शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

शहरावर पाणीकपातीचे संकट

By admin | Updated: September 7, 2015 00:19 IST

पावसाची अवकृपा : गंगापूर धरण समूहात ५८ टक्के साठा

नाशिक : मान्सून आता परतीच्या वाटेवर असताना अद्यापही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात अवघा ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सप्टेंबर महिन्यात पावसाची अवकृपा झाल्यास नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पाणीकपातीच्या संबंधी चाचपणी सुरू असून, आणखी पंधरा दिवस पाऊस न पडल्यास पाणीकपात अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत पूर्वा नक्षत्रात थोड्या फार पर्जन्यवृष्टीचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविलेला असल्याने नाशिककरांना अजूनही मोठ्या पावसाची आस लागून आहे. नाशिक शहराला गंगापूर धरण समूहातून पाणीपुरवठा केला जातो. दि. ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ३७८० दलघफू (६७ टक्के), तर काश्यपी धरणात ८२८ दलघफू (४५ टक्के) आणि गौतमी-गोदावरी धरणात ७९५ दलघफू (४२) टक्के इतका पाणीसाठा आहे. गंगापूर धरणसमूहात एकूण ५४०३ दलघफू (५८ टक्के) पाणीसाठा असून, दारणा धरणात ३६७६ दलघफू (५१) टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ९५ टक्के, तर धरण समुहात ८३ टक्के इतका पाणीसाठा होता, तर दारणा धरणात ९८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात आता घट होऊ लागली असून, त्यातच सिंहस्थ कुंभमेळा सुरू असल्याने गोदावरीला अधून मधून पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे. दोन वर्षांपूर्वी अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या महापौरपदाच्या काळात सुरुवातीला पाणीकपातीचे संकट येऊन ठेपले होते. त्यावेळी महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होता. या निर्णयाला नाशिककरांनी साथही दिली होती. नंतर पाऊस भरभरून बरसल्याने पाणीकपात मागे घेण्यात आली होती. विशेष म्हणजे शहराला हिवाळा आणि पावसाळ्यात एक वेळ पाणीपुरवठा करण्यासंदर्भातही नागरिकांकडून सूचना आल्या होत्या. यंदा जून-जुलैमध्ये पाऊस कोसळल्यानंतर आॅगस्टमध्ये पावसाने ओढ दिलेली आहे. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची वेळ येऊन ठेपली असून, सप्टेंबरअखेर समाधानकारक पाऊस न पडल्यास शहरात पाणीकपात अपरिहार्य मानली जात आहे. महापालिका प्रशासन पाणीकपातीबाबत चाचपणी करत असून, गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० ते ८५ टक्क्यांवर जाऊन न पोहोचल्यास उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्चपासूनच टंचाईच्या झळा जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)