शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना सावधानतेचा इशारा देणारे निकाल

By किरण अग्रवाल | Updated: May 24, 2019 02:33 IST

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ...

ठळक मुद्दे जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे.कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले.भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याकडे ‘मोदी फॅक्टर’ म्हणून पाहता येणारे असले तरी, त्याला सहज म्हणून घेता येऊ नये.नाशिकमधूनहेमंत गोडसेदिंडोरी येथून डॉ. भारती पवार हे दोन्ही उमेदवार सुमारे दोन लाखांच्या फरकांनी निवडून आले आहेत. नाशिकमध्ये अठरा उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने तिरंगी ते चौरंगी लढतीच्या अपेक्षा केल्या जात होत्या. दिंडोरीतही आठ उमेदवार होते, पण तिरंगी लढत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार असतानाही दोन लाखांचे मताधिक्य लाभावे, ही साधी बाब नाही. यात अंतिमत: पंतप्रधान मोदी यांचाच करिष्मा कामी आलेला असला तरी विरोधकांना, मग ते पक्ष असो की उमेदवार; आपल्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण करता आली नसल्याचेच म्हणता यावे.नाशकात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ भुजबळ यांना तर वंचित आघाडीचे पवन पवार यांच्यामुळे घडून येणाºया मतविभाजनाचा फायदा गोडसे यांना होण्याची अटकळ बांधली जात होती; परंतु कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले. का झाले असावे असे, तर लोकसभेसाठीच्या मोठ्या निवडणुकीत राजकीय पोकळी भरून काढू पाहणाºया पक्षांना अगर उमेदवारांना संधी न देण्याचीच अधिकतर मानसिकता मतदारांची असते. नाशकात तेच दिसून आले.विशेषत: भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा जो आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरावा.लोकसभेची व विधानसभेची गणिते वेगवेगळी असतात हे खरे असले तरी, लोकभावनांकडे दुर्लक्ष करता येऊ नये एवढा धडा तरी या निकालातून नक्कीच घेता यावा. कारण, ज्या पद्धतीने लोकसभेसाठी प्रचाराचे रण माजलेले दिसून आले त्याचीच पुनरावृत्ती तेव्हा होणे निश्चित आहे.की फॅक्टर काय ठरला?गोडसे यांच्याकडे पूर्णवेळ खासदार म्हणून बघितले गेले. आजपर्यंत खासदारकी भूषविलेल्या अन्य मान्यवरांनी पक्षातील जबाबदाऱ्यांसह अन्य सहकारी संस्थामध्येही आपली खुर्ची शाबूत ठेवून खासदारकी राखली होती. गोडसे यांनी अन्य संस्थांमध्ये मन न गुंतविल्याने त्यांचे विरोधक कमी होते.नाशकात छगन भुजबळ यांच्याबद्दल जशी सहानुभूतीची भावना व्यक्त होते तशी परिस्थिती समीर यांच्याबाबत नाही. भुजबळांना मध्यंतरी कारागृहात राहावे लागल्याने पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे. त्याचा लाभ समोरच्या उमेदवारास आपसूक झाला.भारती पवार यांनी राष्ट्रवादीतून येऊन भाजपची उमेदवारी घेतली असली आणि विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी डावलली गेली  असली तरी, चव्हाण उघडपणे विरोधाची भूमिका घेऊ शकले नव्हते. शिवाय, चव्हाण यांच्यासाठी पक्षाशी विद्रोह करणे स्वत:च्याच पायावर कुºहाड पाडून घेणारे ठरु शकते हे जाणून पक्षनेते प्रामाणिकपणे राबले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीHemant Godseहेमंत गोडसेSameer Bhujbalसमीर भुजबळ