शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुष्काळ अनुदान मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:27 IST

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात देण्यात येणारे हे अनुदान कंधाणेतील बºयाच शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने मदतनिधी येथील वंचित बळीराजां- साठी मृगजळ ठरू लागली आहे.

ठळक मुद्देकंधाणे : काहींना प्राप्त तर अनेकांना प्रतीक्षा

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात देण्यात येणारे हे अनुदान कंधाणेतील बºयाच शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने मदतनिधी येथील वंचित बळीराजां- साठी मृगजळ ठरू लागली आहे.तालुक्याला शासनाकडून तीन टप्प्यांतील ५१ कोटी रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला असताना अद्यापपर्यंत बºयाच शेतकºयांच्या खाती मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही शेतकºयांच्या खाती दोन्ही टप्प्यांतील निधी वितरित झाला आहे. काहींना अद्याप पहिल्या टप्प्यातील मदतनिधी मिळालेला नाही. मदतनिधीच्या चौकशीसाठी बळीराजाला तहसील ते बँकांच्या चकरा मारव्या लागत आहे.चालू वर्षी नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १७ परिमंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यात गंभीर व मध्यम अशा स्वरूपाची वर्गवारी करण्यात आली होती. बागलाण तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळात समावेश करण्यात आला.यात बागलाण तालुक्यातील ९७५६२ शेतकºयांना मदतीसाठी ८३ कोटी ५७ लाखांची मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती. मागणीपैकी पहिला हप्ता १७ कोटी ७ लाखांची मदत व दुसरा १६ कोटी ६५ लाखांचा हप्ता व तिसरा हप्ता २० कोटी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. शासनाने बागायती पिकांना या मदतनिधीतून वगळले आहे. फक्त जिराईत व बहुवार्षिक फळपिकांचा या मदतनिधीत समावेश करण्यात आला. यातील कोरडवाहू पिकांना हेक्टरी ६८०० रुपये अनुदान जाहीर केले.यातील पहिला हप्ता ३४०० रुपये देण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार यातील पहिला हप्ता ९ हजार देण्याचा शासन निर्णय झाला आहे. बागलाण तालुक्यातील कंधाणेतील बºयाच शेतकºयांना अद्याप मदतनिधीचा पहिला हप्ताही मिळालेला नाही. याच गावातील ठरावीक शेतकºयांना मदतनिधीचे दोन्ही हप्ते मिळाले आहेत.आधीच शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव त्यात दुष्काळाचा अभिशाप यामुळे शेतीव्यवसाय संकटात सापडला आहे. शासनाने जाहीर केलेली तोकडी मदत अद्याप प्राप्त झाली नसून ती कुठे अडकली याबाबत मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.- सुरेश संतोष बिरारीशेतकरी कंधाणे