शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

डांबरीकरणाची प्रतीक्षा : दोन महिन्यांतच रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने प्रवाशांचे हाल

By admin | Updated: October 29, 2014 22:45 IST

भोजापूर खोऱ्यातील रस्त्यांची दैना

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या भोजापूर खोरे परिसरातील रस्त्यांची दैना उडाली आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून, काही रस्त्यांची कामे रखडल्याने रस्त्यावर टाकून ठेवलेल्या खडीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी भोजापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. भोजापूर खोरे परिसरात चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदि भागांचा समावेश असून, या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या हद्दीत प्रामुख्याने या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची अवस्था बिकट आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. कासारवाडी ते नळवाडी, चास ते नळवाडी, कासारवाडी ते चास, कासारवाडी ते सोनेवाडी या चार रस्त्यांना प्रत्येक एक-एक किलोमीटर डांबरीकरणासाठी केंद्र शासनाच्या निधीतून गतवर्षी सुमारे दहा लाख रुपये मंजूर झाले आहे. त्याचवेळी तात्कालिन खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सदर कामांचे भूमीपूजनही उरकण्यात आले होते. रस्त्यांच्या कामासाठी सहा महिन्यांपूर्वीच खडीही आणून टाकलेली आहे, मात्र अद्यापही या रस्त्यांवर डांबर पडले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दोन रस्त्यांचे बीबीएम करण्यात आले. परंतु दोन महिन्यांतच त्या रस्त्यांची खडी उघडी पडली आहे. त्यामुळे अपघात होऊन या परिसरातील तीन युवकांना दुखापत झाली होती. प्रामुख्याने नांदूरशिंगोटे ते चास या आठ किलोमीटर रस्त्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर सदर रस्त्याची अद्याप डागडुजी करण्यात आली नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यांची रुंदीसुध्दा कमी प्रमाणात असल्याने वाहने चालविताना अडचण निर्माण होते. तसेच रस्त्याच्या साइडपट्ट्यादेखील वेळेवर भरल्या जात नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. संबंधित ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरुपात तिन्ही रस्त्यांची कामे सुरू केली होती. रात्री-अपरात्री या भागात रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मोठे जिकरीचे बनले आहे. या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)