पेठ : तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत निवडणूकोच्या पिहल्या टप्यातील मतमोजणीत मतदारांनी अनेक सत्ताधार्यांना नकार देत सत्ताबदल केल्याचे दिसून आले असून यामूळे जवळपास सर्वच राजिकय पक्षांना चांगलीच चपराक बसली आहे.आगामी पंचायत समतिी व जिल्हा परिषद निवडणूकांची रंगीत तालीम समजल्या जाणार्या 30 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात निवउणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. सकाळपासूनच पेठमध्ये मोठ्या प्रमाणावर निविध राजिकय पक्षांचे कार्यकर्ते हजर झाले होते .एकेक ग्रामपंचायत निकालाची घोषणा झाल्यानंतर कार्यकत्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.विजयी उमेदवार असेवार्ड क्र ं.1-1 ) तुळशिराम भिवावाघमारे,2) सुमन रामचंद्र भूसारेवार्ड क्र ं.2 -1)देविदास काशिराम कामडी2) चंद्रभागा मनोहर मोंढे3) पूनम गिरीधर जाधववार्ड क्र ं. 3-1) भगवान भाऊ गोतरणे2) रेणूका श्रीराम वागलेविजयी उमेदवार असेवार्ड क्र ं.1-1) किरण पुंडलिक भूसारे2) रंजना वामन भसारेवार्ड क्र ं2-1) मनिषा शशिकांत भूसारे2) पंढरीनाथ गंगाराम वाघमारे3) शोभा धनाजी भूसारेवार्ड क्र ं. 31) घनशाम पांडूरंग चौधरी2) देवता दिपक चौधरीकुंभाळेत राष्ट्रवादी माकपा तालुक्याच्या सत्ता केंद्र समजल्या जाणार्या कुंभाळे ग्रामपंचायतीत शिवसेनेला काढता पाय ध्यावा लागला असून येथे राष्ट्रवादीने माकपा सोबत युती करु न शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले. नऊपैकी सहा जागा जिंकून राकॉ- माकपाने सत्ता मिळवली असून शिवसेनेला तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर कोहोरमध्ये प्रभाकर भगरे यांच्या पॅनलने आठ जागा जिकून सत्ता मिळवली. उबरपाडा गावंध पाडा येथे मनसे प्रणति तरु णांनी एकत्र येऊन प्रस्थापितांना धक्का देत सत्ता काबीज केलींजिल्हा बँकेचे संचालक नामदेव हलकंदर यांनी माळेगाव, जोगमोडी पट्टयात आपले वर्चस्व कायम ठेवले असून शिवसेना तालुकाप्रमूख भास्कर गावीत यांनी राजबारी सहखोकरतळे ,कोटंबी, कोपूर्ली चा गड राखला आहे . कळमबारी, वांगणी, कायरे, भूवन,आउगांव, करंजखेड,पाहुची बारी, कुंभारबारी, करंजाळी, बोरवठ आदी प्रमूख राजिकय आखाडयात अटीतटीचे सामने रंगले. (वार्ताहर)
प्रस्थापितांना धक्का देत मतदारांची नवोदितांना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 22:28 IST