शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता

By admin | Updated: July 3, 2016 00:39 IST

पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा १५ टक्के पाणीसाठा उरला असून, त्यातही महापालिकेचा आरक्षित पाणीसाठा अवघा २० ते २२ दिवस पुरेल इतकाच असल्याने प्रशासनाकडून पाणीकपातीसंदर्भात फेरनियोजनाचा विचार सुरू असून, पुढील आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. फेरनियोजनात शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाण्याची चर्चा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९१७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेचे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ३३८ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यात दारणा धरणातून पाणी उचलणे शक्य नसल्याने शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनीही दारणातून उपसा थांबविण्याचे आदेश दिले असल्याने महापालिकेची सारी भिस्त गंगापूर धरणावरच आहे. दारणातील १३४ दलघफू आरक्षण शिल्लक आहे. तर गंगापूरमधून अवघे २०४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे प्रतिदिन १० दलघफू पाण्याची उचल लक्षात घेता अवघे वीस दिवस पुरेल इतके पाणी आरक्षण शिल्लक आहे. सदर पाणी २० ते २२ जुलैपर्यंत पुरवता येईल, परंतु पुढे उर्वरित पाण्यातून उपसा करावा लागणार आहे. त्यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे. तत्पूर्वी, आहे ते आरक्षित पाणी ३१ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी मनपाने पाणीकपातीसंबंधी फेरनियोजनाचा विचार सुरू केला आहे. शहरात जून महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली तर गेल्या दोन दिवसांपासून केवळ रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरावर जलसंकट घोंघावत आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातील बचतीकरिता आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत आठवड्यातील दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. (प्रतिनिधी)