शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:44 IST

नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.

ठळक मुद्देनायगाव खोरे : पाण्याअभावी पिके करपू लागली; बळीराजा चिंतित

नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.यंदा समाधानकारक मान्सून बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज खरा ठरवत पावसाने वेळेवर हजेरी लावून बळीराजाच्या चेहºयावर हसू फुलवलं. वरुणराजाच्या आगमनाने शेतकºयांनी खरिपाची पेरणी व विविध पिकांची लागवड सुरू केली. शेतात पेरणी केलेले पीक रिमझिम पावसावर उगवायला लागले.कोवळे अंकुर जमिनीतून बाहेर पडण्यास सुरुवात होताच पावसाने अचानक डोळे वटारल्याने उगवणारे हे अंकुर सुकलेल्या व कडक झालेल्या मातीतून बाहेर पडण्याच्या आतच पावसाअभावी करपू लागल्यामुळे बळीराजा चिंतित सापडला आहे. खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पिके सध्या शेतातील मातीतून उगवत आहे, तर काही उगवले आहे.तसेच लागवड केलेले कोबी, टमाटे, फ्लॉवर, मिरची आदी पिके सध्या शेतकºयांच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी करपत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान, सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात खरिपाचे हजारो एकर क्षेत्रातील पेरणी तसेच लागवड केलेल्या शेकडो एकरवरील विविध पिकांना पाण्याची सध्या नितांत गरज आहे. नायगाव खोºयात कोबी पिकाच्या सुमारे चाळीस हजाराच्या आसपास पुड्यांच्या रोपाची लागवड झाली आहे. एकशे ८५ रुपये दराने सत्तर ते ऐंशी लाख रुपयांची लागवड केलेली रोपे सध्या पाण्याअभावी करपून जात आहे.पिके धोक्यात येण्याची शक्यताहजारो एकरवरील खरिपाचे पीक सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे कमी-अधिक प्रमाणात उगवत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पावसाची कृपा झाली नाही तर नायगाव खोºयासह संपूर्ण तालुक्यातील हजारो एकरवरील क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार हे नक्की. पावसाने हजेरी लावली नाहीतर शेतकºयांना लाखो रु पयांचे नुकसान होईल, असे चित्र सध्या आहे. दररोज सकाळी आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधानाची लकीर दिसते. मात्र संपूर्ण दिवसभरात रिमझिम तर नाहीच; पण पावसाचा थेंबही पडत नसल्यामुळे बळीराजा चिंता व्यक्त करत दुसºया दिवसाची वाट पहातो.

यंदाही मी कोबी पीक घेण्यासाठी ३१ हजारांच्या १७० पुड्या बियाणाची लागवड केली. मात्र लागवडीनंतर रिमझिम पाऊसही गायब झाल्याने सध्या हे संपूर्ण पीक पाण्यावाचून शेतातच करपून गेले आहे. थोड्याच दिवसात रिमझिम पाऊस झाला नाही तरी माझे खरिपाचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.- शरद आव्हाड,शेतकरी, देशवंडी