शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:44 IST

नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.

ठळक मुद्देनायगाव खोरे : पाण्याअभावी पिके करपू लागली; बळीराजा चिंतित

नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.यंदा समाधानकारक मान्सून बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज खरा ठरवत पावसाने वेळेवर हजेरी लावून बळीराजाच्या चेहºयावर हसू फुलवलं. वरुणराजाच्या आगमनाने शेतकºयांनी खरिपाची पेरणी व विविध पिकांची लागवड सुरू केली. शेतात पेरणी केलेले पीक रिमझिम पावसावर उगवायला लागले.कोवळे अंकुर जमिनीतून बाहेर पडण्यास सुरुवात होताच पावसाने अचानक डोळे वटारल्याने उगवणारे हे अंकुर सुकलेल्या व कडक झालेल्या मातीतून बाहेर पडण्याच्या आतच पावसाअभावी करपू लागल्यामुळे बळीराजा चिंतित सापडला आहे. खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पिके सध्या शेतातील मातीतून उगवत आहे, तर काही उगवले आहे.तसेच लागवड केलेले कोबी, टमाटे, फ्लॉवर, मिरची आदी पिके सध्या शेतकºयांच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी करपत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान, सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात खरिपाचे हजारो एकर क्षेत्रातील पेरणी तसेच लागवड केलेल्या शेकडो एकरवरील विविध पिकांना पाण्याची सध्या नितांत गरज आहे. नायगाव खोºयात कोबी पिकाच्या सुमारे चाळीस हजाराच्या आसपास पुड्यांच्या रोपाची लागवड झाली आहे. एकशे ८५ रुपये दराने सत्तर ते ऐंशी लाख रुपयांची लागवड केलेली रोपे सध्या पाण्याअभावी करपून जात आहे.पिके धोक्यात येण्याची शक्यताहजारो एकरवरील खरिपाचे पीक सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे कमी-अधिक प्रमाणात उगवत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पावसाची कृपा झाली नाही तर नायगाव खोºयासह संपूर्ण तालुक्यातील हजारो एकरवरील क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार हे नक्की. पावसाने हजेरी लावली नाहीतर शेतकºयांना लाखो रु पयांचे नुकसान होईल, असे चित्र सध्या आहे. दररोज सकाळी आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधानाची लकीर दिसते. मात्र संपूर्ण दिवसभरात रिमझिम तर नाहीच; पण पावसाचा थेंबही पडत नसल्यामुळे बळीराजा चिंता व्यक्त करत दुसºया दिवसाची वाट पहातो.

यंदाही मी कोबी पीक घेण्यासाठी ३१ हजारांच्या १७० पुड्या बियाणाची लागवड केली. मात्र लागवडीनंतर रिमझिम पाऊसही गायब झाल्याने सध्या हे संपूर्ण पीक पाण्यावाचून शेतातच करपून गेले आहे. थोड्याच दिवसात रिमझिम पाऊस झाला नाही तरी माझे खरिपाचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.- शरद आव्हाड,शेतकरी, देशवंडी