शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पोटासाठीची भटकंती हिरावते मतदानाचा ‘हक्क’!

By admin | Updated: April 20, 2015 01:21 IST

ग्रामपंचायत निवडणूक : तमाशा कलावंतांनी व्यक्त केली खंत

  मनमाडलोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा असली तरी पोटासाठी सततची भटकंती करावी लागत असल्याने मतदानापासून वंचिंत रहावे लागत असल्याची खंत खान्देशातील प्रसिद्ध तमाशा कलावंत प्यारेलाल वाघ (नगरदेवळेकर) यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. भालूर येथे यात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.तोंडावर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी देवळा येथे यात्रोत्सवानिमित्त त्यांच्या ‘रतनभाऊ व सोमनाथभाऊ नगरदेवळेकर’ या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुतांश तमाशा कलावंत हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानाचा हक्क भटकंतीमुळे बजावता येणार नाही.पोटासाठी भटकणाऱ्या तमाशा कलावंताना ज्या गावात कार्यक्रम असेल तेथेच मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कुठलेही सरकार सत्तेवर आले, तरी तमाशा कलावंतांची उपेक्षा थांबलेली नाही, जे खरे कलावंत आहे तेच शासकीय मानधनापासून वंचित असल्याचे वाघ यांनी निदर्शनास आणून दिले. तमाशाला जोपर्यंत राजाश्रय मिळत नाही, तोपर्यंत कलावंतांना हलाकीचे जीवन जगावे लागणार आहे. कलावंतासाठी शासकीय कोट्यातून देण्यात येणारे पेट्रोलपंप तसेच घरकूलयासारख्या लाभांचा फायदा तळागाळापर्यंत काम करणाऱ्या खऱ्या तमाशा कलावंतास मिळत नसल्याची खंत वाघ यांनी व्यक्त केली. आज अनेक छोटे-मोठे तमाशा फडमालक खासगी सावकारांच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. प्रेक्षक वर्ग कमी झाल्याने फड चालवणे मुश्कील झाले आहे. सावकाराचे व्याज वाढत गेल्याने कर्जाचा डोंगर तयार झाला आहे. अशा तमाशा फडाच्या कर्जाचा शासनाकडून विचार करण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या सर्वत्र ग्रामंपचायत निवडणुकींचे वातावरण तापले आहे. गावातील अंतर्गत राजकीय गटबाजीमुळे कार्यक्रम उधळून लावण्याचे प्रकार काही गावांमधून घडून येतात. राजकीय लोकांना तमाशा कलावंताचे दु:ख जाणून घ्यावचे नसेल तरी त्यांनी त्रास तरी देऊ नये, अशी अपेक्षा प्यारेलाल वाघ यांनी व्यक्त केली.