शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाची प्रतीक्षा कायम

By admin | Updated: May 20, 2017 23:40 IST

बळीराजा हवालदिल : घोषणा होऊन झाले नऊ महिने

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जुलै व आॅगस्ट २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये प्रतिक्विंटल-प्रमाणे जास्तीत जास्त २०० क्विंटल कांदा विक्रीसाठी २० हजारापर्यंत अनुदान देण्याची घोषणा करून राज्य शासनाने निर्णय घेतला.तालुक्यासह परिसरातील ३४८८ शेतकऱ्यांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत जुलै व आॅगस्ट २०१६ मध्ये एक लाख ३० हजार ८७७ क्विंटल कांदा आणला. बाजार समितीत हा कांदा खरेदी केला गेला. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक कोटी ३० लाख १२ हजार ८३६ रुपये अनुदान देणे क्रमप्राप्त असताना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. आॅक्टोबर २०१६मध्ये पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पुणे पणन संचालक द्वारा राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मे २०१७ संपत आला तरी अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले नाहीत. आपल्याला अनुदान मिळणार आहे. बुडत्याला काडीचा आधार म्हणून तरी, हे तुटपुंजे अनुदान मिळेल का, असा प्रश्न येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी विचारला आहे.भाजीपाला व कांदा नियमन मुक्तीचा अध्यादेश आणि दरम्यान राज्यभर बाजार समितीत झालेल्या गोंधळाच्या वातावरणात व्यापारीवर्गाने संपदेखील पुकारला होता. त्यामुळे येवला कांदा बाजार आवारात जुलै आणि आॅगस्ट २०१६ या दोन महिन्याच्या कालावधीत केवळ ३० दिवस मार्केटला कांदा विकला गेला.येवला तालुक्यातील केवळ ३४८८ शेतकाऱ्यांना या ३० दिवसात आपला कांदा मार्केटला विक्र ीसाठी आणता आला. याचा केवळ काही शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. शासनाने घोषित केलेले तुटपुंजे प्रतिक्विंटल १०० रुपयाचे अनुदान नऊ महिने उलटून गेले तरीदेखील अद्याप शेतकऱ्याच्या पदरात पडले नाही.गेल्या वर्षी कांदा भाववाढीच्या अपेक्षेत सप्टेंबर २०१६ व त्यानंतर कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना कांद्याच्या वजनात घट सोसूनदेखील केवळ ३०० ते ३५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यांनादेखील अनुदानाचा फायदा शासनाने दिला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. गेल्या वर्षात कांदा भाव कोसळल्यापासून कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट अनुदानाचा फायदा देण्याची आवश्यकता होती. परंतु तोदेखील शासनाने दिला नाही. शेतकऱ्याची परवड शासनाने केली. याचा संताप शेतकरीवर्गात आहे. उत्पादनावर आधारित खर्चावर भाव ही शासनाने केलेली घोषणा तर केव्हाच हवेत विरली. परंतु दिलासा देण्यासाठी सरसकट अनुदान देण्याचे धोरणदेखील शासनाने अवलंबले नाही. याचा राग शेतकरी व्यक्त करीत आहेत. जुना सांभाळलेला उन्हाळ कांदा पडीच्या भावात द्यावा लागला. जुलै व आॅगस्ट २०१६ अखेरपर्यंत विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याला शासनाने केवळ १०० रुपये अनुदानाचे गाजर दाखवले तेही अद्याप मिळालेले नाही.सोयाबीनचे अनुदान मिळेल का?आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल रु पये २०० प्रमाणे जास्तीत जास्त २५ क्विंटलपर्यंत अनुदान अर्थात केवळ जास्तीत जास्त पाच हजार रु पयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली. अनुदान मिळण्यासाठी सोयाबीन विक्र ी केल्याची हिशोबपट्टी, सातबारा उतारा, बँकेचा बचत खाते क्र मांक व बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत या आवश्यक कागदपत्रे द्यावी लागली. तुटपुंज्या अनुदानासाठी कागदपत्रे जुळवणे म्हणजे कोंबडीपेक्षा मसाला महाग झाला तरी; परंतु प्रत्यक्षात कांद्याचेच अनुदान पदरात पडले नाही तर सोयाबीनचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार काय, असा सवाल शेतकरी विचारात आहेत.