शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

एकलहरेचे पाणी देऊनही शहरावर पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 23:58 IST

तिढा कायम : आज निर्णय होण्याची शक्यता

नाशिक : नाशिककरांवर आणखी पाणीकपात न लादता एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित ३०० दलघफू पाणी महापालिकेला देण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जाण्याचे संकेत मिळत असले तरी या वाढीव पाण्यानंतरही शहरावर पाणीकपातीचे संकट कायम राहणार असल्याची गणिते मांडली जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीप्रश्नी कायम असलेला हा तिढा बुधवारी (दि.३) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात वाढीव पाणीकपात करायची की नाही, या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता आणखी पाणीकपातीचा आग्रह सत्ताधारी आघाडीने धरला आहे, तर भाजपाने पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपातीची गरज नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणीकपातीचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासनाकडून महापालिकेसाठी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित असलेल्या पाण्यातून ३०० दलघफू पाणी देण्याचा निर्णय घेतला जाण्याचे संकेत मिळाले असून, आमदार देवयानी फरांदे यांनीही त्यास दुजोरा दिलेला आहे. मात्र, एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला नाशिककरांची ३१ जुलैपर्यंत तहान भागविण्यासाठी आणखी ३०० दलघफू पाण्याची गरज भासणार असल्याची आकडेवारी सत्ताधारी आघाडीकडून मांडली जात आहे. २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीनुसार, महापालिका गंगापूर धरणातून प्रतिदिन ११.३५ दलघफू पाणी उचलत असल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी गंगापूर धरण समूहात ३०६५ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. महापालिकेसाठी २७०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, त्यातील १२०० दलघफू पाण्याची उचल झालेली आहे. त्यामुळे मनपासाठी १५०० दलघफू पाणी शिल्लक आहे. महापालिकेला १८६ दिवसांसाठी २१११ दलघफू पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे शासनाने एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला सुमारे ३०० दलघफू पाण्याची आणखी गरज भासणार आहे. म्हणजेच सुमारे २७ दिवस पाणी पुरणार नसल्याचे स्पष्ट होते. २७ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेला वाढीव पाणीकपात करणे भागच पडणार असल्याची भूमिका सत्ताधारी आघाडीकडून घेतली जात आहे. सदर पाणीकपात ३५ टक्क्यांवर न्यायची की आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवून तूट भरून काढायची, एवढाच काय तो लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत सत्ताधारी आघाडीतील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. (प्रतिनिधी)