शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आणीबाणीतील मिसाबंदीची प्रतीक्षा संपली.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:55 IST

येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देयेवल्यातील १९ मिसाबंदींना मिळणार मानधन

येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.१९७५ ते १९७७ च्या दरम्यान कारावासात गेलेल्या अनेकांच्या प्रपंचाची धूळधाण झाली आहे. सातत्याने मिसा बंदी व सत्याग्रहिच्या पदरात निराशेशिवाय काहीही पडले नव्हते. या दरम्यान काहीतरी पदरात पडेल, या प्रतीक्षेत असलेल्यांपैकी अनेक जेष्ठ स्वर्गवासी देखील झाले. दरम्यान आणीबाणीतील मिसाबंदीना मानधन देण्यासंदर्भात एक उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीने आणीबाणी विरोधात लढ्यात एका महिन्यापेक्षा अधिक काळ मिसाखाली कारावास भोगला त्यांना दहा हजार, त्यांच्या पश्च्यात पत्नीला पाच हजार, महिन्यापेक्षा कमी कारावास भोगणाºया बंदींना दरमहा पाच हजार, त्यांच्या पश्च्यात पती अथवा पत्नींना अडीच हजाराची पेन्शन थेट मिळणार असल्याने मिसाबंदी व सत्याग्रहीची समाधान व्यक्त केले आहे.यानिमित्ताने येवल्यात आजही ९१ वर्ष वयोमान असलेले पुरु षात्तम भिंगारकर यांचे निवासस्थानी रमाकांत भावसार, सुधाकर कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापुरकर यांनी एकत्रीत येत आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. आणि आता मानधन मिळणार म्हणून समाधान व्यक्त केले होते.येवल्यातील रा. स्व. संघाच्या काही कुटुंबाची वाताहत झाली. येवल्यातील २० राजबंदी सत्याग्रहींना तत्कालीन परिस्थितीत शिक्षेचा सामना करावा लागला. त्यातील ११ राजबंदी सत्याग्रही स्वर्गवाशी झालेत. सध्या ९ सत्याग्रहींचा येवलासह परिसरात रहिवाशी आहे. येवला शहरात स्व. डॉ. कांतीलाल पटेल, स्व. उत्तमचंद चंडालिया, पुरु षोत्तम भिंगारकर, बाळासाहेब गौरकर यांना तत्कालीन मिसा कायद्याखाली अटक करण्यात आली होती.तसेच १४ नोव्हेबर १९७५ ते १४ जानेवारी १९७६ या दोन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण देशभर आणीबाणीच्या निषेधार्थ सत्याग्रहात कै. जगन्नाथ सोनवणे (मंत्री), कै. बन्सीलाल हलवाई, कै. बाटुमल सिंधी, कै. काशिनाथपंत चव्हाण, कै. दशरथ नागपुरे, व रमाकांत (मामा) भावसार, सुधाकर कुलकर्णी यांचा सहभाग होता.३० डिसेंबर १९७५ रोजी येवला शहरातून दुसºया तुकडीने सत्याग्रह केला. या तुकडीत सर्व महाविद्यालयीन तत्कालीन तरु णांचा सहभाग होता. यात धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापूरकर, डॉ.राजेश कांबळे, वसंत खोजे, तसेच कै. दौलत काळे, कै. विकास जोशी व कै. दत्तात्रय चव्हाण (भावसार) यांचा समावेश होता.