शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 5, 2016 23:33 IST

खामखेडा : आर्थिक संकटाने हैराण

खामखेडा : राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात पिकासाठी केलेला खर्चही पडलेला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, तो मागील दोन महिन्यांपासून शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.राज्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या कांदा उत्पादनामुळे भावात मोठी घसरण झाली. नफा तर सोडाच; परंतु उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना मिळणे कठीण झाले होते. अशा अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिकिलो एक रुपया अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला.शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलास जरी मिळाला असला तरी यावर कांदा उत्पादक शेतकरी मात्र समाधानी नाही. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या दिवसात तरी सरकारकडून काहीतरी दिलासा मिळेल आणि कांदा अनुदानातून दिवाळी गोड होईल ही शेतकऱ्यांची अपेक्षा सरकार पूर्ण करेन, अशी अपेक्षा आहे. प्रतिकिलो केवळ एक रुपया अनुदान राज्य शासनाने देऊ केले आहे. किमान ते तरी योग्य वेळी पदरात पडेल, अशी अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा प्रशासनाकडून अपेक्षाभंग होताना दिसत आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची वाट पहावी लागत आहे.ज्या दोन महिन्यात विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळणार आहे त्या दोन महिन्यापैकी जवळ जवळ दीड महिना सर्व मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्याचा कांदा मार्केटला गेलाच नाही मग फक्त २०-२२ दिवस विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच या अनुदानाचा लाभ होणार असून, मे-जून महिन्यात विक्री केलेल्या शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा नसल्याने शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)