शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वडाळा-अशोका मार्ग परिसराचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Updated: May 10, 2014 23:54 IST

दिलासा : दोन्ही जलकुंभांच्या तपासणीला प्रारंभ

दिलासा : दोन्ही जलकुंभांच्या तपासणीला प्रारंभवडाळागाव : गेल्या अनेक वर्षांपासून वडाळागाव व अशोका मार्ग परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. कधी कमी दाबाने तर कधी अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार या भागांमधून केली जात होती. त्यामुळे या परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रभाग ३८ मध्ये दोन नवीन जलकुंभ बांधण्यात आले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात या जलकुंभांवरून पाणीपुरवठा केला जाणार असल्याची शक्यता आहे.वडाळागावातील महारुद्र हनुमान मंदिराच्या मागील बाजूस व पखालरोड येथे प्रत्येकी दोन जलकुंभ महापालिकेने नव्याने उभारले आहेत. या दोन्ही जलकुंभांची क्षमता वीस दशलक्ष लीटर असून, या जलकुं भांचे काम पूर्णत्वास आले आहे. दररोज एक-दोन लीटर पाणी भरून जलकुंभांची तपासणी केली जात असल्याचे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते पखालरोड जलकुंभ व वडाळागाव जलकुंभापर्यंत वीस इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. तसेच या जलवाहिन्यांद्वारे सद्यस्थितीत प्रभागातील कमी व्यासाच्या जलवाहिन्या जोडणीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. इन्फो........या परिसराला होणार लाभसंपूर्ण वडाळागाव परिसर, वडाळरोडवरील चिश्तिया कॉलनी, जयदीपनगर, मिल्लतनगर, अशोका मार्ग, पखालरोड, खोडेनगर, विधातेनगर, कल्पतरूनगर, हॅप्पी होम कॉलनी, नारायणनगर, गणेशबाबानगर, रविशंकर मार्ग, कुर्डूकरनगर, स्टेट बॅँक कॉलनी, डीजीपीनगर अशा प्रभाग ३८ मधील सर्वच उपनगरीय वसाहतींना नवीन जलकुंभांचा लाभ होणार आहे. .वडाळावासीयांचा संघर्ष संपुष्टातवडाळागावाला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. राजीवनगर च‹ा पार्क जलशुद्धीकरण केंद्राचा वडाळागाव हा अखेरचा टप्पा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे रहिवाशांना नेहमीच पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. परिणामी वडाळागावात नेहमीच कमी दाबाचा पाणीपुरवठा ही नित्याची बाब झाली होती; मात्र नवीन जलकुंभामुळे पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष संपुष्टात येणार आहे.  पाणीपुरवठ्याची समस्या हद्दपारमाझा प्रभाग हा जुन्या चार वार्डांचा मिळून तयार झाला आहे. अशोका मार्ग परिसर हा झपाट्याने विकसित होत असून, लोकसंख्यादेखील वाढत असून, पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवू नये, यासाठी महापालिके कडे पाठपुरावा करून अशोका मार्ग व वडाळ्यात जलकुंभ बांधले. यामुळे प्रभागात पाणीपुरवठ्याची कोणतीही समस्या राहणार नाही. - सतीश कुलकर्णी, उपमहापौर