शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:11 IST

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस कमी झाला तर गावाला जानेवारी-पासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. राजापूर गावाला नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा केला जातो.

ठळक मुद्देयेवला : टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तालुकावासीयांची मागणीअजूनपर्यंत टँकर सुरू झालेले नाहीत.

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस कमी झाला तर गावाला जानेवारी-पासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. राजापूर गावाला नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा केला जातो. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती, भैरवनाथवाडी, हवालदार वस्ती या वाड्यावस्तीवर पाण्याचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. राजापूर येथील वडपाटी पाझर तलाव हा काही वर्षांपूर्वी फुटला होता.राजापूर येथील ग्रामस्थांनी व नरेंद्र दराडे यांनी मदत केल्याने वडपाटी पाझर तलावात आजही पाणी आहे. ग्रामपंचायतीने वडपाटी येथे पाणीपुरवठा योजना राबवून राजापूरचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. राजापूर व वाड्यावस्त्यांवर त्वरित टॅँकर सुरू करावा, अशी मागणी शंकराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी, गोकुळ वाघ, लक्ष्मण घुगे, रवींद्र अलगट, सुभाष अलगट, सागर अलगट, प्रशांत वाघ आदींनी केली आहे.टँकरचे प्रस्ताव : अडकले लालफितीतयावर्षी पाऊस कमी झाल्याने लोहशिंगवे येथील विहीर व बोअरवेल आटल्याने राजापूर गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गरिबांना कामे नसल्यामुळे गरिबांच्या नशिबी पाणीटंचाई ही दरवर्षी पाचवीला पूजलेली आहे. राजापूर ग्रामपंचायतीने टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले आहे. मात्र अजूनपर्यंत टँकर सुरू झालेले नाहीत.