शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

भोजापूर धरण पाणलोट क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:17 IST

नांदूरशिंगोटे : दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली ...

नांदूरशिंगोटे : दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. तीन महिन्यांच्या कालावधीत धरणात फक्त ४० दशलक्ष घनफूट पाण्याची नवीन आवक झाली आहे. धरणात २४ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहेत. परतीच्या पावसाने तरी भोजापूर धरण भरेल अशी अपेक्षा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आहे.

म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरणाची निर्मिती केली असून धरणाच्या पाण्यावरच परिसरातील शेती व पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांतील २१ गावे धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणात पाण्याची आवक झालेली नसून धरण क्षेत्रात पडलेल्या पावसावरच साठा वाढला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जून महिन्यात धरणात ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तीन महिन्यांच्या कालावधीत १३ टक्के पाणीसाठा वाढला असून, धरण परिसरात अवघा साडेतीनशे मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरण परिसरात झालेल्या पावसाने डोंगराचे पाणी वाहून धरणात आल्याने आजमितीला धरणात ८५ दशलक्ष घनफूट पाणी आहेत. गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या दोन वर्षांपासून भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत होती. तसेच तब्बल दोन महिने धरणाच्या पाण्यातून विसर्ग सुरू असल्याने लाभक्षेत्रातील बंधारे पूर्णपणे भरले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांनंतर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. दोन वर्षांपासून सातत्याने भोजापूर धरणात भरपूर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणात आज फक्त २४ टक्के जिवंत पाणीसाठा असला तरी आगामी काळात होणाऱ्या मोठ्या पावसाने या पाणीसाठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून कसाबसा तग धरून आहे. दररोज ढगाळ व पावसाचे वातावरण तयार होते, मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. पावसाअभावी परिसरातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे पाऊस लांबल्यास सर्वांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची वेळ येऊ शकते.

इन्फो...

भोजापूर धरणाच्या पाण्यावरच लाभक्षेत्रातील शेतीव्यवसाय अवलंबून आहेत. दरवर्षी रब्बी हंगामात धरणातून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. तसेच धरणातून मनेगावसह १९ गावे व कणकोरीसह पाच गावे नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे हजारो लोकांची तहान भागविण्याचे काम धरण करीत आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोणसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम धरणातून सुरू आहे.

फोटो - ०४ भोजापूर डॅम

भोजापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा.