शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

वारकरी संप्रदायाला हवी स्वतंत्र जागा

By admin | Updated: July 22, 2014 00:57 IST

रामकृष्ण लहवितकर महाराज : संप्रदायाच्या सात खालसांसाठी सोयी-सुविधा पुरवा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही पर्वणीसाठी लाखो वारकरी नाशिकला दाखल होतील; परंतु सुमारे एक लाख वारकरी पर्वणीकाळात महिनाभर नाशिक मुक्कामी राहणार असल्याने त्यांच्या निवासासाठी शासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय वारकरी कुंभमेळा परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण लहवितकर महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. वारकरी संप्रदायाचे सात खालसे असून, निर्माही आखाड्यांतर्गत हे खालसे सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होत आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अपेक्षांबाबत बोलताना रामकृष्ण लहवितकर महाराज यांनी सांगितले, साधू-महंतांसाठी उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामचा विषय अद्याप मार्गी लागलेला नाही. त्याबाबत जागेचा प्रश्न भिजत पडला आहे. साधुग्राममध्ये खालसांना जागा उपलब्ध करून दिल्या जातात परंतु वारकरी संप्रदायाच्या खालसांना छोटी जागा चालणार नाही. महाराष्ट्रात सुमारे दोन ते अडीच कोटी वारकरी आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक या प्रांतातूनही मोठ्या संख्येने वारकरी कुंभमेळ्यात शाही पर्वणीला येत असतात; परंतु पर्वणीकाळात सुमारे एक लाख वारकरी नाशिक क्षेत्री वास्तव्याला राहणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेत महिनाभर कीर्तन/प्रवचने तसेच ज्ञानेश्वरी-भागवत, गाथा, पारायणे आदि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आहे. शासनाकडून आळंदी-पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी फारशा काही सुविधा पुरविल्या जात नाहीत. वारकरी स्वत:च सुविधा उपलब्ध करून घेत आला आहे; परंतु शासनाने सिंहस्थात वारकऱ्यांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यात आरोग्य, चोवीस तास वीज, पाणीपुरवठा आदि सुविधांवर भर असावा. दुर्दैवाने प्रशासनाकडून त्याबाबत अद्याप कसल्याही हालचाली दिसून येत नाहीत. प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. संप्रदाय सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करत आला आहे. शासनाने वारकरी संप्रदायाला दुर्लक्षून चालणार नसल्याचेही लहवितकर महाराज यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाला कुंभमेळ्यात स्वतंत्र जागा मिळावी याबाबत आपण लवकरच पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगत लहवितकर महाराज म्हणाले, यजमान म्हणून कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना जागा कशी उपलब्ध करून द्यायची, ही चिंता आम्हाला पडली आहे. वारकरी संप्रदायाला शासनाकडून कोणताही पैसा-आडका नको, फक्त मुबलक जागा आणि सुविधा पुरवाव्यात. गोदावरी प्रदूषणाचाही मुद्दा नेहमी चर्चेत असतो. त्याबाबतही महापालिका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गोदावरीच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी देश-विदेशातून भाविक येतील, त्यांच्यासमोर आपल्या गोदावरीची खराब प्रतिमा जायला नको. मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने गोदावरी नदीवरील घाटाचेही विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागले पाहिजे. शाहीमार्ग हा पारंपरिकच असला पाहिजे. प्रामुख्याने हा प्रश्न साधू-महंतांशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच सोडवावा. वारकरी संप्रदायाचे सात खालसे निर्माेही आखाड्यांतर्गत कुंभस्नान करत असतात. ५२ द्वारांपैकी वारकरी संप्रदायाची नामदेव व ज्ञानदेव अशी दोन द्वारे आहेत. त्या द्वारांवर संप्रदाय स्नान करत असतो. वारकरी संप्रदायाचा तो अधिकारच आहे. प्रशासनाने निर्णय प्रक्रियेत वारकरी संप्रदायालाही सहभागी करून घेतले पाहिजे, असेही लहवितकर महाराज यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)