शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवा वायुनंदन : व्ही. एन. नाईक संस्थेत पदवीप्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:56 IST

नाशिक : उदयोन्मुख विद्यार्थी घडत आहेत. हा विद्यार्थी व्यावसायिक विचाराने मार्गक्रमण न करता सामाजिक संवेदनशीलतची जाणीव ठेवणारा असल्याने आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवेल याची खात्री आहे,

ठळक मुद्देमहाविद्यालयाचा तिसरा पदवीग्रहण सोहळाअभ्यास स्वत:ची जागा निर्माण करीत असते

नाशिक : महाराष्टÑाला प्रगल्भ असा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा लाभला असल्याने, अनेक उदयोन्मुख विद्यार्थी घडत आहेत. हा विद्यार्थी व्यावसायिक विचाराने मार्गक्रमण न करता सामाजिक संवेदनशीलतची जाणीव ठेवणारा असल्याने आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवेल याची खात्री आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोकनेते गोपीनाथराव मुंढे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दिंडोरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा तिसरा पदवीग्रहण सोहळा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११२ व संयुक्त पदवीग्रहण सोहळा नुकताच संस्थेच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वायुनंदन बोलत होते. उपेक्षित वर्गाला शैक्षणिक समूहात जोडून त्यांचा विकास करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. मात्र सामाजात कर्तृत्वाने स्थान मिळविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. कोणतीही पदवी किंवा अभ्यास स्वत:ची जागा निर्माण करीत असते, त्यामुळे इतरांशी तुलना न करता विद्यार्थ्यांनी सामाजिक कर्तव्य आणि सहकार्याची भावना ठेवून मार्गक्रमण करावे. जेणेकरून आपल्यासह इतरांचा विकास होण्यास मदत होईल, असेही डॉ. वायुनंदन म्हणाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस अ‍ॅड. तानाजी जायभावे, विश्वस्त डॉ. धर्माजी बोडके, संचालक महेश आव्हाड, शिक्षणाधिकारी आर. सी. सोनवणे, संदीप फाउंडेशनचे डॉ. दिवेदी, प्राचार्य डॉ. शातांराम बडगुजर, डॉ. संजय सानप, तुलसीदास सुतार, उपप्राचार्य दिलीप कुटे, परीक्षाधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, प्रा. आर. एम. शेख, विद्यापीठ प्रतिनिधी किरण सोनवणे, राजेंद्र संसारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शरद काकड यांनी केले, प्रास्ताविक डॉ. शांताराम बडगुजर, परिचय श्रीमती मुंढे, तर आभार तुलसीदास सुतार यांनी मानले.