शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीतील मिसाबंदीची प्रतीक्षा संपली.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:55 IST

येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देयेवल्यातील १९ मिसाबंदींना मिळणार मानधन

येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.१९७५ ते १९७७ च्या दरम्यान कारावासात गेलेल्या अनेकांच्या प्रपंचाची धूळधाण झाली आहे. सातत्याने मिसा बंदी व सत्याग्रहिच्या पदरात निराशेशिवाय काहीही पडले नव्हते. या दरम्यान काहीतरी पदरात पडेल, या प्रतीक्षेत असलेल्यांपैकी अनेक जेष्ठ स्वर्गवासी देखील झाले. दरम्यान आणीबाणीतील मिसाबंदीना मानधन देण्यासंदर्भात एक उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीने आणीबाणी विरोधात लढ्यात एका महिन्यापेक्षा अधिक काळ मिसाखाली कारावास भोगला त्यांना दहा हजार, त्यांच्या पश्च्यात पत्नीला पाच हजार, महिन्यापेक्षा कमी कारावास भोगणाºया बंदींना दरमहा पाच हजार, त्यांच्या पश्च्यात पती अथवा पत्नींना अडीच हजाराची पेन्शन थेट मिळणार असल्याने मिसाबंदी व सत्याग्रहीची समाधान व्यक्त केले आहे.यानिमित्ताने येवल्यात आजही ९१ वर्ष वयोमान असलेले पुरु षात्तम भिंगारकर यांचे निवासस्थानी रमाकांत भावसार, सुधाकर कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापुरकर यांनी एकत्रीत येत आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. आणि आता मानधन मिळणार म्हणून समाधान व्यक्त केले होते.येवल्यातील रा. स्व. संघाच्या काही कुटुंबाची वाताहत झाली. येवल्यातील २० राजबंदी सत्याग्रहींना तत्कालीन परिस्थितीत शिक्षेचा सामना करावा लागला. त्यातील ११ राजबंदी सत्याग्रही स्वर्गवाशी झालेत. सध्या ९ सत्याग्रहींचा येवलासह परिसरात रहिवाशी आहे. येवला शहरात स्व. डॉ. कांतीलाल पटेल, स्व. उत्तमचंद चंडालिया, पुरु षोत्तम भिंगारकर, बाळासाहेब गौरकर यांना तत्कालीन मिसा कायद्याखाली अटक करण्यात आली होती.तसेच १४ नोव्हेबर १९७५ ते १४ जानेवारी १९७६ या दोन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण देशभर आणीबाणीच्या निषेधार्थ सत्याग्रहात कै. जगन्नाथ सोनवणे (मंत्री), कै. बन्सीलाल हलवाई, कै. बाटुमल सिंधी, कै. काशिनाथपंत चव्हाण, कै. दशरथ नागपुरे, व रमाकांत (मामा) भावसार, सुधाकर कुलकर्णी यांचा सहभाग होता.३० डिसेंबर १९७५ रोजी येवला शहरातून दुसºया तुकडीने सत्याग्रह केला. या तुकडीत सर्व महाविद्यालयीन तत्कालीन तरु णांचा सहभाग होता. यात धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापूरकर, डॉ.राजेश कांबळे, वसंत खोजे, तसेच कै. दौलत काळे, कै. विकास जोशी व कै. दत्तात्रय चव्हाण (भावसार) यांचा समावेश होता.