शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

विद्यार्थी गुणवत्तेचे निमित्त करून वेतन कपातीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST

नाशिक : शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केल्यानंतर शिक्षकांच्या कामाच्या मूल्यमापनावर आधारित वेतन देण्यासंदर्भातील शासन निर्णय यापूर्वीच रद्द करण्यात ...

नाशिक : शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केल्यानंतर शिक्षकांच्या कामाच्या मूल्यमापनावर आधारित वेतन देण्यासंदर्भातील शासन निर्णय यापूर्वीच रद्द करण्यात आला होता. तरी आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित वेतन देण्यासंदर्भात शासनस्तरावर विचार सुरू असल्याने शिक्षक संघटनांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून शिक्षकांचे वेतन निश्चित करण्याला विरोध केला असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे निमित्त करून शिक्षकांच्या वेतन कपातीचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे.

शिक्षकांच्या वेतनाबाबत शासनाची वक्रदृष्टी असल्याचा आरोप वेगवेगळ्या शिक्षक संघटनांकडून होत असून मागील वर्षी कपात केेलेले २५ % वेतन प्रलंबित अतानाच, वेतन आयोगाची थकबाकी, महागाई भत्ता थकबाकी, वैद्यकीय बिले, भविष्य निर्वाह निधी व्याज, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची देणी अशा वेगवेगळ्या प्रकारची शिक्षक व शिक्षकेतर यांची देणी प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या वेतनास कात्री लावण्यासाठी एक त्रयस्थ संस्थेची नेमणूक करून एक चाचणी किंवा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थांची गुणवत्ता कशी ठरवणार असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

कोट-

सर्व विद्यार्थ्यांची आकलन शक्ती एकसमान नसते. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनासंदर्भात विद्यार्थी गुण‌वत्तेचा निकष लावणे योग्य ठरणार नाही. शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांसाठी पूर्ण क्षमतेने अध्यापन करीत असतो. त्यात त्यात तो कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे या निर्णयाला सर्व शिक्षक संघटनांचा विरोध असेल.

-राजेंद्र निकम, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक महासंघ

-----

सर्वच विद्यार्थ्यांची बैद्धिक पात्रता भिन्न असते. शिक्षक त्याचा शंभर टक्के प्रयत्न करीत असतात. सर्व विद्यार्थी शिक्षकांसाठी एकसमानच असतात. मात्र सर्वच विद्यार्थ्यांना एकसारखेच समजते असे नाही, मूल्यमापन एक समानच येईल असे नाही. त्यामुळे शासनाच्या विचाराधीन असलेला निर्णय अयोग्य आणि मानसशास्त्राला धरून नाही.

- नीलेश ठाकूर, सरचिटणीस टीडीएफ नाशिक

--

चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन नकोच, आधीच अनेक विनाअनुदानित माध्यमिक शिक्षक २० ते ४० टक्के अनुदानावर काम करीत आहेत, शिक्षण सेवक, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, ग्रामीण आणि शहरी यात शैक्षणिक तफावत कधीही मिटू शकणार नाही, त्याला अनेक कारण आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चाचण्यांवरून शिक्षण मूल्यमापन करणे अयोग्य आहे.

- संजय पवार उपाध्यक्ष:- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद