शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आझाद मैदानावर घुमला नाशिककरांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

नाशिक : मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे ...

नाशिक : मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत एसईबीसी प्रवर्गातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाजी केली.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी प्रवर्गातून विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप मराठा संघटनांकडून केला जात असून, अशा उमेदवारांना त्यांनी उत्तीर्ण केलेल्या स्पर्धा परीक्षांनंतर शासकीय नोकरीत सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रविवारीच मुंबईत पोहोचले होते. तर सोमवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यातच अडविल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. दरम्यान, मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी राज्याील आमदारांसह विरोधी पक्ष नेत्यांना सभागृहात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांचा प्रश्‍न राज्य सरकारने मार्गी लावला नाही, तर मराठा समाज यापुढे आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, किरण बोरसे, भारत पिंगळे, वैभव दळवी, प्रवीण घोडे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, दिनेश खडतरे, दुर्गेश कामतेकर, रमेश पांडे आदींनी मुंबईत दाखल होत या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

इन्फो

राज्य सरकारने सारथी शिक्षणसंस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीच्या भगिनीला न्याय यासारख्या मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण होत आहे. आता सरकार न्यायाची भूमिका घेत नसेल तर मराठा बांधवांच्या भावनांचा होणारा उद्रेक हा असह्य असेल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्य सरकारने मराठा उमेदवारांचे सोडवावेत.

- करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

(फोटो- १४मराठा रिजर्वेशन) मुंबईतील आझाद मैदनावर नियुक्तीच्या प्रतीक्षेतील मराठा उमेदवारांच्या आंदोलनात सहभागी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नवनाथ शिंदे ,विजय खर्जुल, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, किरण बोरसे, भारत पिंगळे, वैभव दळवी, प्रवीण घोडे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, दिनेश खडतरे, दुर्गेश कामतेकर, रमेश पांडे आदी.