शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

आणीबाणीतील मिसाबंदीची प्रतीक्षा संपली.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:55 IST

येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देयेवल्यातील १९ मिसाबंदींना मिळणार मानधन

येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.१९७५ ते १९७७ च्या दरम्यान कारावासात गेलेल्या अनेकांच्या प्रपंचाची धूळधाण झाली आहे. सातत्याने मिसा बंदी व सत्याग्रहिच्या पदरात निराशेशिवाय काहीही पडले नव्हते. या दरम्यान काहीतरी पदरात पडेल, या प्रतीक्षेत असलेल्यांपैकी अनेक जेष्ठ स्वर्गवासी देखील झाले. दरम्यान आणीबाणीतील मिसाबंदीना मानधन देण्यासंदर्भात एक उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीने आणीबाणी विरोधात लढ्यात एका महिन्यापेक्षा अधिक काळ मिसाखाली कारावास भोगला त्यांना दहा हजार, त्यांच्या पश्च्यात पत्नीला पाच हजार, महिन्यापेक्षा कमी कारावास भोगणाºया बंदींना दरमहा पाच हजार, त्यांच्या पश्च्यात पती अथवा पत्नींना अडीच हजाराची पेन्शन थेट मिळणार असल्याने मिसाबंदी व सत्याग्रहीची समाधान व्यक्त केले आहे.यानिमित्ताने येवल्यात आजही ९१ वर्ष वयोमान असलेले पुरु षात्तम भिंगारकर यांचे निवासस्थानी रमाकांत भावसार, सुधाकर कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापुरकर यांनी एकत्रीत येत आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. आणि आता मानधन मिळणार म्हणून समाधान व्यक्त केले होते.येवल्यातील रा. स्व. संघाच्या काही कुटुंबाची वाताहत झाली. येवल्यातील २० राजबंदी सत्याग्रहींना तत्कालीन परिस्थितीत शिक्षेचा सामना करावा लागला. त्यातील ११ राजबंदी सत्याग्रही स्वर्गवाशी झालेत. सध्या ९ सत्याग्रहींचा येवलासह परिसरात रहिवाशी आहे. येवला शहरात स्व. डॉ. कांतीलाल पटेल, स्व. उत्तमचंद चंडालिया, पुरु षोत्तम भिंगारकर, बाळासाहेब गौरकर यांना तत्कालीन मिसा कायद्याखाली अटक करण्यात आली होती.तसेच १४ नोव्हेबर १९७५ ते १४ जानेवारी १९७६ या दोन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण देशभर आणीबाणीच्या निषेधार्थ सत्याग्रहात कै. जगन्नाथ सोनवणे (मंत्री), कै. बन्सीलाल हलवाई, कै. बाटुमल सिंधी, कै. काशिनाथपंत चव्हाण, कै. दशरथ नागपुरे, व रमाकांत (मामा) भावसार, सुधाकर कुलकर्णी यांचा सहभाग होता.३० डिसेंबर १९७५ रोजी येवला शहरातून दुसºया तुकडीने सत्याग्रह केला. या तुकडीत सर्व महाविद्यालयीन तत्कालीन तरु णांचा सहभाग होता. यात धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापूरकर, डॉ.राजेश कांबळे, वसंत खोजे, तसेच कै. दौलत काळे, कै. विकास जोशी व कै. दत्तात्रय चव्हाण (भावसार) यांचा समावेश होता.