शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एकलहºयातील वीज निर्मिती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:38 IST

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती घटल्याने राज्यात सक्तीचे भारनियमन सुरू असून, अद्यापही पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज निर्मिती संकटात सापडली आहे. एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात २१० मेगावॉटचे तीन संच आहेत, त्यापैकी दोन संच सुरू असून एक संच देखभाल दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.२१० मेगावॉटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. केंद्रात सध्या तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असून, केंद्राकडून मुख्यालयाकडे कोळशाची मागणी नोंदविण्यात आली आहे; मात्र कोळशाच्या उपलब्धतेबाबत मुख्यालयाकडून स्पष्ट कोणतेही कळविण्यात आले नसल्याने तीन दिवसाच्या आत कोळसा मिळू शकेल की नाही याविषयी एकलहरे केंद्रातीलच अधिकारी साशंक आहेत. कोळशाची मागणी नोंदविल्यानंतर मुख्यालयाने कोळसा पुरविण्याबाबत नियोजन केले जाईल असे म्हटले आहे; परंतु प्रत्यक्षात कधी आणि किती मिळेल, याचे उत्तर देण्याचे टाळले आहे. यापूर्वीच राज्यातील इतर सहा औष्णिक केंद्रांची मागणी असून, त्यातील तीन केंद्रांना तर दोन दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. त्यामुळे कोणत्या केंद्राला किती कोळसा मिळेल याची अनिश्चितता कायम आहे. वास्तविक किमान सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असतानाच तत्पूर्वीच कोळशाची मागणी नोंदविणे अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित केंद्रांकडून मागणी नोंदवूनही कोळसा मिळू शकला नसल्याने साठा अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे.