शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

तालुक्यांच्या सीमेवरील पोटदुखीवर इलाजाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 19:31 IST

ओझर : ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला कसे काळे फासले जाते याचे ज्वलंत उदाहरण पहायचे असल्यास ओझरजवळील पोटदुखी नावाने परिचित असलेल्या उमाजीनगरला एकदा भेट द्यायला हवी. वीज,पाणी,रस्ता आदी प्राथमिक सुखसुविधांशिवाय एखादे खेडे कसे दिसते ते येथे बघायला मिळते.सत्तरीच्या दशकात आपल्या देशात मूलभूत सुविधा जशा बदलत गेल्या तशा सोयीदेखील मिळत ...

ओझर : ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला कसे काळे फासले जाते याचे ज्वलंत उदाहरण पहायचे असल्यास ओझरजवळील पोटदुखी नावाने परिचित असलेल्या उमाजीनगरला एकदा भेट द्यायला हवी. वीज,पाणी,रस्ता आदी प्राथमिक सुखसुविधांशिवाय एखादे खेडे कसे दिसते ते येथे बघायला मिळते.सत्तरीच्या दशकात आपल्या देशात मूलभूत सुविधा जशा बदलत गेल्या तशा सोयीदेखील मिळत गेल्या. आज ‘फोरजी व वातानुकूलित’च्या जमान्यात याला एक भलं मोठ्ठं शे-दीडशे घरांचे नगर अपवाद ठरत आहे. मतदान निफाड तालुक्यात; पण वास्तव्याची जागा नाशिक तालुक्याच्या हद्दीत खरं तर हीच सीमेची लालफीत येथील आदिवासी बांधवांच्या आयुष्यात बाधक ठरत आहे.येथे अजूनही विद्युतीकरण नाही, पक्की शाळा नाही. येथील मुले शिकली पाहिजे याच हेतूने वस्तीतील दोन मॅट्रिक पास असलेल्या सविता डबके व मनीषा गांगुर्डे या महिला गेल्या नऊ वर्षंंपासून मुलांना तिसरीपर्यंतचे शिक्षण पालकांनी लोकवर्गणीतूच उभारलेल्या छोट्याशा शेडमध्ये देत आहेत. याबदल्यात येथील नागरिक वर्गणी गोळा करून पंधराशे रु पये मानधन या महिलांना देत आहे. हेतू एकच मुलं शिकली पाहिजे, साक्षर झाली पाहिजे. त्यानंतरच्या शैक्षणिक प्रवासासाठी मुलं-मुली चार किलोमीटरची पायपीट करीत ओझर गाठून चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतात.येथे करमणुकीचे साधन नाही. शे-दीडशे घरांपैकी केवळ सहा-सात घरांत टीव्ही चालतो तोदेखील बॅटरीवर. लोकवर्गणीतून बांधलेल्या हातपंपातून मिळणारे पाणी हाच साडेसहाशे लोकांचा एकमेव जलस्रोत आहे. शासनाची कुठलीही मदत नाही, सर्वेक्षण तर मुळीच नाही. कधी पोषण आहाराला हात लागला नाही. मोफत पुस्तके, गणवेशापासून वंचित. आरोग्य सुविधेचा गंधदेखील माहीत नाही. अजून वीजच आली नसल्याने बॅटरीचा उपयोग करून घरातील लाइट लावली जाते. सौरऊर्जेचे पथदीप अनेक वर्षांपासून बंद असल्याने रात्रीचा लख्ख अंधार असतो. फोर-जीची शक्ती हवेत अदृश्य असली तरी संपर्क यंत्रणा मात्र शून्यच.येथील अर्थव्यवस्था मोल मजुरीवर चालत असली तरी तरु णांना लग्न करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.एकीकडे सरकार बारा हजार रु पये हगणदारीमुक्तसाठी अनुदान देत असले तरी सरकारी अनास्थेमुळे साडेसहाशे लोकांमध्ये एकही शौचालय नसल्याने उघड्यावर शौचाला जावे लागते.यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. उज्ज्वला योजनादेखील पूर्णपणे अंमलात आलेली नाही.