शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

येवला तालुक्यात डिसेंबरमध्येच पाणी टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 14:29 IST

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तिव्रता डिसेंबर मध्येच जाणवू लागली असून तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणी टंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरु वात झाली आहे.

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तिव्रता डिसेंबर मध्येच जाणवू लागली असून तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणी टंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरु वात झाली आहे.विहिरीचे श्रोत आटल्याने व तळ उघडा पडू लागल्याने,टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी तीन गावे आणि एक वाडीचा टँकर मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समीतित दाखल झाला आहे.पाणी टँकर अद्याप तालुक्यात सुरु नसला तरी गावोगावचे पाणीटंचाईचे ठराव यायला सुरूवात झाली आहे.यामुळे आगामी सहा महिन्यात पाणी टंचाई तालुक्याला हैराण करणार असल्याचे चित्र आजच दिसत आहे.पंचायत समिती आणि तहसील संयुक्त पाहणी दौरा मात्र अजून सुरु झालेला नाही.तालुक्यातील अहेरवाडी, खैरगव्हाण, कूसमाडी ही तीन गावे आणिगोपाळवाडीचे (खैरगव्हाण) प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहे.असा होतो पाणीटँकर मागणीचा प्रस्ताव मंजूरपाणीटंचाईच्या गावात प्रथम ग्रामपंचायतीत महिला कमिटी टंचाईचा ठराव करून पंचायत समतिीकडे प्रस्ताव दाखल करतात.गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती संबंधित पाणीटंचाईच्या गावाला पाहणी करते. त्यानंतर आवश्यकता असल्यास, सदरचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतिम मंजुरीनंतर पाणीटंचाई गावाला पाणी टँकर सुरु होतो.पाणी टंचाई कृती आराखडागेल्या वर्षी सन २०१५-१६ मध्ये येवला तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अंतिम टप्प्यात तब्बल ६३ गावे,४४ वाड्यांना, ३३ टँकरद्वारे दररोज 116 खेपा करण्याची वेळ आली होती.सन 2016-17 मध्ये 482 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली होती,तरी तालुका पाणी टँकर मुक्त होण्यासाठी नवीन पाणीश्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच कायम राहिली आहे. यंदा दरम्यान पालखेडचे पाणी आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणीमिळाले नसले तरी ,अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची पाणी टंचाई काही काळ लांबणीवर पडली होती.सन २०१७-१८ मध्ये डिसेंबर मध्येच पाणी टंचाई भासू लागल्याने प्रस्ताव दाखल झाले आहेत.