शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वीज मंडळाचे कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 14, 2016 01:22 IST

वीस वर्षे : अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ

 नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अस्तित्वात असताना वीस वर्षांपूर्वी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याचा ठराव करण्यात आला. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसून त्यानंतर निवृत्त झालेले शेकडो कर्मचारी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात गेल्या पंधरा वर्षांपासून उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण असून, अशा स्थितीत आता निवृत्त होऊन अनेक वर्ष झालेल्यांना न्याय मिळणार किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.महावितरणच्या सध्या तीन कंपन्या असल्या तरी त्या आधी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अस्तित्वात होते. राज्य सरकारचे हे महामंडळ असूनही त्याला गैर सरकारी मंडळ मानले जाते. त्यामुळे महामंडळात तेव्हापासून असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना तेव्हा करावा लागला आणि आताही करावा लागत आहे. राज्य शासन आणि महामंडळाने ३१ डिसेंबर १९९६ रोजी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वीस वर्षे झाली तरी त्या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. निर्णय घेणारेच निर्णय बाजूला ठेवतात असा अनुभव यानिमित्ताने आला आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळावे यासाठी कर्मचारी संघटना आणि सेवानिवृत्तांनी पाठपुरावा करून निवृत्ती वेतन देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे २००१ मध्ये कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर गेले पंधरा वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सेवानिवृत्त कर्मचारी डी. आर. कुलकर्णी व गो. भ. जामखेडकर यांनी सांगितले. त्यावेळी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन न देता पीपीएफचे पैसे देण्यात आले. परंतु त्यावेळी दहा ते बारा टक्के असलेला व्याजदर आता खूपच घरसला असून, सत्तर - पंच्याहत्तरीतील कर्मचाऱ्यांना आजारपण, घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी सेवानिवृत्तांकडून होत आहे. (प्रतिनिधी)