शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

२२४ ग्रामपंचायतींसाठी मेमध्ये मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:20 IST

राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ३१८ रिक्त जागांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीदेखील सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ३१८ रिक्त जागांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीदेखील सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या, प्रभागनिहाय रचना व आरक्षणाची सोडत अशा विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. गेल्या आठवड्यात प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. ८ तालुक्यांतील २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत नामांकनाअभावी रिक्त जागांवर पोटनिवडणुका घेण्यासही आयोगाने हिरवा कंदील दर्शविल्यामुळे २०० ग्रामपंचायतींच्या ३१८ रिक्त असलेल्या जागांवरही ही निवडणूक घेण्यात येणार आहे....या ग्रामपंचायतींमध्ये होणार मतदाननाशिक- जलालपूर, गंगाम्हाळुंगी, महादेवपूर, पिंपळगाव (ग), त्र्यंबकेश्वर- सोमनाथनगर, साप्ते, मेटघर किल्ला, दिंडोरी- गवळवाडी, ननाशी, वनारवाडी, मालेगाव- मांजरे, कळवण- करंभेळ, देसगाव, खडकी, कोसवण, सरले दिगर, बागलाण- केरसाने, केळझर, भाक्षी, मुळाणे, देवळा- माळवाडी, फुलेमाळवाडी, मेशी, चांदवड- मंगरूळ. या ग्रामपंचायतींच्या ८१ प्रभागांत २१६ सदस्य व २४ सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे, तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींतील २६४ प्रभागांतील ३१८ रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.अचारसंहिता लागूआयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दि. ७ मे ते १२ मे या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यात येणार असून, दि. १४ मे रोजी छाननी, दि. १६ मे रोजी माघार व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार असून, २७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे व दुसºया दिवशी मतमोजणी करण्यात येईल. आयोगाने सोमवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्याने रात्री १२ वाजेपासून आचारसंहिता लागू केली असून, त्या त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ती अस्तित्वात राहील, असे नमूद केले आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा करण्यास लोकप्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत