शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता

By admin | Updated: July 3, 2016 00:39 IST

पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा १५ टक्के पाणीसाठा उरला असून, त्यातही महापालिकेचा आरक्षित पाणीसाठा अवघा २० ते २२ दिवस पुरेल इतकाच असल्याने प्रशासनाकडून पाणीकपातीसंदर्भात फेरनियोजनाचा विचार सुरू असून, पुढील आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. फेरनियोजनात शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाण्याची चर्चा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९१७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेचे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ३३८ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यात दारणा धरणातून पाणी उचलणे शक्य नसल्याने शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनीही दारणातून उपसा थांबविण्याचे आदेश दिले असल्याने महापालिकेची सारी भिस्त गंगापूर धरणावरच आहे. दारणातील १३४ दलघफू आरक्षण शिल्लक आहे. तर गंगापूरमधून अवघे २०४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे प्रतिदिन १० दलघफू पाण्याची उचल लक्षात घेता अवघे वीस दिवस पुरेल इतके पाणी आरक्षण शिल्लक आहे. सदर पाणी २० ते २२ जुलैपर्यंत पुरवता येईल, परंतु पुढे उर्वरित पाण्यातून उपसा करावा लागणार आहे. त्यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे. तत्पूर्वी, आहे ते आरक्षित पाणी ३१ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी मनपाने पाणीकपातीसंबंधी फेरनियोजनाचा विचार सुरू केला आहे. शहरात जून महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली तर गेल्या दोन दिवसांपासून केवळ रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरावर जलसंकट घोंघावत आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातील बचतीकरिता आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत आठवड्यातील दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. (प्रतिनिधी)