शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

औद्योगिक वसाहतीवर वाढले जलसंकट

By admin | Updated: April 10, 2016 00:09 IST

औद्योगिक वसाहतीवर वाढले जलसंकट

सातपूर : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी साठ्यात घट होत असताना औद्योगिक क्षेत्रावरही जलकंसट कोसळले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसे पाणी नसल्याने आता एकूण वीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार अतिरिक्त पाच टक्के पाणीकपात येत्या काही दिवसात होणार आहे.सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत आधी दहा मग पंधरा अशी पाणीकपात करण्यात आली आहे; मात्र धरणात पुरेसा साठा नसल्याने आणि त्यामुळेच पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच औद्योगिक वसाहतीला एकूण २० टक्के पाणीकपात करावी, अशा सूचना जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत असून त्या अनुषंगाने आता पाणीकपात करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून ही कपात लागू करण्यात येणार असली तरी त्याची अद्यापी अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तथापि, अंमलबजावणी करण्याची तयारी महामंडळाने सुरू केली आहे. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीला गंगापूर धरणातूनच पाणीपुरवठा होतो.महामंडळाने प्रतिदिन २४ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे उपसा आणि जलशुद्धीकरण केंद्र बांधले असले तरी सध्या २० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातही पंधरा टक्के अगोदरच कपात करण्यात आली होती. आता ही कपात आणखी वाढविण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. त्यादृष्टीने चालू महिन्यात त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपअभियंता संजय पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)