शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

घरांमध्ये पाणी शिरूनही पालिका थंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 22:11 IST

दावे फोल : पालिकेने दखल घेतली नसल्याच्या तक्रारी

 नाशिक : गेल्या तीन ते चार दिवस संततधार सुरू असल्याने महापालिकेने धावपळ करून नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक केली असल्याचा दावा केला असला तरी गंगापूर आणि संभाजी चौकातील नागरिकांना मात्र वेगळाच अनुभव आला. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.गेल्या शनिवारपासून शहरात संततधार सुरू झाली. मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यादरम्यान शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेने तातडीने उपाययोजना केल्याचा दावा प्रशासनाने केला आणि नागरिकांच्या घरातील पाणी उपसले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र अनेक तक्रारींना दाद मिळाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गंगापूररोडवर प्रसाद मंगल कार्यालयाजवळ नक्षत्र कॉलनी येथे अशाच प्रकारे रस्त्यावर तुंबलेले पाणी गटारींमध्ये शिरून आणि त्यानंतर पुढील भागात चेंबरमधून निघालेले पाणी सुनील मटाले, भीमाबाई देवरे आणि अन्य चार ते पाच नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नागरिकांनी यासंदर्भात पश्चिम विभाग कार्यालयाशी संपर्क साधला, मात्र हे काम पाणीपुरवठा विभागाचे तर कधी बांधकाम तर कधी गटार विभागाचे असल्याचे सांगत टाळाटाळ करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीचे किशोर शिरसाट यांनी केली आहे.संभाजी चौकात तर नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाल्याने पालिकेकडे तक्रार करून कोणताही उपयोग झाला नसल्याची तक्रार भाजपाच्या अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली आहे. संभाजी चौकात या घरांच्या जवळूनच जाणाऱ्या नासर्डी नदीपात्राला पूर आल्याने येथील रस्त्याचा काही भाग खचून झाडे उन्मळून पडली. त्यामुळे नागरिकांचा मार्गच बंद झाला. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणी त्याची दखल घेतली नसल्याचे गणेश कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)