शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

तालुक्यांच्या सीमेवरील पोटदुखीवर इलाजाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 19:31 IST

ओझर : ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला कसे काळे फासले जाते याचे ज्वलंत उदाहरण पहायचे असल्यास ओझरजवळील पोटदुखी नावाने परिचित असलेल्या उमाजीनगरला एकदा भेट द्यायला हवी. वीज,पाणी,रस्ता आदी प्राथमिक सुखसुविधांशिवाय एखादे खेडे कसे दिसते ते येथे बघायला मिळते.सत्तरीच्या दशकात आपल्या देशात मूलभूत सुविधा जशा बदलत गेल्या तशा सोयीदेखील मिळत ...

ओझर : ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला कसे काळे फासले जाते याचे ज्वलंत उदाहरण पहायचे असल्यास ओझरजवळील पोटदुखी नावाने परिचित असलेल्या उमाजीनगरला एकदा भेट द्यायला हवी. वीज,पाणी,रस्ता आदी प्राथमिक सुखसुविधांशिवाय एखादे खेडे कसे दिसते ते येथे बघायला मिळते.सत्तरीच्या दशकात आपल्या देशात मूलभूत सुविधा जशा बदलत गेल्या तशा सोयीदेखील मिळत गेल्या. आज ‘फोरजी व वातानुकूलित’च्या जमान्यात याला एक भलं मोठ्ठं शे-दीडशे घरांचे नगर अपवाद ठरत आहे. मतदान निफाड तालुक्यात; पण वास्तव्याची जागा नाशिक तालुक्याच्या हद्दीत खरं तर हीच सीमेची लालफीत येथील आदिवासी बांधवांच्या आयुष्यात बाधक ठरत आहे.येथे अजूनही विद्युतीकरण नाही, पक्की शाळा नाही. येथील मुले शिकली पाहिजे याच हेतूने वस्तीतील दोन मॅट्रिक पास असलेल्या सविता डबके व मनीषा गांगुर्डे या महिला गेल्या नऊ वर्षंंपासून मुलांना तिसरीपर्यंतचे शिक्षण पालकांनी लोकवर्गणीतूच उभारलेल्या छोट्याशा शेडमध्ये देत आहेत. याबदल्यात येथील नागरिक वर्गणी गोळा करून पंधराशे रु पये मानधन या महिलांना देत आहे. हेतू एकच मुलं शिकली पाहिजे, साक्षर झाली पाहिजे. त्यानंतरच्या शैक्षणिक प्रवासासाठी मुलं-मुली चार किलोमीटरची पायपीट करीत ओझर गाठून चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतात.येथे करमणुकीचे साधन नाही. शे-दीडशे घरांपैकी केवळ सहा-सात घरांत टीव्ही चालतो तोदेखील बॅटरीवर. लोकवर्गणीतून बांधलेल्या हातपंपातून मिळणारे पाणी हाच साडेसहाशे लोकांचा एकमेव जलस्रोत आहे. शासनाची कुठलीही मदत नाही, सर्वेक्षण तर मुळीच नाही. कधी पोषण आहाराला हात लागला नाही. मोफत पुस्तके, गणवेशापासून वंचित. आरोग्य सुविधेचा गंधदेखील माहीत नाही. अजून वीजच आली नसल्याने बॅटरीचा उपयोग करून घरातील लाइट लावली जाते. सौरऊर्जेचे पथदीप अनेक वर्षांपासून बंद असल्याने रात्रीचा लख्ख अंधार असतो. फोर-जीची शक्ती हवेत अदृश्य असली तरी संपर्क यंत्रणा मात्र शून्यच.येथील अर्थव्यवस्था मोल मजुरीवर चालत असली तरी तरु णांना लग्न करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.एकीकडे सरकार बारा हजार रु पये हगणदारीमुक्तसाठी अनुदान देत असले तरी सरकारी अनास्थेमुळे साडेसहाशे लोकांमध्ये एकही शौचालय नसल्याने उघड्यावर शौचाला जावे लागते.यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. उज्ज्वला योजनादेखील पूर्णपणे अंमलात आलेली नाही.