शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

एकलहºयातील वीज निर्मिती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:38 IST

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती घटल्याने राज्यात सक्तीचे भारनियमन सुरू असून, अद्यापही पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज निर्मिती संकटात सापडली आहे. एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात २१० मेगावॉटचे तीन संच आहेत, त्यापैकी दोन संच सुरू असून एक संच देखभाल दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.२१० मेगावॉटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. केंद्रात सध्या तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असून, केंद्राकडून मुख्यालयाकडे कोळशाची मागणी नोंदविण्यात आली आहे; मात्र कोळशाच्या उपलब्धतेबाबत मुख्यालयाकडून स्पष्ट कोणतेही कळविण्यात आले नसल्याने तीन दिवसाच्या आत कोळसा मिळू शकेल की नाही याविषयी एकलहरे केंद्रातीलच अधिकारी साशंक आहेत. कोळशाची मागणी नोंदविल्यानंतर मुख्यालयाने कोळसा पुरविण्याबाबत नियोजन केले जाईल असे म्हटले आहे; परंतु प्रत्यक्षात कधी आणि किती मिळेल, याचे उत्तर देण्याचे टाळले आहे. यापूर्वीच राज्यातील इतर सहा औष्णिक केंद्रांची मागणी असून, त्यातील तीन केंद्रांना तर दोन दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. त्यामुळे कोणत्या केंद्राला किती कोळसा मिळेल याची अनिश्चितता कायम आहे. वास्तविक किमान सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असतानाच तत्पूर्वीच कोळशाची मागणी नोंदविणे अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित केंद्रांकडून मागणी नोंदवूनही कोळसा मिळू शकला नसल्याने साठा अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे.