शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सांडपाणी व्यवस्थापन; २५ टक्के तरतूद करा

By admin | Updated: January 15, 2015 00:01 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महानगरपालिकेला आदेश

नाशिक : महापालिकेमार्फत सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रांमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाची हानी होत असून, महापालिकेने परिपूर्ण सांडपाणी व्यवस्थापन आणि नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक वर्षी एकूण भांडवली खर्चापैकी २५ टक्के तरतूद करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिक महापालिकेला केली आहे. याबाबत स्थायी समिती व महासभेची मान्यता घेऊन पूर्तता अहवाल सादर करण्याचे आदेशही मंडळाने दिले आहेत. दरम्यान, येत्या महासभेवर सदरचा प्रस्ताव प्रशासनामार्फत ठेवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणारे घरगुती सांडपाणी गोळा करून व त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि तसे संमतीपत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेणे बंधनकारक आहे. याचबरोबर घनकचऱ्याबाबतही योग्य ती व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र नाशिक महापालिकेने संपूर्ण सांडपाण्याचे संकलन व प्रक्रिया करण्याकरिता परिपूर्ण योजना आजतागायत कार्यान्वित केली नसल्याने सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडून दिले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व सांडपाणी एकत्र करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा बसवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी तसेच घनकचऱ्याबाबतही योग्य विल्हेवाट लावावी. यासाठी महापालिकेने एकूण भांडवली खर्चात २५ टक्के तरतूद करून ते या प्रकल्पावर खर्च करावे व कायदेशीर पूर्तता पार पाडावी, अशी सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने २५ टक्के तरतूद करण्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवला असून, महासभा व स्थायी समितीच्या मान्यतेनंतर तसा अहवाल मंडळाला सादर केला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)