शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरण पाणलोट क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:17 IST

नांदूरशिंगोटे : दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली ...

नांदूरशिंगोटे : दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. तीन महिन्यांच्या कालावधीत धरणात फक्त ४० दशलक्ष घनफूट पाण्याची नवीन आवक झाली आहे. धरणात २४ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहेत. परतीच्या पावसाने तरी भोजापूर धरण भरेल अशी अपेक्षा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आहे.

म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरणाची निर्मिती केली असून धरणाच्या पाण्यावरच परिसरातील शेती व पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांतील २१ गावे धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणात पाण्याची आवक झालेली नसून धरण क्षेत्रात पडलेल्या पावसावरच साठा वाढला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जून महिन्यात धरणात ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तीन महिन्यांच्या कालावधीत १३ टक्के पाणीसाठा वाढला असून, धरण परिसरात अवघा साडेतीनशे मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरण परिसरात झालेल्या पावसाने डोंगराचे पाणी वाहून धरणात आल्याने आजमितीला धरणात ८५ दशलक्ष घनफूट पाणी आहेत. गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या दोन वर्षांपासून भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत होती. तसेच तब्बल दोन महिने धरणाच्या पाण्यातून विसर्ग सुरू असल्याने लाभक्षेत्रातील बंधारे पूर्णपणे भरले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांनंतर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. दोन वर्षांपासून सातत्याने भोजापूर धरणात भरपूर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणात आज फक्त २४ टक्के जिवंत पाणीसाठा असला तरी आगामी काळात होणाऱ्या मोठ्या पावसाने या पाणीसाठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून कसाबसा तग धरून आहे. दररोज ढगाळ व पावसाचे वातावरण तयार होते, मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. पावसाअभावी परिसरातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे पाऊस लांबल्यास सर्वांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची वेळ येऊ शकते.

इन्फो...

भोजापूर धरणाच्या पाण्यावरच लाभक्षेत्रातील शेतीव्यवसाय अवलंबून आहेत. दरवर्षी रब्बी हंगामात धरणातून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. तसेच धरणातून मनेगावसह १९ गावे व कणकोरीसह पाच गावे नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे हजारो लोकांची तहान भागविण्याचे काम धरण करीत आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोणसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम धरणातून सुरू आहे.

फोटो - ०४ भोजापूर डॅम

भोजापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा.