शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

माळमाथा परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

माळमाथ्यावरील शेतकऱ्यांनी २० जूननंतरच पेरणी केल्यामुळे यावर्षी खरीप पिकांना थोडा उशीर झाला आहे. पावसाला उशीर झाल्याने कापसाची रोपे अद्यापही ...

माळमाथ्यावरील शेतकऱ्यांनी २० जूननंतरच पेरणी केल्यामुळे यावर्षी खरीप पिकांना थोडा उशीर झाला आहे. पावसाला उशीर झाल्याने कापसाची रोपे अद्यापही जमीन सोडलेली नसल्याने कापसाचे उत्पादन घटणार आहे. त्याचप्रमाणे मका पिकालाही ग्रहण लागण्याची शक्यता आहे. लष्करी आळीने बागलाण तालुक्यात धुमाकूळ घातल्याने अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यावर कृषी विभागाने लवकरात लवकर काळजी घेऊन फवारणी किंवा आदी व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अन्यथा मक्याचे पीक लष्करी अळीचा प्रादुर्भावास बळी पडून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माळमाथ्यावर कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये प्रति पायली या दराने बियाणे उपलब्ध करून त्याची पेरणी केली आहे. मात्र पावसाची किंवा वातावरणाची साथ नसल्याने ही रोपे पन्नास टक्क्याच्या प्रमाणातच उगवणक्षमता झालेली असल्याने शेतकर्‍यांना पुन्हा बियाणे विकत घेण्याची वेळ आली आहे. उन्हाळ कांद्याला बाजारभाव असला तरी सद्य:स्थितीत हे दर सरासरी १३ हजार रुपयांप्रमाणे झाल्याने शेतकर्‍यांनी कांदा लागवडीसाठी हात आखडता घेण्याचे चित्र दिसत आहे. पावसाची स्थिती बरी असली तरी विहिरी, नद्या, तळी अद्याप रिकामी आहेत. नदीनाल्यांनाही पाऊस पाणी न गेल्याने जमीन भिजलेली नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. यामुळे शेतकरी मोठ्या पावसाची वाट बघताना दिसत आहेत. साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरीपण अद्याप मोठा पाऊस झालेला नसल्याने जमिनीची उष्णताही बाहेर निघालेली नाही. त्यामुळे जमिनीची धूप वाढून त्याचा परिणाम लहान पिकावर होत वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे पाण्याची पिकांना गरज आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या पावसासाठी निसर्गावर भरवसा ठेवला आहे. माळमाथ्यावर भुईमूग, कडधान्य आदी पिके उत्पादन घेण्यासाठी घटलेली आहेत. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी आता शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.