शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पीककर्ज वाटपासाठी शंभर कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: June 23, 2017 00:42 IST

राज्य शिखर बॅँकेकडे पाठविलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला पर्यायाने शेतकऱ्यांना शंभर कोटींची प्रतीक्षा करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खरीप हंगामात तातडीची दहा हजारांची पीककर्जासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शिखर बॅँकेकडे पाठविलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावावर गुरुवारपर्यंत (दि.२२) निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना शंभर कोटींची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यास टपाल खाते व जिल्हा बॅँकांना हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत आठ महिन्यांपासून पडून असलेल्या ३४१ कोटींच्या नोटा बदलून देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. मात्र तोंडावर असलेल्या खरीप हंगामासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना कर्ज कसे वाटप करायचे? हादेखील एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यातच राज्य सरकारने खरिपासाठी तातडीची दहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. या दहा हजार रुपये मदतीच्या निकषात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे सुमारे २० हजार शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यांना वाटप करावयासाठी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना वाटप करावयासाठी १०० कोटी रुपये मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा बॅँकेने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मंगळवारी सादर केला आहे. मात्र या १०० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर अद्याप राज्य शिखर बँकेकडून काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शंभर कोटी रुपये मिळण्याची तूर्तास तरी प्रतीक्षा करावी लागत आहे.