शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

पशुधन नुकसानभरपाईची वर्षभरापासून प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी तसेच नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले. गेल्या ...

गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी तसेच नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले. गेल्या वर्षभरात या कारणांमुळे १६८ जनावरे दगावली. यापैकी १३८ जनावरे मालेगाव तालुक्यात असून या तालुक्यात सर्वाधिक फटका बसला होता. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून शासनाकडे भरपाईपोटी ७३ लाखांची मागणी केली होती.

या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांची तसेच घरपडझडीच्या नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात आली. मात्र पशुधनाची भरपाई अदा करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा पत्रव्यवहारदेखील शासनाकडे केला आहे. शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. मदत व पुनर्वसन खात्याच्या निकषानुसार मोठ्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ३०, बैल २५ तर शेळी, मेंढी, बोकड दगावल्यास तीन हजारांची व कोंबड्या दगावल्यास प्रत्येकी ५० रुपये मदत दिली जाते. त्यानुसार १६८ छोट्यामोठ्या जनावरांच्या नुकसानभरपाईपोटी ७३ लाखांच्या मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र मदत प्राप्त होण्यास विलंब होत आहे.