शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 6, 2016 23:37 IST

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग

बेलगाव कुऱ्हे : संपूर्ण जिल्ह्यात भात लागवडीत अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली असून, काही ठिकाणी मशागतीची कामे आटोपली आहेत. दुष्काळात भरडलेल्या बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. तालुक्यातील १२६ महसुली गावांमध्ये वाड्या व वस्त्यांवरील शेतकरी भात, नागली, वरई, सोयाबीन आदि पिके घेतात. शेतकरी खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ या जातीची भातपिके घेत असतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ३३२ हेक्टर असून, २०१५-१६चे खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार १७१ एवढे आहे. मागच्या वर्षीचे पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार ४३१ होते, तर सरासरी ४७०० मिलीलिटर पर्जन्यमान झाले होते. यावर्षी चांगला पाऊस होण्यासाठी बळीराजा चक्क देवाला साकडे घालीत आहेत. पण अजूनही त्याची प्रतीक्षा संपलेली नाही.२०१५-२०१६च्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी ३२ हजार १७१ हेक्टर उद्दिष्ट्य असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे.गेल्या वर्षाचे लक्ष्यांक २६ हजार ५०१ हेक्टर होते, या क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली असल्याने १०२ टक्के पेरणी झालेली होती.चालू वर्षीच्या खरीप हंगामाचे भात पिकाचे लक्ष्यांक- २४९५०, तर उद्दिष्ट २६५०१ एवढे आहे. नागली लक्ष्यांक- १२०० (उद्दिष्ट ९९७), मका लक्ष्यांक २५० (उद्दिष्ट ३०९), कडधान्य— तूर, मूग, उडीद या पिकाचे लक्ष्यांक १७२, १६५, गळीत धान्य- भुईमूग लक्ष्यांक ५००, ६६८, सोयाबीन लक्ष्यांक- ६००, ७११, खुरसनी- लक्ष्यांक ९८३, ३२१ एवढे आहे.गेल्या वर्षी खरीपपूर्व हंगामात अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान केले होते. उत्पादनातदेखील मोठी घट निर्माण झाली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांना नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्याच्या पाशर््वभूमीवर तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी विविध प्रकारची बी बियाणे घेतात यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी शास्त्रज्ञ देखील मार्गदर्शन करणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना ३१ जुलैपर्यंत अंतिम तारीख असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. (वार्ताहर)