शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:44 IST

नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.

ठळक मुद्देनायगाव खोरे : पाण्याअभावी पिके करपू लागली; बळीराजा चिंतित

नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.यंदा समाधानकारक मान्सून बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज खरा ठरवत पावसाने वेळेवर हजेरी लावून बळीराजाच्या चेहºयावर हसू फुलवलं. वरुणराजाच्या आगमनाने शेतकºयांनी खरिपाची पेरणी व विविध पिकांची लागवड सुरू केली. शेतात पेरणी केलेले पीक रिमझिम पावसावर उगवायला लागले.कोवळे अंकुर जमिनीतून बाहेर पडण्यास सुरुवात होताच पावसाने अचानक डोळे वटारल्याने उगवणारे हे अंकुर सुकलेल्या व कडक झालेल्या मातीतून बाहेर पडण्याच्या आतच पावसाअभावी करपू लागल्यामुळे बळीराजा चिंतित सापडला आहे. खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पिके सध्या शेतातील मातीतून उगवत आहे, तर काही उगवले आहे.तसेच लागवड केलेले कोबी, टमाटे, फ्लॉवर, मिरची आदी पिके सध्या शेतकºयांच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी करपत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान, सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात खरिपाचे हजारो एकर क्षेत्रातील पेरणी तसेच लागवड केलेल्या शेकडो एकरवरील विविध पिकांना पाण्याची सध्या नितांत गरज आहे. नायगाव खोºयात कोबी पिकाच्या सुमारे चाळीस हजाराच्या आसपास पुड्यांच्या रोपाची लागवड झाली आहे. एकशे ८५ रुपये दराने सत्तर ते ऐंशी लाख रुपयांची लागवड केलेली रोपे सध्या पाण्याअभावी करपून जात आहे.पिके धोक्यात येण्याची शक्यताहजारो एकरवरील खरिपाचे पीक सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे कमी-अधिक प्रमाणात उगवत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पावसाची कृपा झाली नाही तर नायगाव खोºयासह संपूर्ण तालुक्यातील हजारो एकरवरील क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार हे नक्की. पावसाने हजेरी लावली नाहीतर शेतकºयांना लाखो रु पयांचे नुकसान होईल, असे चित्र सध्या आहे. दररोज सकाळी आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधानाची लकीर दिसते. मात्र संपूर्ण दिवसभरात रिमझिम तर नाहीच; पण पावसाचा थेंबही पडत नसल्यामुळे बळीराजा चिंता व्यक्त करत दुसºया दिवसाची वाट पहातो.

यंदाही मी कोबी पीक घेण्यासाठी ३१ हजारांच्या १७० पुड्या बियाणाची लागवड केली. मात्र लागवडीनंतर रिमझिम पाऊसही गायब झाल्याने सध्या हे संपूर्ण पीक पाण्यावाचून शेतातच करपून गेले आहे. थोड्याच दिवसात रिमझिम पाऊस झाला नाही तरी माझे खरिपाचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.- शरद आव्हाड,शेतकरी, देशवंडी