शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात डिसेंबरमध्येच पाणी टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 14:29 IST

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तिव्रता डिसेंबर मध्येच जाणवू लागली असून तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणी टंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरु वात झाली आहे.

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तिव्रता डिसेंबर मध्येच जाणवू लागली असून तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणी टंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरु वात झाली आहे.विहिरीचे श्रोत आटल्याने व तळ उघडा पडू लागल्याने,टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी तीन गावे आणि एक वाडीचा टँकर मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समीतित दाखल झाला आहे.पाणी टँकर अद्याप तालुक्यात सुरु नसला तरी गावोगावचे पाणीटंचाईचे ठराव यायला सुरूवात झाली आहे.यामुळे आगामी सहा महिन्यात पाणी टंचाई तालुक्याला हैराण करणार असल्याचे चित्र आजच दिसत आहे.पंचायत समिती आणि तहसील संयुक्त पाहणी दौरा मात्र अजून सुरु झालेला नाही.तालुक्यातील अहेरवाडी, खैरगव्हाण, कूसमाडी ही तीन गावे आणिगोपाळवाडीचे (खैरगव्हाण) प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहे.असा होतो पाणीटँकर मागणीचा प्रस्ताव मंजूरपाणीटंचाईच्या गावात प्रथम ग्रामपंचायतीत महिला कमिटी टंचाईचा ठराव करून पंचायत समतिीकडे प्रस्ताव दाखल करतात.गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती संबंधित पाणीटंचाईच्या गावाला पाहणी करते. त्यानंतर आवश्यकता असल्यास, सदरचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतिम मंजुरीनंतर पाणीटंचाई गावाला पाणी टँकर सुरु होतो.पाणी टंचाई कृती आराखडागेल्या वर्षी सन २०१५-१६ मध्ये येवला तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अंतिम टप्प्यात तब्बल ६३ गावे,४४ वाड्यांना, ३३ टँकरद्वारे दररोज 116 खेपा करण्याची वेळ आली होती.सन 2016-17 मध्ये 482 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली होती,तरी तालुका पाणी टँकर मुक्त होण्यासाठी नवीन पाणीश्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच कायम राहिली आहे. यंदा दरम्यान पालखेडचे पाणी आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणीमिळाले नसले तरी ,अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची पाणी टंचाई काही काळ लांबणीवर पडली होती.सन २०१७-१८ मध्ये डिसेंबर मध्येच पाणी टंचाई भासू लागल्याने प्रस्ताव दाखल झाले आहेत.