शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

२२४ ग्रामपंचायतींसाठी मेमध्ये मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:20 IST

राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ३१८ रिक्त जागांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीदेखील सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ३१८ रिक्त जागांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीदेखील सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या, प्रभागनिहाय रचना व आरक्षणाची सोडत अशा विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. गेल्या आठवड्यात प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. ८ तालुक्यांतील २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत नामांकनाअभावी रिक्त जागांवर पोटनिवडणुका घेण्यासही आयोगाने हिरवा कंदील दर्शविल्यामुळे २०० ग्रामपंचायतींच्या ३१८ रिक्त असलेल्या जागांवरही ही निवडणूक घेण्यात येणार आहे....या ग्रामपंचायतींमध्ये होणार मतदाननाशिक- जलालपूर, गंगाम्हाळुंगी, महादेवपूर, पिंपळगाव (ग), त्र्यंबकेश्वर- सोमनाथनगर, साप्ते, मेटघर किल्ला, दिंडोरी- गवळवाडी, ननाशी, वनारवाडी, मालेगाव- मांजरे, कळवण- करंभेळ, देसगाव, खडकी, कोसवण, सरले दिगर, बागलाण- केरसाने, केळझर, भाक्षी, मुळाणे, देवळा- माळवाडी, फुलेमाळवाडी, मेशी, चांदवड- मंगरूळ. या ग्रामपंचायतींच्या ८१ प्रभागांत २१६ सदस्य व २४ सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे, तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींतील २६४ प्रभागांतील ३१८ रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.अचारसंहिता लागूआयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दि. ७ मे ते १२ मे या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यात येणार असून, दि. १४ मे रोजी छाननी, दि. १६ मे रोजी माघार व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार असून, २७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे व दुसºया दिवशी मतमोजणी करण्यात येईल. आयोगाने सोमवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्याने रात्री १२ वाजेपासून आचारसंहिता लागू केली असून, त्या त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ती अस्तित्वात राहील, असे नमूद केले आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा करण्यास लोकप्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत