शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 6, 2016 23:37 IST

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग

बेलगाव कुऱ्हे : संपूर्ण जिल्ह्यात भात लागवडीत अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली असून, काही ठिकाणी मशागतीची कामे आटोपली आहेत. दुष्काळात भरडलेल्या बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. तालुक्यातील १२६ महसुली गावांमध्ये वाड्या व वस्त्यांवरील शेतकरी भात, नागली, वरई, सोयाबीन आदि पिके घेतात. शेतकरी खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ या जातीची भातपिके घेत असतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ३३२ हेक्टर असून, २०१५-१६चे खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार १७१ एवढे आहे. मागच्या वर्षीचे पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार ४३१ होते, तर सरासरी ४७०० मिलीलिटर पर्जन्यमान झाले होते. यावर्षी चांगला पाऊस होण्यासाठी बळीराजा चक्क देवाला साकडे घालीत आहेत. पण अजूनही त्याची प्रतीक्षा संपलेली नाही.२०१५-२०१६च्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी ३२ हजार १७१ हेक्टर उद्दिष्ट्य असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे.गेल्या वर्षाचे लक्ष्यांक २६ हजार ५०१ हेक्टर होते, या क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली असल्याने १०२ टक्के पेरणी झालेली होती.चालू वर्षीच्या खरीप हंगामाचे भात पिकाचे लक्ष्यांक- २४९५०, तर उद्दिष्ट २६५०१ एवढे आहे. नागली लक्ष्यांक- १२०० (उद्दिष्ट ९९७), मका लक्ष्यांक २५० (उद्दिष्ट ३०९), कडधान्य— तूर, मूग, उडीद या पिकाचे लक्ष्यांक १७२, १६५, गळीत धान्य- भुईमूग लक्ष्यांक ५००, ६६८, सोयाबीन लक्ष्यांक- ६००, ७११, खुरसनी- लक्ष्यांक ९८३, ३२१ एवढे आहे.गेल्या वर्षी खरीपपूर्व हंगामात अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान केले होते. उत्पादनातदेखील मोठी घट निर्माण झाली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांना नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्याच्या पाशर््वभूमीवर तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी विविध प्रकारची बी बियाणे घेतात यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी शास्त्रज्ञ देखील मार्गदर्शन करणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना ३१ जुलैपर्यंत अंतिम तारीख असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. (वार्ताहर)