शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विरोधकांना सावधानतेचा इशारा देणारे निकाल

By किरण अग्रवाल | Updated: May 24, 2019 02:33 IST

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ...

ठळक मुद्दे जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे.कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले.भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याकडे ‘मोदी फॅक्टर’ म्हणून पाहता येणारे असले तरी, त्याला सहज म्हणून घेता येऊ नये.नाशिकमधूनहेमंत गोडसेदिंडोरी येथून डॉ. भारती पवार हे दोन्ही उमेदवार सुमारे दोन लाखांच्या फरकांनी निवडून आले आहेत. नाशिकमध्ये अठरा उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने तिरंगी ते चौरंगी लढतीच्या अपेक्षा केल्या जात होत्या. दिंडोरीतही आठ उमेदवार होते, पण तिरंगी लढत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार असतानाही दोन लाखांचे मताधिक्य लाभावे, ही साधी बाब नाही. यात अंतिमत: पंतप्रधान मोदी यांचाच करिष्मा कामी आलेला असला तरी विरोधकांना, मग ते पक्ष असो की उमेदवार; आपल्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण करता आली नसल्याचेच म्हणता यावे.नाशकात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ भुजबळ यांना तर वंचित आघाडीचे पवन पवार यांच्यामुळे घडून येणाºया मतविभाजनाचा फायदा गोडसे यांना होण्याची अटकळ बांधली जात होती; परंतु कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले. का झाले असावे असे, तर लोकसभेसाठीच्या मोठ्या निवडणुकीत राजकीय पोकळी भरून काढू पाहणाºया पक्षांना अगर उमेदवारांना संधी न देण्याचीच अधिकतर मानसिकता मतदारांची असते. नाशकात तेच दिसून आले.विशेषत: भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा जो आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरावा.लोकसभेची व विधानसभेची गणिते वेगवेगळी असतात हे खरे असले तरी, लोकभावनांकडे दुर्लक्ष करता येऊ नये एवढा धडा तरी या निकालातून नक्कीच घेता यावा. कारण, ज्या पद्धतीने लोकसभेसाठी प्रचाराचे रण माजलेले दिसून आले त्याचीच पुनरावृत्ती तेव्हा होणे निश्चित आहे.की फॅक्टर काय ठरला?गोडसे यांच्याकडे पूर्णवेळ खासदार म्हणून बघितले गेले. आजपर्यंत खासदारकी भूषविलेल्या अन्य मान्यवरांनी पक्षातील जबाबदाऱ्यांसह अन्य सहकारी संस्थामध्येही आपली खुर्ची शाबूत ठेवून खासदारकी राखली होती. गोडसे यांनी अन्य संस्थांमध्ये मन न गुंतविल्याने त्यांचे विरोधक कमी होते.नाशकात छगन भुजबळ यांच्याबद्दल जशी सहानुभूतीची भावना व्यक्त होते तशी परिस्थिती समीर यांच्याबाबत नाही. भुजबळांना मध्यंतरी कारागृहात राहावे लागल्याने पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे. त्याचा लाभ समोरच्या उमेदवारास आपसूक झाला.भारती पवार यांनी राष्ट्रवादीतून येऊन भाजपची उमेदवारी घेतली असली आणि विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी डावलली गेली  असली तरी, चव्हाण उघडपणे विरोधाची भूमिका घेऊ शकले नव्हते. शिवाय, चव्हाण यांच्यासाठी पक्षाशी विद्रोह करणे स्वत:च्याच पायावर कुºहाड पाडून घेणारे ठरु शकते हे जाणून पक्षनेते प्रामाणिकपणे राबले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीHemant Godseहेमंत गोडसेSameer Bhujbalसमीर भुजबळ