शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

आझाद मैदानावर घुमला नाशिककरांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

नाशिक : मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे ...

नाशिक : मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत एसईबीसी प्रवर्गातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाजी केली.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी प्रवर्गातून विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप मराठा संघटनांकडून केला जात असून, अशा उमेदवारांना त्यांनी उत्तीर्ण केलेल्या स्पर्धा परीक्षांनंतर शासकीय नोकरीत सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रविवारीच मुंबईत पोहोचले होते. तर सोमवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यातच अडविल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. दरम्यान, मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी राज्याील आमदारांसह विरोधी पक्ष नेत्यांना सभागृहात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांचा प्रश्‍न राज्य सरकारने मार्गी लावला नाही, तर मराठा समाज यापुढे आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, किरण बोरसे, भारत पिंगळे, वैभव दळवी, प्रवीण घोडे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, दिनेश खडतरे, दुर्गेश कामतेकर, रमेश पांडे आदींनी मुंबईत दाखल होत या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

इन्फो

राज्य सरकारने सारथी शिक्षणसंस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीच्या भगिनीला न्याय यासारख्या मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण होत आहे. आता सरकार न्यायाची भूमिका घेत नसेल तर मराठा बांधवांच्या भावनांचा होणारा उद्रेक हा असह्य असेल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्य सरकारने मराठा उमेदवारांचे सोडवावेत.

- करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

(फोटो- १४मराठा रिजर्वेशन) मुंबईतील आझाद मैदनावर नियुक्तीच्या प्रतीक्षेतील मराठा उमेदवारांच्या आंदोलनात सहभागी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नवनाथ शिंदे ,विजय खर्जुल, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, किरण बोरसे, भारत पिंगळे, वैभव दळवी, प्रवीण घोडे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, दिनेश खडतरे, दुर्गेश कामतेकर, रमेश पांडे आदी.