शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटी निवडणुकांसाठी मतदार शोधावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:55 IST

विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीसाठी मतदारांची संख्या घटल्याने संचालक जागापेक्षा मतदारांची संख्या कमी झाल्या आहे. सहकार निवडणूक नियमांनी नियमित खातेदार दसाणे, मेहुणे, दाभाडी अनुक्रमे ५६, ७, ९ अशी मतदारसंख्या झाल्याने सोसायटी निवडणुका घोळात सापडणार आहे. यामुळे बाजार समितींना मतदान करणाऱ्या मतदारांना शोधणे अवघड झाले आहे.

ठळक मुद्देखडकी : संचालकांपेक्षाही मतदारांची संख्या कमी; निवडणुका सापडणार घोळात

खडकी : विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीसाठी मतदारांची संख्या घटल्याने संचालक जागापेक्षा मतदारांची संख्या कमी झाल्या आहे. सहकार निवडणूक नियमांनी नियमित खातेदार दसाणे, मेहुणे, दाभाडी अनुक्रमे ५६, ७, ९ अशी मतदारसंख्या झाल्याने सोसायटी निवडणुका घोळात सापडणार आहे. यामुळे बाजार समितींना मतदान करणाऱ्या मतदारांना शोधणे अवघड झाले आहे.नव्या सरकाराने शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला असला तरी सोसायटी संचालक निवडीची प्रक्रिया दुर्लक्षिली गेली आहे. सोसायटी संचालक निवडीसाठी शेतकरीच मतदार आहेत. मात्र सोसायटी सभासदांची सहकार क्षेत्राच्या निवडणूक नियमाप्रमाणे मतदानास पात्र ठरणाºया सभासदांची संख्या नगण्य झाली आहे. सोसायटी सभासदांचे समभाग २० हजारांपर्यंत प्रत्येक संस्थेत मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे शेष आहेत. मात्र मतदानाचा हक्क निकष फक्त नियमित भरणा व सर्वसाधारण सभेच्या उपस्थित राहण्याला गृहीत धरले आहे. जिल्हा बँकेला मतदान करणाºया मतदारांना मात्र अशा प्रकारच्या नियमांना गृहीत धरलेले नाही. यामुळे एकाच बॅँकेच्या संस्थांना निवडीची अशा निकषांना सहकाराला कुठलाच थारा उरणार नाही.पाच वर्षापर्यंत नियमित कर्ज घेऊन परतफेड करणाºया नियमित सभासदांना सोसायटी निवडणुकीत मतदान करता येणार आहे. मात्र जिल्हा बॅँकेने अद्याप पाच वर्षात कर्ज वाटप केले नाही.नोट बंदी झाल्यापासून जिल्हा बॅँकांना ग्रहण लागले आहे. या संस्था मात्र निवडणुकीसाठीच उरल्या आहेत. सोसायटी संस्थासह जिल्हा बॅँक फक्त विनासायच सुरू आहेत. कर्जवसुली करण्यासाठी कंबर कसली होती मात्र दोन वर्षापासून शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसून आली नाही. या दरम्यान कर्ज वाटप न करणाºया सोसायट्यांना ५ वर्ष थकबाकीदार शेतकºयांची माहिती शासनाला पुरविणे एवढेच कार्य झाले आहे. दोन वेळा कर्जमाफी घेऊन सुद्धा शेतकरी थकबाकीदार दिसत आहे. कर्जपुरवठाच झाला नसल्याने नियमित कर्जफेड करणारा शेतकरी सभासद आढळून येत नसल्याने सहकार निवडणुकीचे नियम शिथिल करून पुन्हा सर्व सभासदांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी शासनामार्फत निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.कर्जमाफीच्या विळख्यात सापडलेला शेतकरी मतदानापासून वंचित राहणार आहे. हजारावर सभासद असणाºया संस्थांना दोन आकडी मतदारसंख्यासुद्धा सापडणार नसल्याने सोसायट्यांना अर्थपूर्ण करणे जिव्हारी जाणार आहे. बाजार समितींना निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी शेतकºयांना थेट मतदानाचा निर्णय बदलण्यात आला आहे. सोसायटी सभासदांना मतदान करण्याचा हक्क मिळाला खरा मात्र निवडणूक प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाºयांना सोसायटी सभासदच शोधावा लागणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान