शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:11 IST

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस कमी झाला तर गावाला जानेवारी-पासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. राजापूर गावाला नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा केला जातो.

ठळक मुद्देयेवला : टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तालुकावासीयांची मागणीअजूनपर्यंत टँकर सुरू झालेले नाहीत.

राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस कमी झाला तर गावाला जानेवारी-पासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. राजापूर गावाला नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा केला जातो. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती, भैरवनाथवाडी, हवालदार वस्ती या वाड्यावस्तीवर पाण्याचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. राजापूर येथील वडपाटी पाझर तलाव हा काही वर्षांपूर्वी फुटला होता.राजापूर येथील ग्रामस्थांनी व नरेंद्र दराडे यांनी मदत केल्याने वडपाटी पाझर तलावात आजही पाणी आहे. ग्रामपंचायतीने वडपाटी येथे पाणीपुरवठा योजना राबवून राजापूरचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. राजापूर व वाड्यावस्त्यांवर त्वरित टॅँकर सुरू करावा, अशी मागणी शंकराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी, गोकुळ वाघ, लक्ष्मण घुगे, रवींद्र अलगट, सुभाष अलगट, सागर अलगट, प्रशांत वाघ आदींनी केली आहे.टँकरचे प्रस्ताव : अडकले लालफितीतयावर्षी पाऊस कमी झाल्याने लोहशिंगवे येथील विहीर व बोअरवेल आटल्याने राजापूर गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गरिबांना कामे नसल्यामुळे गरिबांच्या नशिबी पाणीटंचाई ही दरवर्षी पाचवीला पूजलेली आहे. राजापूर ग्रामपंचायतीने टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले आहे. मात्र अजूनपर्यंत टँकर सुरू झालेले नाहीत.