शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दुष्काळ अनुदान मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:27 IST

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात देण्यात येणारे हे अनुदान कंधाणेतील बºयाच शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने मदतनिधी येथील वंचित बळीराजां- साठी मृगजळ ठरू लागली आहे.

ठळक मुद्देकंधाणे : काहींना प्राप्त तर अनेकांना प्रतीक्षा

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात देण्यात येणारे हे अनुदान कंधाणेतील बºयाच शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने मदतनिधी येथील वंचित बळीराजां- साठी मृगजळ ठरू लागली आहे.तालुक्याला शासनाकडून तीन टप्प्यांतील ५१ कोटी रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला असताना अद्यापपर्यंत बºयाच शेतकºयांच्या खाती मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही शेतकºयांच्या खाती दोन्ही टप्प्यांतील निधी वितरित झाला आहे. काहींना अद्याप पहिल्या टप्प्यातील मदतनिधी मिळालेला नाही. मदतनिधीच्या चौकशीसाठी बळीराजाला तहसील ते बँकांच्या चकरा मारव्या लागत आहे.चालू वर्षी नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १७ परिमंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यात गंभीर व मध्यम अशा स्वरूपाची वर्गवारी करण्यात आली होती. बागलाण तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळात समावेश करण्यात आला.यात बागलाण तालुक्यातील ९७५६२ शेतकºयांना मदतीसाठी ८३ कोटी ५७ लाखांची मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती. मागणीपैकी पहिला हप्ता १७ कोटी ७ लाखांची मदत व दुसरा १६ कोटी ६५ लाखांचा हप्ता व तिसरा हप्ता २० कोटी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. शासनाने बागायती पिकांना या मदतनिधीतून वगळले आहे. फक्त जिराईत व बहुवार्षिक फळपिकांचा या मदतनिधीत समावेश करण्यात आला. यातील कोरडवाहू पिकांना हेक्टरी ६८०० रुपये अनुदान जाहीर केले.यातील पहिला हप्ता ३४०० रुपये देण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार यातील पहिला हप्ता ९ हजार देण्याचा शासन निर्णय झाला आहे. बागलाण तालुक्यातील कंधाणेतील बºयाच शेतकºयांना अद्याप मदतनिधीचा पहिला हप्ताही मिळालेला नाही. याच गावातील ठरावीक शेतकºयांना मदतनिधीचे दोन्ही हप्ते मिळाले आहेत.आधीच शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव त्यात दुष्काळाचा अभिशाप यामुळे शेतीव्यवसाय संकटात सापडला आहे. शासनाने जाहीर केलेली तोकडी मदत अद्याप प्राप्त झाली नसून ती कुठे अडकली याबाबत मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.- सुरेश संतोष बिरारीशेतकरी कंधाणे