शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी संप्रदायाला हवी स्वतंत्र जागा

By admin | Updated: July 22, 2014 00:57 IST

रामकृष्ण लहवितकर महाराज : संप्रदायाच्या सात खालसांसाठी सोयी-सुविधा पुरवा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही पर्वणीसाठी लाखो वारकरी नाशिकला दाखल होतील; परंतु सुमारे एक लाख वारकरी पर्वणीकाळात महिनाभर नाशिक मुक्कामी राहणार असल्याने त्यांच्या निवासासाठी शासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय वारकरी कुंभमेळा परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण लहवितकर महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. वारकरी संप्रदायाचे सात खालसे असून, निर्माही आखाड्यांतर्गत हे खालसे सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होत आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अपेक्षांबाबत बोलताना रामकृष्ण लहवितकर महाराज यांनी सांगितले, साधू-महंतांसाठी उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामचा विषय अद्याप मार्गी लागलेला नाही. त्याबाबत जागेचा प्रश्न भिजत पडला आहे. साधुग्राममध्ये खालसांना जागा उपलब्ध करून दिल्या जातात परंतु वारकरी संप्रदायाच्या खालसांना छोटी जागा चालणार नाही. महाराष्ट्रात सुमारे दोन ते अडीच कोटी वारकरी आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक या प्रांतातूनही मोठ्या संख्येने वारकरी कुंभमेळ्यात शाही पर्वणीला येत असतात; परंतु पर्वणीकाळात सुमारे एक लाख वारकरी नाशिक क्षेत्री वास्तव्याला राहणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेत महिनाभर कीर्तन/प्रवचने तसेच ज्ञानेश्वरी-भागवत, गाथा, पारायणे आदि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आहे. शासनाकडून आळंदी-पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी फारशा काही सुविधा पुरविल्या जात नाहीत. वारकरी स्वत:च सुविधा उपलब्ध करून घेत आला आहे; परंतु शासनाने सिंहस्थात वारकऱ्यांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यात आरोग्य, चोवीस तास वीज, पाणीपुरवठा आदि सुविधांवर भर असावा. दुर्दैवाने प्रशासनाकडून त्याबाबत अद्याप कसल्याही हालचाली दिसून येत नाहीत. प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. संप्रदाय सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करत आला आहे. शासनाने वारकरी संप्रदायाला दुर्लक्षून चालणार नसल्याचेही लहवितकर महाराज यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाला कुंभमेळ्यात स्वतंत्र जागा मिळावी याबाबत आपण लवकरच पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगत लहवितकर महाराज म्हणाले, यजमान म्हणून कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना जागा कशी उपलब्ध करून द्यायची, ही चिंता आम्हाला पडली आहे. वारकरी संप्रदायाला शासनाकडून कोणताही पैसा-आडका नको, फक्त मुबलक जागा आणि सुविधा पुरवाव्यात. गोदावरी प्रदूषणाचाही मुद्दा नेहमी चर्चेत असतो. त्याबाबतही महापालिका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गोदावरीच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी देश-विदेशातून भाविक येतील, त्यांच्यासमोर आपल्या गोदावरीची खराब प्रतिमा जायला नको. मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने गोदावरी नदीवरील घाटाचेही विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागले पाहिजे. शाहीमार्ग हा पारंपरिकच असला पाहिजे. प्रामुख्याने हा प्रश्न साधू-महंतांशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच सोडवावा. वारकरी संप्रदायाचे सात खालसे निर्माेही आखाड्यांतर्गत कुंभस्नान करत असतात. ५२ द्वारांपैकी वारकरी संप्रदायाची नामदेव व ज्ञानदेव अशी दोन द्वारे आहेत. त्या द्वारांवर संप्रदाय स्नान करत असतो. वारकरी संप्रदायाचा तो अधिकारच आहे. प्रशासनाने निर्णय प्रक्रियेत वारकरी संप्रदायालाही सहभागी करून घेतले पाहिजे, असेही लहवितकर महाराज यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)