट गाठणे अवघड आहे.

 नाशिक : महापालिकेने मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली असली तरी यंदा ठरविलेले उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. पाणीपट्टीच्या वसुलीत यंदा गतवर्षाच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल १३ कोटींची घट आहे. घरपट्टी वसुली मात्र ८१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. महापालिकेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ११५ कोटी रुपये तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ४२.२५ कोटी रुपये समोर ठेवले आहे. त्यात महापालिकेने आतापर्यंत घरपट्टी ८१ कोटी ४५ लाख रुपये वसूल केली आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेने १ एप्रिल १६ ते २७ मार्च १७ या काळात ८१ कोटी ५१ लाख ८ हजार ६४७ रुपये घरपट्टी वसूल केली होती. गतवर्षाच्या तुलनेत ५ लाख रुपयांची घट आहे. महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदार मिळकतधारकांच्या घरांसमोर ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली आहे. त्याचे दृश्य परिणामही दिसून येत असून, थकबाकीदारांकडून भरणा करण्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यंदा मार्चअखेरपर्यंत ९० ते ९५ कोटी रुपयांपर्यंत घरपट्टी वसूल होईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. चालू आर्थिक वर्षात आधी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, त्यानंतर महापालिका निवडणुकीची मतदार यादी तपासणी यामुळे घरपट्टी वसुलीचा कर्मचारी वर्ग जिल्हा प्रशासनाकडे अडकला होता. त्याचाही फटका वसुलीवर बसल्याचे सांगितले जाते. घरपट्टीत मागच्या वर्षाच्या तुलनेत वसुलीत काही फरक नसला तरी पाणीपट्टीत मात्र यंदा सुमारे १३ कोटींची घट आहे. महापालिकेने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४० कोटी २६ लाख ३४ हजार ३२ रुपये पाणीपट्टी वसूल केली होती. यंदा मात्र २७ मार्च अखेरपर्यंत २६ कोटी २८ लाख ३८ हजार ३८५ रुपयेच वसुली होऊ शकली आहे.

जिल्हा बॅँक अडचणीतजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, मार्चच्या मध्यापर्यंत केवळ १०० कोटींचीच पीककर्ज वसुली झाल्याने जिल्हा बॅँकेची आर्थिक स्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जिल्हा बॅँकेने वेळेत पीक कर्जाची थकबाकी न भरणाऱ्या सभासदांची नावे वृत्तपत्रात देण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी फोटो लावण्याचा इशारा दिल्याने शेतकरीवर्गात संताप व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

उद्दिष्टानुसार वसुली नाहीच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ६ कोटी ८ लाख ८९ हजार इतके ठेवले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ अखेरपर्यंत ४ कोटी १५ लाख २५ हजार म्हणजेच सरासरी ७० टक्के घरपट्टी वसुली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १४ कोटी ३४ लाख ६६ हजार इतके ठेवले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ अखेर ८ कोटी ९१ लाख ९७ हजार इतकी पाणीपट्टी वसुली झाली आहे.