शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:05 IST

तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्वात अगोदर ब्रम्हाव्हॅली येथे झालेल्या पक्ष मेळाव्यात निवडणुकीचे रणशिंग ...

तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्वात अगोदर ब्रम्हाव्हॅली येथे झालेल्या पक्ष मेळाव्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता कोरोनाचा कहर कमी होऊ लागल्याने ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाकडे लक्ष लागून आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा स्थगिती आदेश उठल्यावर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगीनघाई सुरू होईल. दरम्यान, काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनेही आपल्या पक्षातील मरगळ झटकण्याला गती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा नुकताच जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या उपस्थितीत झाला. या बैठकीत गटबाजी उफाळून आली. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याला डावलले जात असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. परंतु सध्या महाविकास आघाडी असल्याने सर्वांना सबुरीचा सल्ला देण्यात आला. तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण केले जात असतानाच भाजपच्या गोटात मात्र सध्या तरी राज्य सरकारविरोधी असलेल्या आंदोलनाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही कार्यक्रम नाही. पक्ष बांधणीवर भर दिला जात असल्याचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी सांगितले तर अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणतेही ध्येय-धोरणे ठरली नसल्याने कार्यकर्त्यांत संभ्रमाची स्थिती आहे. शिवसेनेतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

इन्फो

ओबीसी आरक्षणाकडे लक्ष

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मागील निवडणुकीत नगराध्यक्षांसह १७ जागा जिंकून भाजपाने एकहाती सत्ता हस्तगत केली होती. तर शिवसेनेला फक्त दोन तर एका अपक्षाला जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तर खाते उघडता आले नव्हते. त्यामुळे यंदाही निवडणुकीत भाजपा निश्चिंत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्याने सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागा वाढणार आहेत. अर्थात तोपर्यंत फेरविचारार्थ याचिका दाखल करुन इंपिरिकल डाटा व जातनिहाय जनगणनेची आकडेवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली तर जागा अबाधितही राहू शकतील. पण न्यायालयाचा निर्णय काहीही लागो, मात्र राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.