शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांना पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:56 IST

दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त होण्याचा संकल्प केला आहे. श्रमदानातून घाम गाळणाºया गावकºयांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

नाशिक : दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त होण्याचा संकल्प केला आहे. श्रमदानातून घाम गाळणाºया गावकºयांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.वर्षानुवर्षे गावातील पाण्याचे स्रोत बंद झाल्याने तसेच पाणी वाहून जात असल्याने राज्यातील असंख्य गावे दुष्काळग्रस्त आहेत. या गावांना पाणीदार बनविण्यासाठी गावामध्येच श्रमदानाची भावना निर्माण करून नागरिकांना पाणीदार गावासाठी प्रवृत्त करण्याची चळवळ आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटना यांनी सुरू केली आहे. महाराष्टÑ शासनाच्या जलयुक्त शिवाराचे सहकार्यही त्यांना लाभत आहे. सिन्नर तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र वडझिरे, धोंडबार आणि कोनांबे हिच गावे स्पर्धेत टिकली आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेतला होता. पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या व्यापक सहयोगातून या तीनही गावांमध्ये पाणी अडविण्यासाठीचे मोठे काम झाले आहे. नदी, ओढ्यातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, मातीबांध, दगडीबांध बांधण्याची किमया ग्रामस्थांनी करून दाखविली आहे. मात्र यंदा जुलै उजाडूनही पुरेसा आणि समाधानकारक पाऊस नसल्याने ग्रामस्थांना चिंता लागली आहे. पावसाच्या आगमनावरच या गावांचे भवितव्य आणि गावकºयांच्या श्रमाचे मोल अवलंबून आहे.

टॅग्स :WaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा