शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

बाजारपेठांमधील ‘पास’चा प्रयोग प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

पोलीस आयुक्तालयाकडून ८ जून रोजी काढलेले आदेश रद्द करत सोमवारपासून (दि. २८) नवे आदेश लागू करण्यात आल्याची अधिसूचना जारी ...

पोलीस आयुक्तालयाकडून ८ जून रोजी काढलेले आदेश रद्द करत सोमवारपासून (दि. २८) नवे आदेश लागू करण्यात आल्याची अधिसूचना जारी केली. हे आदेश २७ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशानुसार दिवसा जमावबंदी व संध्याकाळपासून पहाटेपर्यंत संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच ‘सील’ केलेल्या बाजारपेठेत खरेदीसाठी जाताना प्रवेश पास एन्ट्री पॉइंटवरून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची उपाययोजना महापालिका प्रशासनाने करावयाची असल्याचे आदेशात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे. पासची वेळ संपल्यानंतरही संबंधित ग्राहक बाजारात वावरताना आढळून आल्यास त्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याचे त्या आदेशात म्हटले आहे. मात्र या आदेशानुसार कोणत्याही प्रकारची पासेसची वितरण व्यवस्था मनपाकडून तीन दिवसांनंतरही होऊ शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला मनपा प्रशासनाकडून वाटण्याच्या अक्षता लावल्याचे बोलले जात आहे.

---इन्पो---

‘सील’साठी पोलिसांची सज्जता

बाजारपेठा सील करण्यासाठी आणि एन्ट्री-एक्झिट पॉइंट तयार करण्याकरिता भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मेनरोड, शालिमार, भद्रकाली, रविवार कारंजा, धुमाळ पॉइंट, वंदे मातरम चौक, नवापुरा या भागांत पोलिसांनी बॅरिकेडिंग आणून सज्ज ठेवले आहे. पासेस वितरण व्यवस्था मनपाकडून होणे अपेक्षित आहे, त्यानंतरच पोलिसांना ग्राहकांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. मनपा-पोलीस प्रशासनातील असमन्वय यामुळे पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

----इन्फो---

मार्च महिन्यात पोलिसांनी बाजारांमध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवातीला ‘तिकीट’ आणि त्यानंतर ‘पावतीऐवजी कूपन’ सुरू केले. या दरम्यान, बाजारातील वर्दळ कमी करण्यात पोलिसांना यश आले. सुरुवातीलाच महापालिकेच्या पथकांसह पोलिसांनी तळ ठोकला. पण, यंदा पोलीस आयुक्तांनी आदेश काढल्यानंतर सज्जता कुठेही दिसली नाही. मंगळवारी (दि. २९) आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने बुधवारपासून (दि. ३०) मोफत पास देण्याची शक्यता होती. पोलिसांनी बॅरिकेडिंगदेखील केले; मात्र मनपाची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नसल्याने सकाळी पोलिसांचा फौजफाटा तैनात झाल्यावर काही वेळेत बंदोबस्तही पांगला. बाजारात कुठेही सोशल डिस्टन्स किंवा मास्कची खबरदारी दिसून आली नाही.

- -