शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरणाची प्रतीक्षा : दोन महिन्यांतच रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने प्रवाशांचे हाल

By admin | Updated: October 29, 2014 22:45 IST

भोजापूर खोऱ्यातील रस्त्यांची दैना

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या भोजापूर खोरे परिसरातील रस्त्यांची दैना उडाली आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून, काही रस्त्यांची कामे रखडल्याने रस्त्यावर टाकून ठेवलेल्या खडीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी भोजापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. भोजापूर खोरे परिसरात चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदि भागांचा समावेश असून, या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या हद्दीत प्रामुख्याने या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची अवस्था बिकट आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. कासारवाडी ते नळवाडी, चास ते नळवाडी, कासारवाडी ते चास, कासारवाडी ते सोनेवाडी या चार रस्त्यांना प्रत्येक एक-एक किलोमीटर डांबरीकरणासाठी केंद्र शासनाच्या निधीतून गतवर्षी सुमारे दहा लाख रुपये मंजूर झाले आहे. त्याचवेळी तात्कालिन खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सदर कामांचे भूमीपूजनही उरकण्यात आले होते. रस्त्यांच्या कामासाठी सहा महिन्यांपूर्वीच खडीही आणून टाकलेली आहे, मात्र अद्यापही या रस्त्यांवर डांबर पडले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दोन रस्त्यांचे बीबीएम करण्यात आले. परंतु दोन महिन्यांतच त्या रस्त्यांची खडी उघडी पडली आहे. त्यामुळे अपघात होऊन या परिसरातील तीन युवकांना दुखापत झाली होती. प्रामुख्याने नांदूरशिंगोटे ते चास या आठ किलोमीटर रस्त्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर सदर रस्त्याची अद्याप डागडुजी करण्यात आली नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यांची रुंदीसुध्दा कमी प्रमाणात असल्याने वाहने चालविताना अडचण निर्माण होते. तसेच रस्त्याच्या साइडपट्ट्यादेखील वेळेवर भरल्या जात नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. संबंधित ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरुपात तिन्ही रस्त्यांची कामे सुरू केली होती. रात्री-अपरात्री या भागात रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मोठे जिकरीचे बनले आहे. या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)