शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

घरांमध्ये पाणी शिरूनही पालिका थंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 22:11 IST

दावे फोल : पालिकेने दखल घेतली नसल्याच्या तक्रारी

 नाशिक : गेल्या तीन ते चार दिवस संततधार सुरू असल्याने महापालिकेने धावपळ करून नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक केली असल्याचा दावा केला असला तरी गंगापूर आणि संभाजी चौकातील नागरिकांना मात्र वेगळाच अनुभव आला. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.गेल्या शनिवारपासून शहरात संततधार सुरू झाली. मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यादरम्यान शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेने तातडीने उपाययोजना केल्याचा दावा प्रशासनाने केला आणि नागरिकांच्या घरातील पाणी उपसले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र अनेक तक्रारींना दाद मिळाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गंगापूररोडवर प्रसाद मंगल कार्यालयाजवळ नक्षत्र कॉलनी येथे अशाच प्रकारे रस्त्यावर तुंबलेले पाणी गटारींमध्ये शिरून आणि त्यानंतर पुढील भागात चेंबरमधून निघालेले पाणी सुनील मटाले, भीमाबाई देवरे आणि अन्य चार ते पाच नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नागरिकांनी यासंदर्भात पश्चिम विभाग कार्यालयाशी संपर्क साधला, मात्र हे काम पाणीपुरवठा विभागाचे तर कधी बांधकाम तर कधी गटार विभागाचे असल्याचे सांगत टाळाटाळ करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीचे किशोर शिरसाट यांनी केली आहे.संभाजी चौकात तर नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाल्याने पालिकेकडे तक्रार करून कोणताही उपयोग झाला नसल्याची तक्रार भाजपाच्या अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली आहे. संभाजी चौकात या घरांच्या जवळूनच जाणाऱ्या नासर्डी नदीपात्राला पूर आल्याने येथील रस्त्याचा काही भाग खचून झाडे उन्मळून पडली. त्यामुळे नागरिकांचा मार्गच बंद झाला. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणी त्याची दखल घेतली नसल्याचे गणेश कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)