शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांसाठी व्हावा भुयारीमार्ग

By admin | Updated: November 5, 2016 01:40 IST

द्वारका चौफुली : महामार्ग विभागाच्या प्रस्तावाची गरज; सध्याच्या मार्गाचा व्हावा पुनर्विचार

 नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलामुळे द्वारका चौफुलीवर निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण आता विविध उपाययोजना हाती घेत आहेत. मात्र, त्याठिकाणी उभारलेला पादचारी भुयारीमार्ग वापराविना पडून आहे, त्यामुळे हा भुयारी पादचारी मार्ग न ठेवता छोट्या हलक्या वाहनांसाठी खुला केला, तर समस्या दूर होऊ शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने त्याचा विचार करण्याची गरज आहे.महामार्गावर उड्डाणपूल साकारल्यानंतर शहरातील वाहतूक समस्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढली आहे. त्यासंदर्भात विविध आमदारांनी सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून महामार्ग प्राधिकरणाने सुधारणा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार शनिवारी (दि.५) द्वारका चौफुली येथेदेखील सुधारणा करण्यात येणार आहे. द्वारका चौफुली ही अत्यंत महत्त्वाची असून, मुंबई-आग्रा महामार्गाला नाशिक-पुणे महामार्ग जोडला जातो. त्यातच नाशिकरोड येथे जाणारे-येणारे प्रामुख्याने याच मार्गाचा वापर करतात. महामार्गाला समांतर रस्ते, महामार्ग बसस्थानक तसेच त्याच्याविरुद्ध दिशेला म्हणजे पंचवटीकडेदेखील जाण्याची सोय आहे. परिसरात शाळा, शासकीय कार्यालये, बस थांबे आणि व्यापारी संकुले असल्याने वाहनांबरोबरच पादचाऱ्यांची गर्दी असते. गर्दीच्या वेळी वाहतुकीचा चक्रव्यूह भेदून जाणे दिव्यच असते. उड्डाणपूल तयार करताना महामार्ग प्राधीकरणाने पुलाखालील वाहतूक सुकर व्हावी यासाठी द्वारका पोलीस चौकी ते रस्ता ओलांडून हनुमान मंदिराजवळ निघणारा भुयारी पादचारी मार्ग तयार केला आहे; मात्र सुरुवातीपासूनच तो अडचणीचा ठरत आहे. आधी या भुयारीमार्गात लाइट नव्हते ते असले तरी त्याचा वापर कोणी करीत नाही, सामान्यांना असुरक्षित वाटणाऱ्या या मार्गाचा ताबा व्यसनी मंडळींनी घेतला, येथे प्रातर्विधीही केले जात असल्याने आता भुयारीमार्ग जवळपास बंदच आहे. त्याचा वापर वाढावा आणि भुयारी मार्गातून बाहेर पडताना असलेल्या ठिकाणी वाहनांना वळसा घालताना होणारी अडचण लक्षात घेऊन भुयारीमार्गाचे काहीसे स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांच्या मानसिकतेचा विचार केला तर कितपत त्याचा उपयोग होईल या विषयी शंका आहे. त्यामुळे पुण्याला जाताना नाशिक फाटा तसेच पिंप्री-चिंचवड येथे ज्या पद्धतीने वाहनांसाठी बायपासची सोय केली आहे, त्याच धर्तीवर भूयारीमार्गातून हलक्या मोटारी जाण्या येण्याची सोय केली तरी अधिक सोयीचे ठरू शकते. त्यामुळे प्राधिकरणाने त्याचाही विचार करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)