शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

हटवादी जलसंपदा, मनपाच्या गलथान कारभारामुळे नाशिककरांवर जलसंकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

धरणांचा जिल्हा अशी नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मराठवाड्याची तृष्णा भागवण्याची क्षमता असलेल्या या जिल्ह्यात नाशिक शहरालासुध्दा मुबलक पाणीपुरवठा करता ...

धरणांचा जिल्हा अशी नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मराठवाड्याची तृष्णा भागवण्याची क्षमता असलेल्या या जिल्ह्यात नाशिक शहरालासुध्दा मुबलक पाणीपुरवठा करता येत नाही अशी अवस्था आहे. नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दर नाशिकराेड भागाला दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणाला कश्यपी आणि गौतमी गोदावरी दोन जोडधरणांची जोड असल्याने अडचण नाही. मात्र, गंगापूर धरणातून थेट जलावाहिनी योजना राबवण्यात आली, त्यावेळी दीडशे फूट खोल जलविहीर (जॅकवेल) खोदण्यात आली. त्या ठिकाणी धरणाच्या सखल भागातील पाणी यावे यासाठी अवघ्या काही मीटर अंतराचा चर खोदण्याचे काम गेल्या पंचवीस वर्षांत पूर्ण झालेले नाही. दरवेळी धरणातील पाणी कमी होण्याची वाट बघितली जाते. त्यावेळी चर्चा होते. विशेषत: पाणी कपात करण्याची वेळ आली की त्यावर जोरदार चर्चा सुरू होते. परंतु नंतर पाऊस सुरू झाला की, ज्यावेळी पावसाळा ओढ देईल आणि पाणी कपातीची वेळ येईल त्याचवेळी याबाबत चर्चा होते.

दारणा धरणाच्या बाबतीत जलसंपदाच्या हटवादीपणाची जोड मिळाली आहे. दारणा धरणातून रोज सुमारे चार दशलक्ष घनफूट पाणी नाशिक महापालिका चेहेडी बंधाऱ्यातून घेत असते. मात्र, देवळाली कॅम्प परिसरातील अनेक गावांचे मलमूत्र बंधाऱ्यात येत असल्याने शुध्दीकरणाला अडचणी येतात. परंतु उन्हाळ्यात दोन महिन्यांत अडचणी येत असल्याने पाणीपुरवठा होत असतो. यंदा मात्र, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अडचण आली आणि नंतर तेव्हापासून दारणा धरणातून महापालिकेचे आरक्षण असताना पाणी उचलणे बंद करण्यात आले. महापालिकेची मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना गेल्यावर्षी कायान्वित झाल्याने दारणा समूहातील धरण म्हणून दारणाचे आरक्षण मुकणे धरणातून द्यावे, अशी मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली. मात्र, त्यांनी त्याची दखलही घेतली नाही.

त्यामुळे दारणा धरणात पुरेसे आरक्षण असतानाही नाशिकरोड भागाला गंगापूर धरणातून पाणी द्यावे लागले, त्यामुळे तेथील आरक्षण लवकर संपुष्टात आले. आणि नाशिककरांना एकवेळ पाणी कपातीला सामाेरे जावे लागले आहे.

इन्फो...

मुकणे धरणात महापालिकेला ४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मिळाले आहे. त्यातील अवघे १३ दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले. उर्वरित सर्व म्हणजे ३८३ दशलक्ष घनफूट आरक्षण शिल्लक आहे. मात्र, त्याचा वापर महापालिकेला करता येत नाही.

इन्फो..

गंगापूर धरणात चर खोदण्याचे काम करण्यास कोणाचीही इच्छा नाही त्यामुळे तहान लागल्यानंतर चर खोदण्याची चर्चा होते, परंतु त्याचा उपयोग हाेत नाही.