शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शहरावर पाणीकपातीचे संकट

By admin | Updated: September 7, 2015 00:19 IST

पावसाची अवकृपा : गंगापूर धरण समूहात ५८ टक्के साठा

नाशिक : मान्सून आता परतीच्या वाटेवर असताना अद्यापही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात अवघा ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सप्टेंबर महिन्यात पावसाची अवकृपा झाल्यास नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पाणीकपातीच्या संबंधी चाचपणी सुरू असून, आणखी पंधरा दिवस पाऊस न पडल्यास पाणीकपात अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत पूर्वा नक्षत्रात थोड्या फार पर्जन्यवृष्टीचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविलेला असल्याने नाशिककरांना अजूनही मोठ्या पावसाची आस लागून आहे. नाशिक शहराला गंगापूर धरण समूहातून पाणीपुरवठा केला जातो. दि. ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ३७८० दलघफू (६७ टक्के), तर काश्यपी धरणात ८२८ दलघफू (४५ टक्के) आणि गौतमी-गोदावरी धरणात ७९५ दलघफू (४२) टक्के इतका पाणीसाठा आहे. गंगापूर धरणसमूहात एकूण ५४०३ दलघफू (५८ टक्के) पाणीसाठा असून, दारणा धरणात ३६७६ दलघफू (५१) टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ९५ टक्के, तर धरण समुहात ८३ टक्के इतका पाणीसाठा होता, तर दारणा धरणात ९८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात आता घट होऊ लागली असून, त्यातच सिंहस्थ कुंभमेळा सुरू असल्याने गोदावरीला अधून मधून पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे. दोन वर्षांपूर्वी अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या महापौरपदाच्या काळात सुरुवातीला पाणीकपातीचे संकट येऊन ठेपले होते. त्यावेळी महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होता. या निर्णयाला नाशिककरांनी साथही दिली होती. नंतर पाऊस भरभरून बरसल्याने पाणीकपात मागे घेण्यात आली होती. विशेष म्हणजे शहराला हिवाळा आणि पावसाळ्यात एक वेळ पाणीपुरवठा करण्यासंदर्भातही नागरिकांकडून सूचना आल्या होत्या. यंदा जून-जुलैमध्ये पाऊस कोसळल्यानंतर आॅगस्टमध्ये पावसाने ओढ दिलेली आहे. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची वेळ येऊन ठेपली असून, सप्टेंबरअखेर समाधानकारक पाऊस न पडल्यास शहरात पाणीकपात अपरिहार्य मानली जात आहे. महापालिका प्रशासन पाणीकपातीबाबत चाचपणी करत असून, गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० ते ८५ टक्क्यांवर जाऊन न पोहोचल्यास उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्चपासूनच टंचाईच्या झळा जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)