शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

एकलहºयातील वीज निर्मिती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:38 IST

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती घटल्याने राज्यात सक्तीचे भारनियमन सुरू असून, अद्यापही पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज निर्मिती संकटात सापडली आहे. एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात २१० मेगावॉटचे तीन संच आहेत, त्यापैकी दोन संच सुरू असून एक संच देखभाल दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.२१० मेगावॉटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. केंद्रात सध्या तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असून, केंद्राकडून मुख्यालयाकडे कोळशाची मागणी नोंदविण्यात आली आहे; मात्र कोळशाच्या उपलब्धतेबाबत मुख्यालयाकडून स्पष्ट कोणतेही कळविण्यात आले नसल्याने तीन दिवसाच्या आत कोळसा मिळू शकेल की नाही याविषयी एकलहरे केंद्रातीलच अधिकारी साशंक आहेत. कोळशाची मागणी नोंदविल्यानंतर मुख्यालयाने कोळसा पुरविण्याबाबत नियोजन केले जाईल असे म्हटले आहे; परंतु प्रत्यक्षात कधी आणि किती मिळेल, याचे उत्तर देण्याचे टाळले आहे. यापूर्वीच राज्यातील इतर सहा औष्णिक केंद्रांची मागणी असून, त्यातील तीन केंद्रांना तर दोन दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. त्यामुळे कोणत्या केंद्राला किती कोळसा मिळेल याची अनिश्चितता कायम आहे. वास्तविक किमान सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असतानाच तत्पूर्वीच कोळशाची मागणी नोंदविणे अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित केंद्रांकडून मागणी नोंदवूनही कोळसा मिळू शकला नसल्याने साठा अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे.