शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरावर पाणीकपातीचे संकट

By admin | Updated: September 7, 2015 00:19 IST

पावसाची अवकृपा : गंगापूर धरण समूहात ५८ टक्के साठा

नाशिक : मान्सून आता परतीच्या वाटेवर असताना अद्यापही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात अवघा ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सप्टेंबर महिन्यात पावसाची अवकृपा झाल्यास नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पाणीकपातीच्या संबंधी चाचपणी सुरू असून, आणखी पंधरा दिवस पाऊस न पडल्यास पाणीकपात अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत पूर्वा नक्षत्रात थोड्या फार पर्जन्यवृष्टीचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविलेला असल्याने नाशिककरांना अजूनही मोठ्या पावसाची आस लागून आहे. नाशिक शहराला गंगापूर धरण समूहातून पाणीपुरवठा केला जातो. दि. ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ३७८० दलघफू (६७ टक्के), तर काश्यपी धरणात ८२८ दलघफू (४५ टक्के) आणि गौतमी-गोदावरी धरणात ७९५ दलघफू (४२) टक्के इतका पाणीसाठा आहे. गंगापूर धरणसमूहात एकूण ५४०३ दलघफू (५८ टक्के) पाणीसाठा असून, दारणा धरणात ३६७६ दलघफू (५१) टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ९५ टक्के, तर धरण समुहात ८३ टक्के इतका पाणीसाठा होता, तर दारणा धरणात ९८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात आता घट होऊ लागली असून, त्यातच सिंहस्थ कुंभमेळा सुरू असल्याने गोदावरीला अधून मधून पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे. दोन वर्षांपूर्वी अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या महापौरपदाच्या काळात सुरुवातीला पाणीकपातीचे संकट येऊन ठेपले होते. त्यावेळी महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होता. या निर्णयाला नाशिककरांनी साथही दिली होती. नंतर पाऊस भरभरून बरसल्याने पाणीकपात मागे घेण्यात आली होती. विशेष म्हणजे शहराला हिवाळा आणि पावसाळ्यात एक वेळ पाणीपुरवठा करण्यासंदर्भातही नागरिकांकडून सूचना आल्या होत्या. यंदा जून-जुलैमध्ये पाऊस कोसळल्यानंतर आॅगस्टमध्ये पावसाने ओढ दिलेली आहे. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची वेळ येऊन ठेपली असून, सप्टेंबरअखेर समाधानकारक पाऊस न पडल्यास शहरात पाणीकपात अपरिहार्य मानली जात आहे. महापालिका प्रशासन पाणीकपातीबाबत चाचपणी करत असून, गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० ते ८५ टक्क्यांवर जाऊन न पोहोचल्यास उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्चपासूनच टंचाईच्या झळा जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)