शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

अनुदानाची प्रतीक्षा कायम

By admin | Updated: May 20, 2017 23:40 IST

बळीराजा हवालदिल : घोषणा होऊन झाले नऊ महिने

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जुलै व आॅगस्ट २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये प्रतिक्विंटल-प्रमाणे जास्तीत जास्त २०० क्विंटल कांदा विक्रीसाठी २० हजारापर्यंत अनुदान देण्याची घोषणा करून राज्य शासनाने निर्णय घेतला.तालुक्यासह परिसरातील ३४८८ शेतकऱ्यांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत जुलै व आॅगस्ट २०१६ मध्ये एक लाख ३० हजार ८७७ क्विंटल कांदा आणला. बाजार समितीत हा कांदा खरेदी केला गेला. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक कोटी ३० लाख १२ हजार ८३६ रुपये अनुदान देणे क्रमप्राप्त असताना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. आॅक्टोबर २०१६मध्ये पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पुणे पणन संचालक द्वारा राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मे २०१७ संपत आला तरी अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले नाहीत. आपल्याला अनुदान मिळणार आहे. बुडत्याला काडीचा आधार म्हणून तरी, हे तुटपुंजे अनुदान मिळेल का, असा प्रश्न येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी विचारला आहे.भाजीपाला व कांदा नियमन मुक्तीचा अध्यादेश आणि दरम्यान राज्यभर बाजार समितीत झालेल्या गोंधळाच्या वातावरणात व्यापारीवर्गाने संपदेखील पुकारला होता. त्यामुळे येवला कांदा बाजार आवारात जुलै आणि आॅगस्ट २०१६ या दोन महिन्याच्या कालावधीत केवळ ३० दिवस मार्केटला कांदा विकला गेला.येवला तालुक्यातील केवळ ३४८८ शेतकाऱ्यांना या ३० दिवसात आपला कांदा मार्केटला विक्र ीसाठी आणता आला. याचा केवळ काही शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. शासनाने घोषित केलेले तुटपुंजे प्रतिक्विंटल १०० रुपयाचे अनुदान नऊ महिने उलटून गेले तरीदेखील अद्याप शेतकऱ्याच्या पदरात पडले नाही.गेल्या वर्षी कांदा भाववाढीच्या अपेक्षेत सप्टेंबर २०१६ व त्यानंतर कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना कांद्याच्या वजनात घट सोसूनदेखील केवळ ३०० ते ३५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यांनादेखील अनुदानाचा फायदा शासनाने दिला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. गेल्या वर्षात कांदा भाव कोसळल्यापासून कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट अनुदानाचा फायदा देण्याची आवश्यकता होती. परंतु तोदेखील शासनाने दिला नाही. शेतकऱ्याची परवड शासनाने केली. याचा संताप शेतकरीवर्गात आहे. उत्पादनावर आधारित खर्चावर भाव ही शासनाने केलेली घोषणा तर केव्हाच हवेत विरली. परंतु दिलासा देण्यासाठी सरसकट अनुदान देण्याचे धोरणदेखील शासनाने अवलंबले नाही. याचा राग शेतकरी व्यक्त करीत आहेत. जुना सांभाळलेला उन्हाळ कांदा पडीच्या भावात द्यावा लागला. जुलै व आॅगस्ट २०१६ अखेरपर्यंत विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याला शासनाने केवळ १०० रुपये अनुदानाचे गाजर दाखवले तेही अद्याप मिळालेले नाही.सोयाबीनचे अनुदान मिळेल का?आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल रु पये २०० प्रमाणे जास्तीत जास्त २५ क्विंटलपर्यंत अनुदान अर्थात केवळ जास्तीत जास्त पाच हजार रु पयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली. अनुदान मिळण्यासाठी सोयाबीन विक्र ी केल्याची हिशोबपट्टी, सातबारा उतारा, बँकेचा बचत खाते क्र मांक व बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत या आवश्यक कागदपत्रे द्यावी लागली. तुटपुंज्या अनुदानासाठी कागदपत्रे जुळवणे म्हणजे कोंबडीपेक्षा मसाला महाग झाला तरी; परंतु प्रत्यक्षात कांद्याचेच अनुदान पदरात पडले नाही तर सोयाबीनचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार काय, असा सवाल शेतकरी विचारात आहेत.