शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विरोधकांना सावधानतेचा इशारा देणारे निकाल

By किरण अग्रवाल | Updated: May 24, 2019 02:33 IST

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ...

ठळक मुद्दे जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे.कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले.भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याकडे ‘मोदी फॅक्टर’ म्हणून पाहता येणारे असले तरी, त्याला सहज म्हणून घेता येऊ नये.नाशिकमधूनहेमंत गोडसेदिंडोरी येथून डॉ. भारती पवार हे दोन्ही उमेदवार सुमारे दोन लाखांच्या फरकांनी निवडून आले आहेत. नाशिकमध्ये अठरा उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने तिरंगी ते चौरंगी लढतीच्या अपेक्षा केल्या जात होत्या. दिंडोरीतही आठ उमेदवार होते, पण तिरंगी लढत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार असतानाही दोन लाखांचे मताधिक्य लाभावे, ही साधी बाब नाही. यात अंतिमत: पंतप्रधान मोदी यांचाच करिष्मा कामी आलेला असला तरी विरोधकांना, मग ते पक्ष असो की उमेदवार; आपल्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण करता आली नसल्याचेच म्हणता यावे.नाशकात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ भुजबळ यांना तर वंचित आघाडीचे पवन पवार यांच्यामुळे घडून येणाºया मतविभाजनाचा फायदा गोडसे यांना होण्याची अटकळ बांधली जात होती; परंतु कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले. का झाले असावे असे, तर लोकसभेसाठीच्या मोठ्या निवडणुकीत राजकीय पोकळी भरून काढू पाहणाºया पक्षांना अगर उमेदवारांना संधी न देण्याचीच अधिकतर मानसिकता मतदारांची असते. नाशकात तेच दिसून आले.विशेषत: भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा जो आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरावा.लोकसभेची व विधानसभेची गणिते वेगवेगळी असतात हे खरे असले तरी, लोकभावनांकडे दुर्लक्ष करता येऊ नये एवढा धडा तरी या निकालातून नक्कीच घेता यावा. कारण, ज्या पद्धतीने लोकसभेसाठी प्रचाराचे रण माजलेले दिसून आले त्याचीच पुनरावृत्ती तेव्हा होणे निश्चित आहे.की फॅक्टर काय ठरला?गोडसे यांच्याकडे पूर्णवेळ खासदार म्हणून बघितले गेले. आजपर्यंत खासदारकी भूषविलेल्या अन्य मान्यवरांनी पक्षातील जबाबदाऱ्यांसह अन्य सहकारी संस्थामध्येही आपली खुर्ची शाबूत ठेवून खासदारकी राखली होती. गोडसे यांनी अन्य संस्थांमध्ये मन न गुंतविल्याने त्यांचे विरोधक कमी होते.नाशकात छगन भुजबळ यांच्याबद्दल जशी सहानुभूतीची भावना व्यक्त होते तशी परिस्थिती समीर यांच्याबाबत नाही. भुजबळांना मध्यंतरी कारागृहात राहावे लागल्याने पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे. त्याचा लाभ समोरच्या उमेदवारास आपसूक झाला.भारती पवार यांनी राष्ट्रवादीतून येऊन भाजपची उमेदवारी घेतली असली आणि विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी डावलली गेली  असली तरी, चव्हाण उघडपणे विरोधाची भूमिका घेऊ शकले नव्हते. शिवाय, चव्हाण यांच्यासाठी पक्षाशी विद्रोह करणे स्वत:च्याच पायावर कुºहाड पाडून घेणारे ठरु शकते हे जाणून पक्षनेते प्रामाणिकपणे राबले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीHemant Godseहेमंत गोडसेSameer Bhujbalसमीर भुजबळ