शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

एकलहरेचे पाणी देऊनही शहरावर पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 23:58 IST

तिढा कायम : आज निर्णय होण्याची शक्यता

नाशिक : नाशिककरांवर आणखी पाणीकपात न लादता एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित ३०० दलघफू पाणी महापालिकेला देण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जाण्याचे संकेत मिळत असले तरी या वाढीव पाण्यानंतरही शहरावर पाणीकपातीचे संकट कायम राहणार असल्याची गणिते मांडली जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीप्रश्नी कायम असलेला हा तिढा बुधवारी (दि.३) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात वाढीव पाणीकपात करायची की नाही, या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता आणखी पाणीकपातीचा आग्रह सत्ताधारी आघाडीने धरला आहे, तर भाजपाने पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपातीची गरज नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणीकपातीचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासनाकडून महापालिकेसाठी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित असलेल्या पाण्यातून ३०० दलघफू पाणी देण्याचा निर्णय घेतला जाण्याचे संकेत मिळाले असून, आमदार देवयानी फरांदे यांनीही त्यास दुजोरा दिलेला आहे. मात्र, एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला नाशिककरांची ३१ जुलैपर्यंत तहान भागविण्यासाठी आणखी ३०० दलघफू पाण्याची गरज भासणार असल्याची आकडेवारी सत्ताधारी आघाडीकडून मांडली जात आहे. २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीनुसार, महापालिका गंगापूर धरणातून प्रतिदिन ११.३५ दलघफू पाणी उचलत असल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी गंगापूर धरण समूहात ३०६५ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. महापालिकेसाठी २७०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, त्यातील १२०० दलघफू पाण्याची उचल झालेली आहे. त्यामुळे मनपासाठी १५०० दलघफू पाणी शिल्लक आहे. महापालिकेला १८६ दिवसांसाठी २१११ दलघफू पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे शासनाने एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला सुमारे ३०० दलघफू पाण्याची आणखी गरज भासणार आहे. म्हणजेच सुमारे २७ दिवस पाणी पुरणार नसल्याचे स्पष्ट होते. २७ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेला वाढीव पाणीकपात करणे भागच पडणार असल्याची भूमिका सत्ताधारी आघाडीकडून घेतली जात आहे. सदर पाणीकपात ३५ टक्क्यांवर न्यायची की आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवून तूट भरून काढायची, एवढाच काय तो लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत सत्ताधारी आघाडीतील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. (प्रतिनिधी)