शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:05 IST

तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्वात अगोदर ब्रम्हाव्हॅली येथे झालेल्या पक्ष मेळाव्यात निवडणुकीचे रणशिंग ...

तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्वात अगोदर ब्रम्हाव्हॅली येथे झालेल्या पक्ष मेळाव्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता कोरोनाचा कहर कमी होऊ लागल्याने ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाकडे लक्ष लागून आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा स्थगिती आदेश उठल्यावर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगीनघाई सुरू होईल. दरम्यान, काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनेही आपल्या पक्षातील मरगळ झटकण्याला गती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा नुकताच जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या उपस्थितीत झाला. या बैठकीत गटबाजी उफाळून आली. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याला डावलले जात असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. परंतु सध्या महाविकास आघाडी असल्याने सर्वांना सबुरीचा सल्ला देण्यात आला. तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण केले जात असतानाच भाजपच्या गोटात मात्र सध्या तरी राज्य सरकारविरोधी असलेल्या आंदोलनाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही कार्यक्रम नाही. पक्ष बांधणीवर भर दिला जात असल्याचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी सांगितले तर अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणतेही ध्येय-धोरणे ठरली नसल्याने कार्यकर्त्यांत संभ्रमाची स्थिती आहे. शिवसेनेतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

इन्फो

ओबीसी आरक्षणाकडे लक्ष

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मागील निवडणुकीत नगराध्यक्षांसह १७ जागा जिंकून भाजपाने एकहाती सत्ता हस्तगत केली होती. तर शिवसेनेला फक्त दोन तर एका अपक्षाला जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तर खाते उघडता आले नव्हते. त्यामुळे यंदाही निवडणुकीत भाजपा निश्चिंत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्याने सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागा वाढणार आहेत. अर्थात तोपर्यंत फेरविचारार्थ याचिका दाखल करुन इंपिरिकल डाटा व जातनिहाय जनगणनेची आकडेवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली तर जागा अबाधितही राहू शकतील. पण न्यायालयाचा निर्णय काहीही लागो, मात्र राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.