शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

धोक्याचा इशारा देणारे ‘सायरन’ वाजले...

By admin | Updated: November 18, 2016 00:34 IST

‘नासंद’कडून चाचणी : भारत-पाक सीमेवरील तणाव; सायरन व्यवस्था अद्ययावत करण्यास प्रारंभ

 अझहर शेख नाशिकवेळ दहा वाजेची. नाशिककर दैनंदिन कामांसाठी रस्त्यावर आलेले असताना अचानकपणे शहरात ‘सायरन’चा आवाज सुरू होतो. दोन मिनिटांपर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये ऐकू येणाऱ्या आवाजाने नाशिककर अवाक् झाले. शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला काही धोका निर्माण झाला की काय, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली.एखाद्या शहराला धोका निर्माण झाल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्या शहराला सावधानतेचा इशारा देण्यासाठी विविध मोठ्या शहरांमध्ये शासनाच्या वतीने चार अश्वशक्तीचे सायरन विविध ठिकाणी बसविण्यात आले आहे. नाशिकमध्ये अकरा ठिकाणी भोंगे बसविण्यात आले आहेत. या अकरा भोंग्यांची आज नागरी संरक्षण दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासणी करून चाचणी घेतली. अकरा भोंग्यांपैकी आठ भोंगे सुस्थितीत असल्याचे आढळून आले असून, उर्वरित भोंग्यांची तातडीने देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भारत-पाक सीमेवर सर्जिकल स्ट्राइकनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या शहरांमधील ‘सायरन सिस्टम’ अद्ययावत करण्याचे आदेश केंद्राने विविध राज्यांना दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तत्काळ नागरी संरक्षण दलाला याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार गुरुवारी नागरी संरक्षण दलाने भोंग्याची अवस्था तपासण्यासाठी पावले उचलत विविध अकरा ठिकाणी भेटी दिल्या. भोंग्यांची तपासणी करून चाचणी घेण्यात आली. दोन मिनिटांपर्यंत भोंगा वाजवून त्याचा आवाज व क्षमता तपासण्यात आली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून, या शहरामध्ये संरक्षण, चलन मुद्रणाशी संबंधित यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे तत्काळ ‘अलर्ट सायरन’ची तपासणी करून चाचणी घेतली गेली. (प्रतिनिधी)