शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘त्या’ गावांना पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:56 IST

दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त होण्याचा संकल्प केला आहे. श्रमदानातून घाम गाळणाºया गावकºयांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

नाशिक : दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त होण्याचा संकल्प केला आहे. श्रमदानातून घाम गाळणाºया गावकºयांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.वर्षानुवर्षे गावातील पाण्याचे स्रोत बंद झाल्याने तसेच पाणी वाहून जात असल्याने राज्यातील असंख्य गावे दुष्काळग्रस्त आहेत. या गावांना पाणीदार बनविण्यासाठी गावामध्येच श्रमदानाची भावना निर्माण करून नागरिकांना पाणीदार गावासाठी प्रवृत्त करण्याची चळवळ आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटना यांनी सुरू केली आहे. महाराष्टÑ शासनाच्या जलयुक्त शिवाराचे सहकार्यही त्यांना लाभत आहे. सिन्नर तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र वडझिरे, धोंडबार आणि कोनांबे हिच गावे स्पर्धेत टिकली आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेतला होता. पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या व्यापक सहयोगातून या तीनही गावांमध्ये पाणी अडविण्यासाठीचे मोठे काम झाले आहे. नदी, ओढ्यातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, मातीबांध, दगडीबांध बांधण्याची किमया ग्रामस्थांनी करून दाखविली आहे. मात्र यंदा जुलै उजाडूनही पुरेसा आणि समाधानकारक पाऊस नसल्याने ग्रामस्थांना चिंता लागली आहे. पावसाच्या आगमनावरच या गावांचे भवितव्य आणि गावकºयांच्या श्रमाचे मोल अवलंबून आहे.

टॅग्स :WaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा