शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रतीक्षा पालखेडच्या रोटेशनची

By admin | Updated: December 28, 2015 22:48 IST

मनमाड : तीन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात केवळ तीन दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. १० जानेवारीला पालखेडचे रोटेशन मिळणे अपेक्षित असले तरी संभाव्य पाणीटंचाई पाहता ३१ डिसेंबरपर्यंत रोटेशन मिळावे यासाठी सोमवारी पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास कळवण्यात आले आहे. पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाडकरांना गेल्या काही महिन्यांपूर्वी सात दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत जाऊन तो कालावधी सोमवारी २० दिवसांपर्यंत जाऊन पोहचला आहे. सध्या पावसाअभावी शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पालिकेने खास बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे १० जानेवारीला सोडण्यात येणारे पालखेडच्या पाण्याचे रोटेशन ३१ डिसेंबरपर्यंत सोडावे अशी विनंती केली आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होेणार आहे. या परिस्थितीमध्ये मनमाडकरांना पालखेडच्या रोटेशनची प्रतीक्षा आहे. सध्या वागदर्डी धरणातील मृतसाठ्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गढूळ व जंतुयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. (वार्ताहर)