शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 6, 2016 23:37 IST

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग

बेलगाव कुऱ्हे : संपूर्ण जिल्ह्यात भात लागवडीत अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली असून, काही ठिकाणी मशागतीची कामे आटोपली आहेत. दुष्काळात भरडलेल्या बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. तालुक्यातील १२६ महसुली गावांमध्ये वाड्या व वस्त्यांवरील शेतकरी भात, नागली, वरई, सोयाबीन आदि पिके घेतात. शेतकरी खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ या जातीची भातपिके घेत असतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ३३२ हेक्टर असून, २०१५-१६चे खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार १७१ एवढे आहे. मागच्या वर्षीचे पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार ४३१ होते, तर सरासरी ४७०० मिलीलिटर पर्जन्यमान झाले होते. यावर्षी चांगला पाऊस होण्यासाठी बळीराजा चक्क देवाला साकडे घालीत आहेत. पण अजूनही त्याची प्रतीक्षा संपलेली नाही.२०१५-२०१६च्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी ३२ हजार १७१ हेक्टर उद्दिष्ट्य असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे.गेल्या वर्षाचे लक्ष्यांक २६ हजार ५०१ हेक्टर होते, या क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली असल्याने १०२ टक्के पेरणी झालेली होती.चालू वर्षीच्या खरीप हंगामाचे भात पिकाचे लक्ष्यांक- २४९५०, तर उद्दिष्ट २६५०१ एवढे आहे. नागली लक्ष्यांक- १२०० (उद्दिष्ट ९९७), मका लक्ष्यांक २५० (उद्दिष्ट ३०९), कडधान्य— तूर, मूग, उडीद या पिकाचे लक्ष्यांक १७२, १६५, गळीत धान्य- भुईमूग लक्ष्यांक ५००, ६६८, सोयाबीन लक्ष्यांक- ६००, ७११, खुरसनी- लक्ष्यांक ९८३, ३२१ एवढे आहे.गेल्या वर्षी खरीपपूर्व हंगामात अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान केले होते. उत्पादनातदेखील मोठी घट निर्माण झाली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांना नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्याच्या पाशर््वभूमीवर तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी विविध प्रकारची बी बियाणे घेतात यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी शास्त्रज्ञ देखील मार्गदर्शन करणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना ३१ जुलैपर्यंत अंतिम तारीख असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. (वार्ताहर)